शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

World Environment Day : जंगलाचे प्रमाण कमी असल्याने पर्यावरणाचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 10:48 IST

पर्यावरणातील विविध घटकांचा दिवसेंदिवस ºहास होत असल्याने त्याचा परिणाम निसर्गचक्रातील विविध घटकांवर होत आहे.

- सदानंद सिरसाट  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पर्यावरणातील विविध घटकांचा दिवसेंदिवस ºहास होत असल्याने त्याचा परिणाम निसर्गचक्रातील विविध घटकांवर होत आहे. सतत वाढणारे तापमान, पावसाच्या प्रमाणात होणारी घट, सातत्याने येणारी नैसर्गिक आपत्ती हा त्याचाच परिणाम असल्याने किमान आता तरी पर्यावरणातील घटकांचे जतन करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी जंगल, जीवभूरसायन चक्राचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची जाणीव जागृती निर्माण करणे, त्यासाठीचा प्रयत्न जागतिक पर्यावरण दिनापासून सुरू व्हायला हवा.नागरिकांनी असेच सुस्त राहून पर्यावरणाच्या होणाऱ्या ºहासाकडे दुर्लक्ष केल्यास सजीवसृष्टीसह मानवी अस्तित्व धोक्यात यायला वेळ लागणार नाही. त्याचे काही पडसाद आताच उमटत आहेत. गत दहा वर्षांत जिल्ह्याच्या तापमान, पाऊसमानात झालेला बदल पाहता पर्यावरणात झपाट्याने झालेले बदल दिसून येतात.जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण पाहता ते नगण्य आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र पाहता ५६७३ चौ. किमी आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक जिल्हा, राज्य, देशात किमान ३३ टक्के जंगल असणे अनिवार्य आहे. अकोला जिल्ह्यात केवळ ३४०.३७ चौ. किमी क्षेत्रावर जंगल आहे. त्याची टक्केवारी केवळ ६ आहे. त्यातही घनदाट जंगल केवळ ११ चौ. किमी क्षेत्रातच आहे. मध्यम स्वरूपाचे १०८, खुले जंगल २२० चौ. किमी क्षेत्रात आहे. वाढती लोकसंख्या, हवा, पाणी, ध्वनीचे वाढलेले प्रदूषण पाहता हे प्रमाण किती व्यस्त आहे, याचा विचारही शासन, प्रशासन, सामान्य नागरिकांनी अद्यापही न केल्याने पर्यावरणाचा होत असलेल्या घात नजीकच्या काळात विध्वंसक ठरणारा आहे.

शहरात हरितपट्ट्यांची निर्मितीअकोला शहरातील प्रदूषण पाहता मोठ्या प्रमाणात वृक्षांची गरज आहे. हवेतील कार्बन, सल्फर डायआॅक्साइडचे वाढते प्रमाण त्या तुलनेत आॅक्सिजनचे कमी होत जाणारे प्रमाण चिंताजनक ठरणार आहे. त्यासाठी शहरात हरितपट्ट्यांची निर्मिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. असाच एक प्रयत्न जुने शहरातील हरिहरपेठ परिसरात झाला आहे. चार एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षांचे संवर्धन झाले आहे. त्यातून नागरिकांसाठी प्राणवायूची निर्मिती होत आहे.वने, वन्यजीवांचे संवर्धनही आवश्यकपर्यावरणाची साखळी टिकवून ठेवण्यासाठी वने आणि वन्यजीवांचे संवर्धन करणेही तेवढेच आवश्यक आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्यात वन्य जीवांची काळजी घेण्यासाठी पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली. तसेच अवैध चराई, जंगलातील घुसखोरी, लगतच्या बाजूंनी होणारे अतिक्रमण थांबवण्यात आले आहे. परिणामी, या अभयारण्यात प्राणी, वनस्पती, कुरणाचे प्रमाण बºयापैकी वाढले आहे.पर्यावरणातील अन्नसाखळी व इतरही घटकांचे संवर्धन न झाल्यास नैसर्गिक आपत्तीचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ते धोके टाळण्यासाठी मानवाने पर्यावरण अर्थात निसर्गातील घटकांचे संवर्धन करण्याला युद्धपातळीवर प्रयत्न करणे, ही काळाची गरज आहे.- मनोजकुमार खैरनार, विभागीय वनाधिकारी, वन्यजीव, अकोला.

 

 

टॅग्स :Akolaअकोलाenvironmentपर्यावरणWorld Environment DayWorld Environment Day