'तुमचे चाहते लाखो पण.. लग्नाला तयार कोणीच नाही'; शेतकरी मुलाचं गौतमीला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 12:24 PM2023-04-16T12:24:21+5:302023-04-16T12:29:39+5:30

Gautami patil: बीडमधील एका मुलाने हे पत्र लिहिलं असून सध्या सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फक्त आणि फक्त लावणी डान्सर गौतमी पाटील हिची चर्चा होताना दिसत आहे. अलिकडेच गौतमीने तिच्या भावी आयुष्यातील जोडीदाराविषयी भाष्य केलं.

एका मुलाखतीमध्ये तिने कसा जोडीदार हवाय हे सांगितलं. तिच्या या वक्तव्याचीही सोशल मीडियावर कमालीची चर्चा रंगली.

यामध्येच आता एका शेतकरी मुलाने गौतमीसाठी पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्याने गौतमीला ट्रोल केलं असून 'तुझ्यासोबत लग्न करायला कोणीच तयार नाही', असं म्हटलं आहे. त्याचं हे पत्र सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे पत्र बीडच्या एका मुलाने लिहिलं असून त्याने ते फेसबुकवर शेअर केलं आहे.

किसानपुत्र श्रीकांत गडाले असं या मुलाचं नाव असून त्याने लिहिलेलं पत्र सध्या सोशल मीडियावर गाजत आहे.

' गौतमी पाटीलचे हाल बेहाल, तुमचे चाहते लाखो पण लग्नाला तयार कोणीच नाही. आमच्या महारष्ट्रात मुलगी लग्नाला आली की मुलाच्या घरचे मुलीच्या घरचे उंबरठे झिजवतात. तरी पण मुलाला मुलगी मिळत नाही. तुझ्या ठुमक्यावर सर्व जण फिदा पण लग्नाला कोणी तयार होत नाहीत, गौतमी पाटील आत्मपरिक्षण कर,असं म्हणत त्याने गौतमीला सल्ला दिला आहे.

दरम्यान, या मुलाने पत्राच्या खाली तळटीप देत हे पत्र गौतमीपर्यंत पोहोचवा असं आवाहनही नेटकऱ्यांना केलं आहे.

गौतमी पाटील हे नाव सध्याच्या घडीला चांगलंच चर्चिलं जात. आपल्या लावणीमुळे चर्चेत येणाऱ्या गौतमीला ट्रोलिंगाही सामना करावा लागत आहे.

गौतमी लवकरच घुंगरू या मराठी सिनेमात झळकणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.