शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

किमान ऑक्सिजनसाठी तरी मुंबईतील जंगल टिकवा; पर्यावरणप्रेमींचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 10:38 IST

जागतिक जैवविविधता दिन विशेष - मुंबईत गवताळ कुरणे आहेत. येथे किडे असतात. त्यांना खाण्यासाठी पक्षी येतात. हेही एका अर्थाने वन्यजीव आहेत.

सचिन लुंगसेमुंबई :  मुंबईत नव्याने रस्ते बांधले जात नसले तरी रस्त्यांच्या दुस्तीसह प्रकल्प आणि इतर कामांसाठी २०१८ साली १२ हजार आणि २०१९ साली १४ हजार झाडांवर संकट ओढावले आहे. मिठी नदीलगतची जैवविविधताही नष्ट झाली आहे. आता आपण जैवविविधता टिकविण्यासाठी काम केले पाहिजे. कारण १८ लाखांपैकी १० लाख पेशी धोक्यात आल्या आहेत. किमान ऑक्सिजनसाठी तरी मुंबईतील जंगल टिकवा, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.

मुंबईत गवताळ कुरणे आहेत. येथे किडे असतात. त्यांना खाण्यासाठी पक्षी येतात. हेही एका अर्थाने वन्यजीव आहेत. पाणथळ जागा, तलाव यांचे रक्षण केले पाहिजे. येथे मोठ्या संख्येने वन्यजीव आढळतात. वन्य जीवांमध्ये सर्पदेखील येतात. एकट्या मुंबईमध्ये किमान ४० प्रजातींचे सर्प आढळतात. पवई तलाव १८९० साली बांधून पूर्ण झाले, त्यावेळी ते ३७० एकर परिसरात पसरलेले होते. पावसात पाणी वाहून १७ हजार एकर पाणलोट क्षेत्र वाढायचे. ५० वर्षांपूर्वी येथे आढळणारी जैवविविधता आता आढळत नाही. बोरिवली नॅशनल पार्क, धारावी येथील निसर्ग उद्यान येथे प्राणी-पक्षी पाहण्यास मिळतात. माहीम, भांडुप, शिवडी, वांद्रे येथे दलदलीचे प्रदेश आहेत; तेथे जैवविविधता आहे. जैवविविधता हा जंगलाचा भाग आहे. ती जपणे ही काळाची गरज असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितले.

...अन् मुंबईतील जैवविविधतेचा झाला ऱ्हास

३० वर्षांत मुंबईत असलेले ४२ टक्के जंगल नष्ट झाले.४० वर्षांत मुंबईतील हिरवळ सुमारे ६० टक्क्यांनी कमी झाली.२० वर्षांत येथील ८८ प्रभागांपैकी ६८ प्रभागांतील हिरवळ कमी झाली.१३ टक्के हिरवळ शिल्लक आहे.गोरेगावात २००१ मध्ये ६२.५ टक्के भागांत हिरवळ होती. आज १७ टक्के उरली आहे.

जैवविविधतेचे माहेरघरमिठी आणि ओशिवरा या दोन नद्यांचे मूळ क्षेत्र आरेच्या भागात आहे. हा भाग जैवविविधतेचे माहेरघर आहे. आरे हे संरक्षित जंगल आहे, जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे. जगातले शहरात वसलेले एकमेव जंगल आहे. ‘आरे’चा भाग हा भूजलासाठी महत्त्वाचा पाणलोट क्षेत्र आहे, त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे मत पर्यावरण तज्ज्ञांनी मांडले.

खारफुटीजवळ दिसणारे पक्षी गायबजैवविविधता ही साखळी असते. त्याच्या हानीचा फटका प्रत्येक घटकाला बसतो. मुंबईतील जैवविविधतेचा अभ्यास झाला नाही. अभ्यास होत नसल्याने उंच इमारती होण्याआधी कोणते पक्षी, झाडे होती, याची माहिती उपलब्ध होत नाही. काही झाडांचा वापर पक्षी अंडी घालण्यास करतात. मात्र, ही झाडे नष्ट होत आहेत. खारफुटीचे क्षेत्र वाढले, असा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र खारफुटीजवळ दिसणारे पक्षी गायब आहेत.- विजय अवसरे, निसर्ग अभ्यासक

टॅग्स :forestजंगलenvironmentपर्यावरण