शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

राजाराम तलावासभोवती जगवली झाडे, मॉर्निंग वॉकच्या गटाने केली किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 16:46 IST

environment Tree WildLife Kolhapur- वृक्षसंवर्धनाच्या नावाखाली अनेकदा दिखावा केला जातो. मात्र, नियमित फिरण्यासाठी येणाऱ्या विविध समूहातील व्यक्तींनी सातत्याने दोन वर्षांहून अधिक काळ येथील राजाराम तलावाभोवती लावलेल्या रोपांना पाणी घालून जगविले आहे. एकमेकांची ओळखही नसताना केवळ वृक्षसंवर्धनासाठी हा गट आता एक झाला आहे.

ठळक मुद्देराजाराम तलावासभोवती जगवली झाडेमॉर्निंग वॉकच्या गटाने केली किमया

संदीप आडनाईककोल्हापूर : वृक्षसंवर्धनाच्या नावाखाली अनेकदा दिखावा केला जातो. मात्र, नियमित फिरण्यासाठी येणाऱ्या विविध समूहातील व्यक्तींनी सातत्याने दोन वर्षांहून अधिक काळ येथील राजाराम तलावाभोवती लावलेल्या रोपांना पाणी घालून जगविले आहे. एकमेकांची ओळखही नसताना केवळ वृक्षसंवर्धनासाठी हा गट आता एक झाला आहे.कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ, राजाराम तलाव, कृषी कॉलेज परिसरात अनेकजण फिरायला येतात. असे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या कोल्हापुरात कमी नाही; परंतु स्वत:च्या आरोग्यासोबत पर्यावरणाचीही काळजी घ्यावी, असा विचार करणाऱ्यांची संख्याही हाताच्या बोटावर मोजता येईल इतकीच आहे. अशा पर्यावरणप्रेमींमध्ये प्रत्यक्ष कृती करणारा एक गट सध्या कौतुकास पात्र ठरला आहे.सातत्याने राजाराम तलावावर पोहायला येणाऱ्यांनी पाटबंधारे खात्याच्या दीड किलोमीटर परिसरातील ओसाड जागेत झाडे लावण्याचा निर्णय घेतला आणि दोन वर्षांपासून प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास प्रारंभ केला.

पाच ते सहा जणांपासून आता हा गट सायकलवरून पाच लिटरच्या सुमारे ३० कॅनने रोज सकाळी ६ ते ८ या वेळेत तलावातील पाणी उपसून परिसरात लावलेल्या रोपांना घालण्यास त्यांनी सुरुवात केली. प्रारंभी समीर नरेंद्र मेहता यांनी फिरायला जाताना एकट्याने वाटेवरच्या झाडांना पाणी घालण्यास सुरुवात केली. त्यांना असेच काम करणारे धनंजय वाडकर भेटले. मग विजय शिंदे, दत्ता पवार, सुधाकर कुंभार, मंगेश जनार्दन पाटोळे, विठ्ठल बसप्पा भागोजी आदी पर्यावरणप्रेमी स्वयंस्फूर्तीने त्यांच्या कामात मदत करत गेले.

हाताने पाणी उपसण्यासाठी लागणारी मेहनत पाहून फिरायला येणारे आर्किटेक्चर सूरत जाधव यांनी ट्रेडर पंप देणगी म्हणून दिला. या पंपद्वारे आता साडेतीनशे फूट पाइपच्या साहाय्याने २० फूट अंतरापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या झाडांना पाणी देता येऊ लागले.ही झाडे जगवलीपरिसरातील माळावर पूर्वी लावलेली तसेच नव्याने लावलेल्या रोपांना हा गट लॉकडाऊनच्या आधीपासून सातत्याने पाणी घालत आला आहे. मार्च, एप्रिलमध्ये करंजी, रेनट्री, बहावा, रामफळ, लिंबू अशा जंगली झाडांच्या सुमारे पाचशे ते सहाशे बिया जमा करून येथे सुमारे १००० झाडे लावली आहेत. या गटाने परिसरात येणारी जनावरे खाऊ शकणार नाहीत, अशी करंजीची ९० टक्के रोपे जगवून दोन वर्षांत मोठी केली आहेत. 

टॅग्स :environmentपर्यावरणwildlifeवन्यजीवkolhapurकोल्हापूर