शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

World Environment Day : जंगलाचे प्रमाण कमी असल्याने पर्यावरणाचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 10:48 IST

पर्यावरणातील विविध घटकांचा दिवसेंदिवस ºहास होत असल्याने त्याचा परिणाम निसर्गचक्रातील विविध घटकांवर होत आहे.

- सदानंद सिरसाट  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पर्यावरणातील विविध घटकांचा दिवसेंदिवस ºहास होत असल्याने त्याचा परिणाम निसर्गचक्रातील विविध घटकांवर होत आहे. सतत वाढणारे तापमान, पावसाच्या प्रमाणात होणारी घट, सातत्याने येणारी नैसर्गिक आपत्ती हा त्याचाच परिणाम असल्याने किमान आता तरी पर्यावरणातील घटकांचे जतन करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी जंगल, जीवभूरसायन चक्राचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची जाणीव जागृती निर्माण करणे, त्यासाठीचा प्रयत्न जागतिक पर्यावरण दिनापासून सुरू व्हायला हवा.नागरिकांनी असेच सुस्त राहून पर्यावरणाच्या होणाऱ्या ºहासाकडे दुर्लक्ष केल्यास सजीवसृष्टीसह मानवी अस्तित्व धोक्यात यायला वेळ लागणार नाही. त्याचे काही पडसाद आताच उमटत आहेत. गत दहा वर्षांत जिल्ह्याच्या तापमान, पाऊसमानात झालेला बदल पाहता पर्यावरणात झपाट्याने झालेले बदल दिसून येतात.जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण पाहता ते नगण्य आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र पाहता ५६७३ चौ. किमी आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक जिल्हा, राज्य, देशात किमान ३३ टक्के जंगल असणे अनिवार्य आहे. अकोला जिल्ह्यात केवळ ३४०.३७ चौ. किमी क्षेत्रावर जंगल आहे. त्याची टक्केवारी केवळ ६ आहे. त्यातही घनदाट जंगल केवळ ११ चौ. किमी क्षेत्रातच आहे. मध्यम स्वरूपाचे १०८, खुले जंगल २२० चौ. किमी क्षेत्रात आहे. वाढती लोकसंख्या, हवा, पाणी, ध्वनीचे वाढलेले प्रदूषण पाहता हे प्रमाण किती व्यस्त आहे, याचा विचारही शासन, प्रशासन, सामान्य नागरिकांनी अद्यापही न केल्याने पर्यावरणाचा होत असलेल्या घात नजीकच्या काळात विध्वंसक ठरणारा आहे.

शहरात हरितपट्ट्यांची निर्मितीअकोला शहरातील प्रदूषण पाहता मोठ्या प्रमाणात वृक्षांची गरज आहे. हवेतील कार्बन, सल्फर डायआॅक्साइडचे वाढते प्रमाण त्या तुलनेत आॅक्सिजनचे कमी होत जाणारे प्रमाण चिंताजनक ठरणार आहे. त्यासाठी शहरात हरितपट्ट्यांची निर्मिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. असाच एक प्रयत्न जुने शहरातील हरिहरपेठ परिसरात झाला आहे. चार एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षांचे संवर्धन झाले आहे. त्यातून नागरिकांसाठी प्राणवायूची निर्मिती होत आहे.वने, वन्यजीवांचे संवर्धनही आवश्यकपर्यावरणाची साखळी टिकवून ठेवण्यासाठी वने आणि वन्यजीवांचे संवर्धन करणेही तेवढेच आवश्यक आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्यात वन्य जीवांची काळजी घेण्यासाठी पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली. तसेच अवैध चराई, जंगलातील घुसखोरी, लगतच्या बाजूंनी होणारे अतिक्रमण थांबवण्यात आले आहे. परिणामी, या अभयारण्यात प्राणी, वनस्पती, कुरणाचे प्रमाण बºयापैकी वाढले आहे.पर्यावरणातील अन्नसाखळी व इतरही घटकांचे संवर्धन न झाल्यास नैसर्गिक आपत्तीचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ते धोके टाळण्यासाठी मानवाने पर्यावरण अर्थात निसर्गातील घटकांचे संवर्धन करण्याला युद्धपातळीवर प्रयत्न करणे, ही काळाची गरज आहे.- मनोजकुमार खैरनार, विभागीय वनाधिकारी, वन्यजीव, अकोला.

 

 

टॅग्स :Akolaअकोलाenvironmentपर्यावरणWorld Environment DayWorld Environment Day