शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 14:30 IST

Udhampur Airbase Pakistan Attack, Fact Check: केमिकल फॅक्टरीतील आगीचा जुना व्हिडीओ दाखवून करत होते दिशाभूल

Udhampur Airbase Pakistan Attack, Fact Check: पाकिस्तानच्या मदतीने दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये गोळीबार करत २६ निष्पाप हिंदूंची हत्या केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेपाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूर केले. त्यात दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त करण्यात आले. तसेच, सुमारे १०० दहशतवादीही मारले गेले. इतका मोठा धक्का देऊनही पाकिस्तानच्या नापाक कुरापती सुरूच आहेत. गेले २ दिवस अंधार पडल्यानंतर पाकिस्तानी सैन्याकडून भारताच्या सीमेलगतच्या भागांना लक्ष्य केले जात आहे. दुसरीकडे पाकिस्तानी मीडियाच्या माध्यामातून खोटे दावे करत जगाची आणि विशेषत: भारतीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण भारतीय सैन्यदल आणि सायबर विभाग पाकिस्तानचे दोन्ही आघाड्यांवरील हल्ले हाणून पाडत आहेत.

पाकिस्तानने उधमपूर एअरबेस उडवल्याचा दावा खोटा

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया म्हणजेच पीआयबीकडून सातत्याने विविध बातम्या आणि सोशल मीडिया पोस्ट यांच्या सतत्येची पडताळणी सुरु आहे. याचदरम्यान, एका न्यूज चॅनेलने दावा केला होता की, पाकिस्तानने भारतातील एक एअरबेस नेस्तनाबूत केला. पण तो दावा आणि बातमी खोटी असल्याचे पीआयबीने सांगितले आहे. तसेच, तो एअरबेस पूर्णपणे सुरक्षित असून, सध्या तेथे दैनंदिन कामकाज (IOperational) सुरु आहे असेही सांगण्यात आले.

भारताच्या PIB ने केली पाकिस्तानची पोलखोल

AIK न्यूज या वृत्तवाहिनीने लाईव्ह टीव्हीवर दावा केला होता की, पाकिस्तानने भारतात विविध हल्ले केले, त्यातील एका हल्ल्यात भारताच्या उधमपूरचा एअरबेस उद्ध्वस्त केला आहे. पण हा दावा साफ खोटा निघाला. त्या न्यूज चॅनेलने प्रसारित केलेले व्हिडीओ आणि आणखी काही सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडीओ हे उधमपूर एअरबेसचे नाहीत. राजस्थानच्या हनुमानगड परिसरातील एका केमिकल फॅक्टरीला काही काळापूर्वी आग लागली होती. त्याचा व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने प्रसारित केला जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या व्हिडीओ सध्या सुरु असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाशी काहीही संबंध नाही, असे PIB ने स्पष्टपणे सांगितले आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानी सैन्याकडून अंधार पडल्यानंतर हल्ले करण्याचा सपाटा सुरू आहे. भारतीय सैन्य त्यांचे हल्ले परतवून लावत आहे. याचदरम्यान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF ने पाकिस्तानला मोठ्या रकमेचे कर्ज मंजूर केले आहे. त्यामुळे या युद्धाची तीव्रता आणखी किती वाढेल, याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान