शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

'आम्ही तर बुवा विघटनशील प्लॅस्टिक वापरतो', असं म्हणणाऱ्या प्रत्येकासाठी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 09:00 IST

प्लॅस्टिक प्रदूषण पर्यावरणाच्या संकटामध्ये बदलू शकते, अशी भीती वारंवार व्यक्त केली जाते.

ठळक मुद्देप्लॅस्टिकचे असे काही काही प्रकार आहेत, जे प्लॅस्टिकप्रमाणेच उपयुक्त ठरतात.विघटनशील प्लॅस्टिकबाबतची काही मिथके वेळीच दूर करणे गरजेचे आहे.

सध्याच्या वेगवान आणि जागतिक संवादाच्या युगात कल्पनाविलासापासून वास्तवाला वेगळे करणे, तसेच मिथक आणि सत्य यात फरक करणे गरजेचे बनलेले आहे. दरम्यान सध्या एक विषय जागतिक पातळीवर चर्चेचा ठरला आहे तो म्हणजे प्लॅस्टिक. समुद्र, महासागर यामध्ये तरंगणाऱ्या प्लॅस्टिकच्या कचऱ्याची छायाचित्रे पाहिल्यावर जागतिक चिंतेचा विषय ठरलेल्या प्लॅस्टिकबाबत करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचे वास्तव समोर येते. त्यातूनच प्लॅस्टिकला सहजपणे वापरता येईल असा पर्याय निर्माण करण्याबाबत चाचपणी केली जात आहे. त्यातूनच विघटनशील प्लॅस्टिकची कल्पना समोर आली आहे.  

प्लॅस्टिकचे असे काही काही प्रकार आहेत, जे प्लॅस्टिकप्रमाणेच उपयुक्त ठरतात. हे हलके, लवचिक, घडी करण्यासाठी सोपे, टिकाऊ आहेत. परंतु त्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अशाप्रकारचे प्लॅस्टिक पर्यावरणात सोडले गेल्यास त्याचे विघटन होऊ शकते, असा दावा केला जातो. ही कल्पना उत्तम आहे.  मात्र हा पदार्थ पाणी शोषून घेत नाही. खरं तर त्याचे मूलभूत वैज्ञानिक तपासणीखाली विघटन होते.  

विघटनशील प्लॅस्टिकबाबतची काही मिथके वेळीच दूर करणे गरजेचे आहे. 

मिथक क्रमांक  1 - जैव-आधारित प्लॅस्टिक (बायो बेस्ड प्लॅस्टिक) हे पर्यावरणासाठी चांगले आहे. हा दावा केवळ 'ग्रीन वॉशिंग' सत्य आहे; जी जैव-आधारित प्लॅस्टिक जीवाश्म इंधनापासून बनविले जात नसले तरी ते प्लॅस्टिकच असून, त्याचा विघटन होण्याचा काळ नियमित प्लॅस्टिक सारखाच आहे. तसेच, जीवाश्म इंधनांच्या शुद्धिकरण प्रक्रियेदरम्यान बनणाऱ्या उप-उत्पादनांपैकी प्लॅस्टिक एक आहे. जर ही उप-उत्पादने प्लॅस्टिकमध्ये रूपांतरित न करता टाकली गेली तरी त्यांचा प्रभाव कायम राहू शकतो. उत्पादित करण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकचे पुनर्नवीनीकरण केले जाऊ शकते.  

मिथक क्रमांक 2 - विघटनशील प्लॅस्टिक हे पर्यावरणास योग्य पर्याय आहेत, कारण ते कालांतराने पूर्णपणे नष्ट होण्यास सक्षम आहेत, असा दावा केला जातो. या प्लॅस्टिकच्या जवळजवळ सर्व वस्तू कालांतराने विघटित होत जातात हे खरे आहे. यामधून सर्वसामान्यांची दिशाभूल केली जाते कारण हे सहसा कोणत्या टाइमफ्रेममध्ये किंवा कोणत्या पर्यावरणीय परिस्थितीत बायोप्लास्टिक खराब करण्यास सक्षम आहे हे निर्दिष्ट केलेले नाही.

मिथक क्रमांक 3 -  लँडफिलमध्ये सोडल्यास बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिकचे विघटन होते: असा दावा केला जातो. मात्र खरेतर असा समज होणे धोकादायक आहे. ज्या प्लॅस्टिकला बायोडिग्रेडेबल मानले जाते, त्याचे घरी विघटन करणे खरोखर अशक्य आहे. बहुतेक प्लॅस्टिक फक्त एक विशेष औद्योगिक आस्थापनेत बायोडिग्रेडेबल म्हणून विघटित होऊ शकते. त्यासाठी तापमान, आर्द्रता आणि प्रकाश नियंत्रित करावा लागतो. ही एक महाग आण अवघड प्रक्रिया आहे. त्यापेक्षा अधिक व्यावहारिक पर्याय म्हणजे नियमित प्लॅस्टिकचा वापर करणे आणि वेगळे करणे आणि पुनर्वापर करण्याची सवय लावणे हा ठरू शकतो. 

प्लॅस्टिक प्रदूषण पर्यावरणाच्या संकटामध्ये बदलू शकते, अशी भीती वारंवार व्यक्त केली जाते. मात्र हे संकट टाळता येण्याजोगे आहे, हे वास्तव आहे.  एक काळ असा होता की आजूबाजूला कबाडीवाला अस्तित्वात नव्हता. एक काळ असा होता की पुनर्वापर करण्यासाठी वृत्तपत्र काळजीपूर्वक बाजूला ठेवले जात नव्हते. पण माणूस नावाच्या प्राण्यांच्या हुशार प्रयत्नांनी ते सर्व बदलून टाकले. 

आम्हाला आता प्लॅस्टिकबाबत प्रयत्न करणे आवश्यक आहे. आम्ही वापरत असलेल्या सर्व प्लॅस्टिकचा पुनर्वापर केला जाऊ शकतो. खरं तर, या जगातील  जबाबदार नागरिक आणि आपल्या महासागराचे रक्षण करणारे म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण जबाबदारीने प्लॅस्टिकचा वापर केला पाहिजे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी