शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादम्यान भारत आणि बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये वाद? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 17:28 IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान, भारत-बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये वाद झाल्याचा दावा

Claim Review : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान, भारत-बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये वाद झाल्याचा दावा
Claimed By : Social Media User
Fact Check : चूक

Created By: BOOMTranslated By: ऑनलाइन लोकमत

Fact Check: चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान २० फेब्रुवारी रोजी झालेल्या भारत-बांगलादेश सामन्यात दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी भिडल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतून केला जात आहे.

व्हायरल व्हिडिओबाबत करण्यात येत असलेला दावा खोटा असल्याचे बूमच्या तपासात आढळून आला आहे. व्हायरल व्हिडिओ अंडर-१९ विश्वचषक २०२० चा आहे. अंतिम सामन्यात बांगलादेशच्या विजयानंतर खेळाडूंमधील जोरदार वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे आयोजन १९ फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि युएईद्वारे केले गेलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी अंतर्गत भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना २० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. भारताने हा सामना सहा विकेटने जिंकला.

एका फेसबुक यूजरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये भारत आणि बांगलादेश संघाचे खेळाडू एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत. खेळाडूंमधील हाणामारीचा हा व्हिडिओ २० फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या भारत-बांगलादेश क्रिकेट सामन्यातील असल्याचा दावा या व्हायरल व्हिडीओसोबत केला आहे.

अर्काईव्ह लिंक

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरही व्हायरल झाला आहे.

अर्काईव्ह लिंक

फॅक्ट चेक

व्हायरल व्हिडिओ तपासण्यासाठी, व्हिडिओच्या फ्रेफला गुगलवर रिव्हर्स इमेजमध्ये सर्च केले. या सर्चदरम्यान व्हायरल व्हिडिओशी संबंधित बातम्या  सापडल्या.

माध्यमांच्या वृत्तानुसार, व्हायरल झालेला व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेत झालेल्या अंडर-१९ वर्ल्ड कप २०२० च्या अंतिम सामन्याचा आहे.

१० फेब्रुवारी २०२० च्या नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार, ९ फेब्रुवारी रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना झाला. या सामन्यात बांगलादेशने भारताचा ३ गडी राखून पराभव करत पहिल्यांदाच आयसीसी अंडर-१९ विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. व्हायरल व्हिडिओ देखील नवभारत टाइम्सच्या बातमीत एम्बेड करण्यात आला आहे.

वृत्तानुसार, बांगलादेशच्या संघाने विजयी धावा काढताच बांगलादेशचे खेळाडू खूप उत्साहित झाले आणि मैदानावर धावत सुटले.

अमर उजालाच्या बातमीनुसार, विजयानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंशी गैरवर्तन केले. बांगलादेशच्या एका खेळाडूने भारतीय संघाच्या खेळाडूसमोर उभं राहून प्रक्षोभक वक्तव्य करण्यास सुरुवात केली. वातावरण तापत असल्याचे पाहून अंपायरने हस्तक्षेप केला.

यूट्यूबवर यासंदर्भातील कीवर्ड सर्च केले असता ९ फेब्रुवारी २०२० रोजी डी-क्रिकेट चॅनेलवर अपलोड केलेल्या खेळाडूंमधील भांडणाच्या घटनेचा हा व्हिडिओ सापडला.

या घटनेबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बांगलादेशच्या अंडर-१९ क्रिकेट संघाचा कर्णधार अकबर अलीनेही खेद व्यक्त केला होता. "आमचे काही गोलंदाज भावूक आणि अधिकच उत्साहित झाले होते. सामन्यानंतर जे घडले ते दुर्दैवी आहे, असे घडायला नको होते," असं त्याने म्हटलं.

या संपूर्ण घटनेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कारवाई केली. हिंदुस्थानच्या वृत्तानुसार, आयसीसीने ५ खेळाडूंना (२ भारतीय आणि ३ बांगलादेशी) आचारसंहितेच्या तिसऱ्या स्तराचे उल्लंघन केल्याबद्दल फटकारले आणि त्यांच्या खात्यांमध्ये डी-मेरिट गुण जोडले.

यासंदर्भात सध्या चालू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे कव्हरेज करत असलेल्या क्रिकेट पत्रकार विमल कुमार यांच्याशी संवाद साधला. २० फेब्रुवारी रोजी झालेल्या भारत-बांगलादेश सामन्यात खेळाडूंमध्ये वाद झाल्याची कोणतीही घटना घडली नसल्याचे त्यांनी सांगितले.

(सदर फॅक्ट चेक BOOM या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.) 

टॅग्स :Team Indiaभारतीय क्रिकेट संघBangladeshबांगलादेशSocial Viralसोशल व्हायरल