शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 13:11 IST

देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. आज सहाव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. दरम्यान, मनोज तिवारी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Claim Review : ईशान्य दिल्लीतील भाजपचे उमेदवार मनोज तिवारी यांनी मतदानापूर्वीच आपला पराभव स्वीकारला.
Claimed By : Facebook And X Users
Fact Check : चूक

Created By: BoomTranslated By: ऑनलाइन लोकमत

देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. आज सहाव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. निवडणुकीदरम्यान सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काही दिवसापासून ईशान्य दिल्लीतील भाजपचे उमेदवार मनोज तिवारी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  या व्हिडीओत, लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच त्यांनी आपला पराभव स्वीकारला असल्याचा दावा करण्यात आला आहे.

बुमला ला हा दावा दिशाभूल करणारा वाटला. व्हायरल व्हिडीओ मूळ संदर्भ सोडून शेअर केला जात आहे. संपूर्ण व्हिडिओमध्ये मनोज तिवारी २००९ मध्ये गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याबाबत सांगत होते आणि त्यांना पराभवाची भावना असल्याचे सांगत होते. २००९ मध्ये मनोज तिवारी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत होते. 

या ११ सेकंदाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मनोज तिवारी "मला माझ्या पराभवाची जाणीव झाली आहे. दुःख गोष्टीचं वाटत आहे की, मी खूप दिवसांपासून जिंकत होतो आणि आता हा पराभव स्वीकारला आहे." 

हा एडीट केलेला व्हिडीओ शेअर करताना सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका यूजरने लिहिले की, 'रिंकियाच्या वडिलांनी आपला पराभव स्वीकारला आहे. आता त्यांच्या समर्थकांनी शांत बसून त्यांची गाणी ऐकावीत.

पोस्टची आर्काइव लिंक

फॅक्ट चेक-

व्हायरल व्हिडिओमध्ये न्यूज आउटलेट जिस्टचा लोगो होता. व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही जिस्टच्या अधिकृत YouTube चॅनेलवर गेलो. तेथे आम्हाला ३१ मार्च २०२४ रोजी अपलोड केलेला मूळ व्हिडीओ सापडला.

एक तास १० मिनिटांच्या या मूळ व्हिडिओमध्ये २७ मिनिटांनंतर पत्रकार त्यांना गोरखपूर मतदारसंघातून योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा किस्सा विचारतो. आपल्या आयुष्यातील हा एक रंजक प्रसंग असल्याचे सांगताना मनोज तिवारी म्हणतात, "अमर सिंह जी यांनी यासाठी माझ्याशी संपर्क साधला होता. २००९ च्या निवडणुकीपूर्वी, अमिताभ बच्चन यांच्या घरी यासाठी एक बैठक झाली होती, यामध्ये अनिल अंबानी देखील उपस्थित होते. निवडणूक लढवायची इच्छा नव्हती पण ठामपणे नाही म्हणू शकलो नाही.

"निवडणूक लढवायची नव्हती कारण योगी आदित्यनाथ यांचे समर्थक होतो आणि विद्यार्थीदशेत  ABVP कार्यकर्ताही होतो, असंही ते म्हणाले. ही संपूर्ण घटना सांगताना मनोज तिवारी ३४ मिनिटांच्या व्हिडीओमध्ये म्हणतात, "निवडणुका संपल्याबरोबर आम्हाला आमचा पराभव समजला. पण दुःखाची गोष्ट म्हणजे मी खूप दिवसांपासून जिंकत होतो आणि हा पराभव झाला"

संपूर्ण व्हिडीओ पाहून हे स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडीओ फक्त अपूर्णच नाही तर त्यात काही कटही आहेत, त्यात मनोज तिवारी यांच्या संभाषणातील 'था' हा शब्द भ्रामक दावा करण्याच्या उद्देशाने कापण्यात आला आहे. ते सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात पराभवाचा उल्लेख करत नव्हते तर २००९ मध्ये योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात लढलेल्या निवडणुकीच्या संदर्भात ते बोलत होते. 

यासाठी आम्ही मुलाखत घेत असलेले पत्रकार अनिल शारदा यांच्याशीही संपर्क साधला. त्यांनी बूमला सांगितले की, "२००९ मध्ये जेव्हा सपा विरुद्ध योगी आदित्यनाथ यांच्यात लढण्याची चर्चा होती, तेव्हा ते म्हणाले होते की मला माझ्या पराभवाची जाणीव झाली आहे." 

२००९ मध्ये मनोज तिवारी यांनी गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. यावेळी ते भाजपचे उमेदवार योगी आदित्यनाथ यांच्याकडून निवडणूक हरले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मनोज तिवारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

(सदर फॅक्ट चेक Boom या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाdelhiदिल्ली