शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादम्यान भारत आणि बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये वाद? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 17:28 IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान, भारत-बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये वाद झाल्याचा दावा

Claim Review : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान, भारत-बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये वाद झाल्याचा दावा
Claimed By : Social Media User
Fact Check : चूक

Created By: BOOMTranslated By: ऑनलाइन लोकमत

Fact Check: चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान २० फेब्रुवारी रोजी झालेल्या भारत-बांगलादेश सामन्यात दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी भिडल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतून केला जात आहे.

व्हायरल व्हिडिओबाबत करण्यात येत असलेला दावा खोटा असल्याचे बूमच्या तपासात आढळून आला आहे. व्हायरल व्हिडिओ अंडर-१९ विश्वचषक २०२० चा आहे. अंतिम सामन्यात बांगलादेशच्या विजयानंतर खेळाडूंमधील जोरदार वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे आयोजन १९ फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि युएईद्वारे केले गेलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी अंतर्गत भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना २० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. भारताने हा सामना सहा विकेटने जिंकला.

एका फेसबुक यूजरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये भारत आणि बांगलादेश संघाचे खेळाडू एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत. खेळाडूंमधील हाणामारीचा हा व्हिडिओ २० फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या भारत-बांगलादेश क्रिकेट सामन्यातील असल्याचा दावा या व्हायरल व्हिडीओसोबत केला आहे.

अर्काईव्ह लिंक

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरही व्हायरल झाला आहे.

अर्काईव्ह लिंक

फॅक्ट चेक

व्हायरल व्हिडिओ तपासण्यासाठी, व्हिडिओच्या फ्रेफला गुगलवर रिव्हर्स इमेजमध्ये सर्च केले. या सर्चदरम्यान व्हायरल व्हिडिओशी संबंधित बातम्या  सापडल्या.

माध्यमांच्या वृत्तानुसार, व्हायरल झालेला व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेत झालेल्या अंडर-१९ वर्ल्ड कप २०२० च्या अंतिम सामन्याचा आहे.

१० फेब्रुवारी २०२० च्या नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार, ९ फेब्रुवारी रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना झाला. या सामन्यात बांगलादेशने भारताचा ३ गडी राखून पराभव करत पहिल्यांदाच आयसीसी अंडर-१९ विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. व्हायरल व्हिडिओ देखील नवभारत टाइम्सच्या बातमीत एम्बेड करण्यात आला आहे.

वृत्तानुसार, बांगलादेशच्या संघाने विजयी धावा काढताच बांगलादेशचे खेळाडू खूप उत्साहित झाले आणि मैदानावर धावत सुटले.

अमर उजालाच्या बातमीनुसार, विजयानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंशी गैरवर्तन केले. बांगलादेशच्या एका खेळाडूने भारतीय संघाच्या खेळाडूसमोर उभं राहून प्रक्षोभक वक्तव्य करण्यास सुरुवात केली. वातावरण तापत असल्याचे पाहून अंपायरने हस्तक्षेप केला.

यूट्यूबवर यासंदर्भातील कीवर्ड सर्च केले असता ९ फेब्रुवारी २०२० रोजी डी-क्रिकेट चॅनेलवर अपलोड केलेल्या खेळाडूंमधील भांडणाच्या घटनेचा हा व्हिडिओ सापडला.

या घटनेबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बांगलादेशच्या अंडर-१९ क्रिकेट संघाचा कर्णधार अकबर अलीनेही खेद व्यक्त केला होता. "आमचे काही गोलंदाज भावूक आणि अधिकच उत्साहित झाले होते. सामन्यानंतर जे घडले ते दुर्दैवी आहे, असे घडायला नको होते," असं त्याने म्हटलं.

या संपूर्ण घटनेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कारवाई केली. हिंदुस्थानच्या वृत्तानुसार, आयसीसीने ५ खेळाडूंना (२ भारतीय आणि ३ बांगलादेशी) आचारसंहितेच्या तिसऱ्या स्तराचे उल्लंघन केल्याबद्दल फटकारले आणि त्यांच्या खात्यांमध्ये डी-मेरिट गुण जोडले.

यासंदर्भात सध्या चालू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे कव्हरेज करत असलेल्या क्रिकेट पत्रकार विमल कुमार यांच्याशी संवाद साधला. २० फेब्रुवारी रोजी झालेल्या भारत-बांगलादेश सामन्यात खेळाडूंमध्ये वाद झाल्याची कोणतीही घटना घडली नसल्याचे त्यांनी सांगितले.

(सदर फॅक्ट चेक BOOM या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.) 

टॅग्स :Team Indiaभारतीय क्रिकेट संघBangladeshबांगलादेशSocial Viralसोशल व्हायरल