शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

यावर्षी होणार 'ट्री व्हॅलेंटाईन'; पहिल्या वृक्षसंमेलन अध्यक्षपदी असणार वटवृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 13:18 IST

वृक्षसंवर्धन जागृतीसाठी पहिले संमेलन १३ व १४ फेबु्रवारी रोजी बीडमधील पालवनला 

ठळक मुद्दे बीडमधील पालवन येथे १३ व १४ फेबु्रवारी रोजी होणार पाहिले वृक्ष संमेलनदरवर्षी याचदिवशी वृक्ष संमेलन संमेलन होणार

औरंगाबाद : बीडमधील पालवन येथे १३ व १४ फेबु्रवारी रोजी होणाऱ्या पहिल्या वृक्ष संमेलनाचे अध्यक्षपद हे वटवृक्षाकडे असणार आहे. दोनदिवसीय संमेलनाचा समारोप व्हॅलेंटाईन डे दिवशी होणार आहे. ट्री व्हॅलेंटाईन ही संकल्पना रुजावी, असा संदेश त्या दिवशी संमेलनातून देण्यात असल्याचे संमेलन आयोजक सह्याद्री देवराईचे सर्वेसर्वा अभिनेता सयाजी शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

यावेळी अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे, साहित्यिक अरविंद जगताप, शिवराम बोडखे, महेश नागपूरकर, विजय शिंदे, संजय तांबे आदींची उपस्थिती होती. शिंदे म्हणाले, वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी जनजागृतीच्या उद्देशाने हा प्रयत्न केला जात आहे. रॉक गार्डन, मियावॉकी पार्क या संकल्पनेचा विचार करून वृक्षलागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. वृक्षदिंडी, बिया, पाने, झाडांचे प्रकार, वड, उंबर, जांभूळ वृक्षांची पालखीने संमलेनास सुरुवात होईल. वृक्ष, फुलपाखरे, पक्षी, वृक्ष आणि रोपवाटिका यातील करिअर, गवतांच्या जाती, जलव्यवस्थापन याबाबींवर विद्यार्थ्यांना संमेलनात २० हून अधिक तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळेल.    संमेलनासाठी विभागीय आयुक्तालय, वनविभागाचे सहकार्य असेल.  अप्पर आयुक्त टाकसाळे यांनी मराठवाड्यातील जंगल ४ टक्के असल्याचे सांगून आगामी काळात परिस्थिती भीषण होईल, असे भाकीत केले. साहित्यिक जगताप यांनी संमलेनामागील भूमिका विशद केली. 

दरवर्षी याचदिवशी संमेलनव्हॅलेंटाईन डे च्या दिवशी झाडाला टॅग बांधायचा आहे. झाडांसोबत तो दिवस साजरा करण्याची परंपरा झाली, तर मराठवाडा नंदनवन होईल. त्यामुळे यापुढे दरवर्षी या दोन दिवशी संमेलन होईल. २५ एकर परिसरात संमेलन असेल. ऊन-सावलीचे व्यासपीठ, प्रदर्शन स्टॉल, वृक्ष व्हॅन, झाडांची मिरवणूक, ग्रीन आर्मी आदींचे आयोजन येथे असेल.

माणसं झाडांच्या वाईटावरकार्बन शोषून प्राणवायू देणाऱ्या झाडांच्या वाईटावर माणसे उठली आहेत. झाड आॅक्सिजन देताना कधीच भेदभाव करीत नाही. झाड लावण्याचे फॅड सध्या आले आहे; परंतु ते जगविण्याचा विचार कुणी करीत नाही. सह्याद्री देवराई वृक्षरोपणानंतर किती रोपांची वाढ झाली, ते मोठे झाले. याची पूर्ण माहिती ठेवण्यात येईल, असा दावा शिंदे यांनी यावेळी केला. 

टॅग्स :sayaji shindeसयाजी शिंदेenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषणAurangabadऔरंगाबादBeedबीड