शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

पावसाळ्यात भजी समोसे खाता का? खाऊ नका. हेच नाही तर यासोबतच आणखी सहा गोष्टी आहेत ज्या या काळात टाळलेल्याच योग्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 7:05 PM

पावसाळ्यात जिभेची चटक नियंत्रणात ठेवली तर अनेक आजार आटोक्यात राहू शकतात. पावसाळ्यात हे 7 प्रकारचे पदार्थ टाळाच!

- माधुरी पेठकरॠतुनुसार खाण्यापिण्याच्या आवडी निवडी बदलतात. तशा पावसाळ्यातही बदलतात. पण पावसाळ्यात आपल्याला जे प्रामुख्यानं खायला आवडतं आणि जे पर्याय उपलब्ध असतात त्यातले बरेच पदार्थ आरोग्यास हानिकारक असतात. हे पदार्थ खाण्यास जितकी मजा वाटते तितकेच ते पचवताना शरीराला त्रास होतो. त्याचा परिणाम म्हणजे पावसाळ्याच्या काळात केवळ खाण्यापिण्याच्या चुकीच्या आवडीनिवडीमुळे आपण स्वत:हून आजारांना निमंत्रण देतो. 7 प्रकारचे पदार्थ आणि अन्नघटक आहेत जे आपण पावसाळ्याच्या काळात न घेणंच जास्त फायदेशीर असतं. पावसाळ्यात जिभेची चटक नियंत्रणात ठेवली तर अनेक आजार आटोक्यात राहू शकतात.1) भजीपावसाची पहिली सर कोसळण्याचा अवकाश की अस्सल आणि आंबट शौकिन खवय्यांना भजी खावीशी वाटतात. मग काय पाऊस रिमझिम असो की मुसळधार पाऊस आहे म्हणजे भजी हवीतच. मग संध्याकाळच्या चहासोबत बऱ्याचदा भजी खाल्ली जातात. भजींची चव कितीही चटकदार असली तरी ती पावसाळ्याच्या काळात पचवणं अवघडच. आणि ही भजी जर तुम्ही बाहेरच्या टपऱ्यांवर खात असाल तर मग आजारांना आयतं आवताणच. त्याला कारण म्हणजे ते भजी तळण्यासाठी वापरत असलेलं तेल. भजींचं पीठ भिजवण्यासाठी वापरलं जाणारं पाणी या दोन गोष्टींमुळे पोटाचे विकार होतात.भजी खाण्याची लहर आलीच तर मग बाहेरच्यापेक्षा ती घरी बनवून खावीत. पण वारंवार नाही. कारण भज्यांसाठी वापरलं जाणार बेसन हे पचनास त्रासदायकच असतं. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात आपल्या पोटाला आणि पचनसंस्थेला छळायचं नसेल तर भजी कमी खाणं आणि ती घरी खाणंच चांगलं.

 

2) चाटपाणीपुरी, ओलीभेळ , रगडा पॅटीस यासारखे पदार्थ खायला कोणी फक्त पावसाळ्याचीच वाट पाहातं असं नाही. चाट हा प्रकार येता जाता खावासा वाटणाराच आहे. पण पावसाळ्याच्या काळात चाटला आराम दिलेला बरा. पावसाळ्यात होणारे बरेच आजार हे पाणीजन्य असतात. म्हणजे पाण्यापासून होणारे असतात. चाटच्या गाड्यांवर चाट बनवताना वापरलं जाणारं पाणी दुषित असण्याची शक्यता असते. त्यामुळे पोटदुखी, कावीळ, जळजळ, मळमळ यासारखे आजार होवू शकतात. त्यामुळे पावसाळ्यात सरळ पाणीपुरीच्या पुऱ्या घरी आणाव्यात आणि त्यासाठीच्या चटण्या घरी बनवून घरच्याघरी पाणीपुरीचा लिमिटेड आस्वाद घेणं जास्त चांगलं.

 

3) समोसा/ कचोरी.चटपटीत खावसं वाटलं की स्वस्तात मस्त समोसा आणि कचोरीचा पर्याय शोधला जातो. पण बाहेर गाड्यांवर जे समोसे आणि कचोऱ्या मिळतात ते तळताना वापरलेलं तेलं पुन्हा पुन्हा वापरलं जातं. अशा तेलाचे पदार्थ घात करतत. शिवाय समोस्यामध्ये बटाट्याच्या भाजीचं मिश्रण असतं. बऱ्याचदा सकाळपासून बनवलेली भाजी रात्री आठ वाजतासुध्दा समोसे करताना वापरली जाते. पावसाळ्याच्या आर्द्र वातावरणात बऱ्याचदा ती उतरते. तसेच समोसा आणि कचोरीच्या पारीसाठी मैदा वापरला जातो. मैदा सारखा पोटात जाणं हे पोटाच्या आरोग्यासाठी घातकच. त्यामुळे पावसाळ्यात समोसा कचोरी टाळलेली बरी. शिवाय समोसा कचोरी वारंवार खाण्यात आल्यास वजन वाढतं.

 

4) गाड्यांवरचं चायनीज फूडपावसाळ्याच्या काळात चायनीज फूड टाळलेलंच बरं. अशा गाड्यांवर चायनीज पदार्थ बनवताना अशुध्द पाणी वापरलं जातं. त्याचा त्रास होतो. शिवाय हे पदार्थ बनवताना अजिनोमोटो, भरपूर मसाले, रंगासाठी कृत्रिम रंग वापरले जातात. जे आरोग्यास अतिशय हानिकारक असतात. पोटदुखी, मळमळ, उलट्या, डायरिया यासारखे आजार चायनीज पदार्थांच्या अतिसेवनामुळे होतात. म्हणूनच गाड्यांवरचं चायनीज टाळून हुक्की आल्यास घरीच चायनीज बनवावं. अजिनोमोटोऐवजी आपलं मीठ वापरावं. आणि कृत्रिम रंग टाळावेत तसेच सॉसेसचा कमी वापर करावा. असं चायनीजही उत्तम लागतं.

 

5) पालेभाज्या.पालेभाज्या आरोग्यास उपयुक्त असतात. पण पावसाळ्यात नाही. पावसाळ्यात पालेभाज्या भरपूर मिळतात शिवाय पालेभाज्यांचे प्रकारही खूप मिळतात. पण या काळात पालेभाज्या जपून खाल्लेल्याच बऱ्या. पावसाळ्यत पालेभाज्यांना लागलेली माती ही हानिकारक असते. त्यात चिखलातले जंतू असतात. या जंतूंमुळे पोटाचे विकार होतात. त्यामुळे रोजच्या जेवणात पालेभाजी टाळावी. पालेभाजी चांगली धुवून मगच त्याची भाजी करावी.

 

6)गाड्यांवरची सरबतं.पावसाळ्याच्या काळात मुळातंच सरबत, फळांचे रस कमी प्रमाणात घ्यायचे असतात. आणि त्यातच जर गाड्यांवरचे ज्युसेस तर अवश्य टाळावीत. कारण गाड्यांवर ज्युसेस तयार करायला सोपं जावं म्हणून फळं आधीच सोलून कापून ठेवली जातात. पावसाळ्यात जास्त वेळ सोलून कापून ठेवलेली फळं हानिकारक ठरतात. अशा फळांच्या ज्युसेसमधून जंतूसंसर्ग होतो. त्यामुळे पावसाळ्यात सरबत, ज्युसेस टाळावीत. अख्खं फळं खाण्यास प्राधान्य द्यावं. फळं खातांना ती जास्त वेळे सोलून आणि कापून ठेवू नये.

 

7) कार्बोनेटेड शीत पेयंकार्बोनेटेड शीत पेयांमुळे शरीरातील खनिज द्रव्यं कमी होतात. ही पेयं पचनशक्तीचं कार्य बिघडवतात. पावसाळ्यात तर मुळातच पचनसंस्था मंदपणे काम करत असते. शरीरातून जास्त घाम द्रवत नाही. अशा परिस्थितीत ही शीत पेयं पिणं अनारोग्यदायी असतं.