शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

विदेशी पक्ष्यांच्या किलबिलाटाने पाणवठे बहरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 15:03 IST

देशी-विदेशी स्थलांतरीत पक्ष्यांच्या किलबिलाटाने जिल्हाभरातील सर्वच पाठवठे बहरले आहेत.

जळगाव -  यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या भरभरून वाहत आहेत. त्यामुळेच गिरणा नदी, वाघूर, हतनूर धरणासह मेहरूण, मुक्ताई भवानी, हरताळा तलावावर देशी-विदेशी स्थलांतरीत पक्ष्यांच्या किलबिलाटाने जिल्हाभरातील सर्वच पाठवठे बहरले आहेत. तसेच वातावरणात बदल होऊन थंडीत वाढ होत आहे. त्यामुळे थंडीत स्थलांतर करणारे विविध पाहुण्या पक्ष्यांनी हजेरी लावायला सुरुवात झाली आहे. 

जिल्ह्यातील वाघुर, हतनूर धरण, मेहरूण तलाव यासह गिरणा नदीपात्रात ब्राह्मणी बदकांसह विविध पक्षी हळू हळू दाखल होत आहेत. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पक्षी निरीक्षकांनी नुकत्याच केलेल्या पाहणीत विविध प्रजातींचे पक्षी कमी अधिक संख्येने जलाशयांवर आढळल्याची माहिती मिळाली आहे. यंदा सर्वच धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने दलदलीचा अधिवास कमी असल्याचे पक्षी अभ्यासक प्रसाद सोनवणे यांनी सांगितले. गिरणा नदी पात्रात यंदा मुबलक पाणी असल्याने याठिकाणी देखील शेकाटे, करकोचे, वारकरी, सँडपायपर, चिखल्या, लाजरी पाणकोंबडी, नदी सुरय, डॅपचिक, थापट्या , लहान पाणकावळे, मोठे पाणकावळे, या सारखे पक्षी विहार करताना आढळून येत आहेत. शहरातील मेहरूण तलावात देखील अनेक देश विदेशी स्थलांतरीत पक्षी दाखल झाले आहेत. 

गेल्या वर्षाच्या तुलनेत थोडी संख्या कमी आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे तलावात पाणी जास्त असल्याने अन्न मिळविण्यास अडचणी येतात. त्यामुळे ज्या ठिकाणी उथळ पाणी आहे. त्याच ठिकाणी पक्ष्यांचा अधिवास वाढला आहे. 

हतनूर, वाघूर धरण परिसरात पक्षीमित्रांची निरीक्षणासाठी गर्दी

वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी जिल्ह्यातील हतनूर आणि वाघूर धरण परिसरात तीन दिवस केलेल्या निरीक्षणात रंगीत करकोचे,उघड्या चोचीचे करकोचे, ग्रे हेरॉन, पर्पल हेरॉन, लालसरी, शेंडी बदक, शेकाटे, नयनसरी, लालसरी , पिनटेल, रेड क्रेस्टेड पोचार्ड, कॉमन पोचार्ड, वूड सँडपायपर, व्हाईट टेल्ड लँपविंग बरोबरच  कोंब डक,  नदिसूरय, जांभळी पानकोंबडी, कमळ पक्षी,  कंडोलक, पानडुबी, पाणकावळा, विजन, रेड क्रिस्टेड पोचार्ड, कूट, ऑस्प्रे, हॅरियर व इतर अनेक प्रजातींचे विविध पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. यासह कंठेरी चिखल्या, चमचे , धोबी, कॉमन कूट, कवड्या धिवर, हे पाणपक्षी,  तर थीरथीरा ,निलय , मुनिया, पाकोळी, पांढऱ्या भिवईची बुलबुल या सारखे रानपक्षी परिसरात आढळून आले.

२० हजार किमीचा प्रवास करून पक्षी दाखल

युरोप, हिमालय, तिबेट, सायबेरिया या बर्फाच्छादीत प्रदेशात थंडीने जलाशये गोठतात. पक्ष्यांना अन्नाची कमतरता निर्माण होते. त्यामुळे त्यांचा संतुलित सुरक्षित वातावरणातील अन्न आणि घरट्यांसाठी शोध सुरू होतो. प्रत्येक पक्षाला सुरक्षित जागा हवी असते. त्यामुळे हिवाळ्यात पक्षी भारताच्या वातावरणात अन्न, निवारा शोधण्यासाठी येतात. सध्या जिल्ह्यातील पाणवठ्यांवर मध्य, पूर्व आणि उत्तर दक्षिण युरोप, रशिया, सायबेरिया, मंगोलिया, तिबेट येथून पाहुणे पक्षी दाखल होत आहेत.  मंगोलियातून येणारे पक्षी चार हजाराहून अधिक किलोमीटरचा प्रवास करून आपल्या भागात येतात. तर काही पक्षी २० हजार किलोमीटरचा प्रवास करीत आपल्या जलशयांवर दरवर्षी येतात अशी माहिती पक्षीमित्र प्रसाद सोनवणे यांनी दिली.  

विविध ठिकाणी एकाच वेळी केले निरीक्षण

हतनूर बॅक वॉटर परिसर, मेहरूण तलाव, मुक्ताबाई मंदिर तसेच हरताळा तलाव, चारठाणा भवानी तलाव, पूर्णा काठ, गिरणा काठ, मेहरून तलाव, वाघूर धरण परिसरात नोंदी घेण्यासाठी वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्यांनी एकाच दिवशी निरीक्षण केले. यामध्ये  पक्षी अभ्यासक राहुल सोनवणे, बाळकृष्ण देवरे, प्रसाद सोनवणे, रवींद्र सोनवणे, सतीश कांबळे, योगेश गालफाडे, अमन गुजर, गौरव शिंदे, सुरेंद्र नारखेडे, जगदीश बैरागी, राजेश सोनवणे, अमोल देशमुख, विजय रायपुरे, चेतन भावसार, भूषण चौधरी ,नीलेश ढाके,जयेश पाटील, भूषण निकुंभ, निलेश जगताप, योगेश सोनवणे, मुकेश सोनवणे, संदीप जगताप यांनी सहभाग नोंदवला.

हतनूर धरणात ९९ प्रकारच्या पक्ष्यांची नोंद 

चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे पक्षीमित्र अनिल महाजन यांनी हतनूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात केलेल्या निरीक्षणात ९९ जातीच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती अनिल महाजन यांनी दिली. विदेशी पक्ष्यांचे आगमण सुरु झाले असून, दरवर्षी हजारोंच्या संख्येने हे पक्षी हतनूर जलाशयात दाखल होत असतात. डिसेंबर ते मार्चपर्यंत हे पक्षी जिल्ह्यात तळ ठोकून असतात. मार्चनंतर या पक्ष्यांचा परतीचा प्रवास सुरु होत असल्याची माहिती अनिल महाजन यांनी दिली. 

स्थानिक अधिवास असलेले पक्षी देखील तलाव आणि गिरणा काठावरील नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्याने कमी प्रमाणात दृष्टीस पडत आहेत, तसेच स्थलांतरी इतर पाहुण्या पक्ष्यांची संख्या  दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. त्यामुळे विविध ऋतू नुसार दाखल होणाºया पक्ष्यांचे अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. 

- राहुल सोनवणे, वनस्पती आणि पक्षी अभ्यासक

जलाशयांच्या परिसरात मानवी अतिक्रमण वाढले आहे. औद्योगिकरण, बांधकाम, कारखाने निर्मितीमुळे पाहुण्या पक्ष्यांचे अधिवास धोक्यात येत आहे. अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या पक्ष्यांचे संवर्धन, संरक्षणासाठी उपाययोजना करायला हव्यात.

- बाळकृष्ण देवरे, वन्यजीव संरक्षण संस्था 

टॅग्स :environmentपर्यावरणJalgaonजळगाव