शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

World Environment Day : जंगलाचे प्रमाण कमी असल्याने पर्यावरणाचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 10:48 IST

पर्यावरणातील विविध घटकांचा दिवसेंदिवस ºहास होत असल्याने त्याचा परिणाम निसर्गचक्रातील विविध घटकांवर होत आहे.

- सदानंद सिरसाट  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पर्यावरणातील विविध घटकांचा दिवसेंदिवस ºहास होत असल्याने त्याचा परिणाम निसर्गचक्रातील विविध घटकांवर होत आहे. सतत वाढणारे तापमान, पावसाच्या प्रमाणात होणारी घट, सातत्याने येणारी नैसर्गिक आपत्ती हा त्याचाच परिणाम असल्याने किमान आता तरी पर्यावरणातील घटकांचे जतन करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी जंगल, जीवभूरसायन चक्राचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची जाणीव जागृती निर्माण करणे, त्यासाठीचा प्रयत्न जागतिक पर्यावरण दिनापासून सुरू व्हायला हवा.नागरिकांनी असेच सुस्त राहून पर्यावरणाच्या होणाऱ्या ºहासाकडे दुर्लक्ष केल्यास सजीवसृष्टीसह मानवी अस्तित्व धोक्यात यायला वेळ लागणार नाही. त्याचे काही पडसाद आताच उमटत आहेत. गत दहा वर्षांत जिल्ह्याच्या तापमान, पाऊसमानात झालेला बदल पाहता पर्यावरणात झपाट्याने झालेले बदल दिसून येतात.जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण पाहता ते नगण्य आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र पाहता ५६७३ चौ. किमी आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक जिल्हा, राज्य, देशात किमान ३३ टक्के जंगल असणे अनिवार्य आहे. अकोला जिल्ह्यात केवळ ३४०.३७ चौ. किमी क्षेत्रावर जंगल आहे. त्याची टक्केवारी केवळ ६ आहे. त्यातही घनदाट जंगल केवळ ११ चौ. किमी क्षेत्रातच आहे. मध्यम स्वरूपाचे १०८, खुले जंगल २२० चौ. किमी क्षेत्रात आहे. वाढती लोकसंख्या, हवा, पाणी, ध्वनीचे वाढलेले प्रदूषण पाहता हे प्रमाण किती व्यस्त आहे, याचा विचारही शासन, प्रशासन, सामान्य नागरिकांनी अद्यापही न केल्याने पर्यावरणाचा होत असलेल्या घात नजीकच्या काळात विध्वंसक ठरणारा आहे.

शहरात हरितपट्ट्यांची निर्मितीअकोला शहरातील प्रदूषण पाहता मोठ्या प्रमाणात वृक्षांची गरज आहे. हवेतील कार्बन, सल्फर डायआॅक्साइडचे वाढते प्रमाण त्या तुलनेत आॅक्सिजनचे कमी होत जाणारे प्रमाण चिंताजनक ठरणार आहे. त्यासाठी शहरात हरितपट्ट्यांची निर्मिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. असाच एक प्रयत्न जुने शहरातील हरिहरपेठ परिसरात झाला आहे. चार एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षांचे संवर्धन झाले आहे. त्यातून नागरिकांसाठी प्राणवायूची निर्मिती होत आहे.वने, वन्यजीवांचे संवर्धनही आवश्यकपर्यावरणाची साखळी टिकवून ठेवण्यासाठी वने आणि वन्यजीवांचे संवर्धन करणेही तेवढेच आवश्यक आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्यात वन्य जीवांची काळजी घेण्यासाठी पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली. तसेच अवैध चराई, जंगलातील घुसखोरी, लगतच्या बाजूंनी होणारे अतिक्रमण थांबवण्यात आले आहे. परिणामी, या अभयारण्यात प्राणी, वनस्पती, कुरणाचे प्रमाण बºयापैकी वाढले आहे.पर्यावरणातील अन्नसाखळी व इतरही घटकांचे संवर्धन न झाल्यास नैसर्गिक आपत्तीचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ते धोके टाळण्यासाठी मानवाने पर्यावरण अर्थात निसर्गातील घटकांचे संवर्धन करण्याला युद्धपातळीवर प्रयत्न करणे, ही काळाची गरज आहे.- मनोजकुमार खैरनार, विभागीय वनाधिकारी, वन्यजीव, अकोला.

 

 

टॅग्स :Akolaअकोलाenvironmentपर्यावरणWorld Environment DayWorld Environment Day