शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कास तलावाला कचऱ्याचे ग्रहण, पर्यावरणावर घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 17:52 IST

KasPathar, Garbage Disposal Issue, Satara area, environment सातारा शहराच्या पश्चिमेस २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कास तलाव परिसरात मोठया प्रमाणावरील काचांच्या तुकडयांमुळे कचरा, घाणीच्या विळख्यांमुळे निसर्गरम्य कासचा श्वास घाणीत घुटमळू लागला आहे. कास तलावाला स्वच्छतेची प्रतिक्षा असून दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घाणीच्या साम्राज्याने निसर्गप्रेमी नाराजी व्यक्त करू लागले आहेत.

ठळक मुद्देकास तलावाला कचऱ्याचे ग्रहण, पर्यावरणावर घाला, मद्याच्या बाटल्यांचा खचपर्यटक अन् वन्यजीवांना इजा होण्याचा संभव; निसर्गप्रेमींमधून निराशा

पेट्री/सातारा : सातारा शहराच्या पश्चिमेस २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कास तलाव परिसरात मोठया प्रमाणावरील काचांच्या तुकडयांमुळे कचरा, घाणीच्या विळख्यांमुळे निसर्गरम्य कासचा श्वास घाणीत घुटमळू लागला आहे. कास तलावाला स्वच्छतेची प्रतिक्षा असून दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घाणीच्या साम्राज्याने निसर्गप्रेमी नाराजी व्यक्त करू लागले आहेत.काचा, दारुच्या बाटल्या, पिशव्या, कागदी बोळयांनी कास परिसर अस्वच्छ बनला असून पाणी प्रदूषण होण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी चुली मांडून धुराचे लोटच्या लोट व तेथीलच परिसरातील सरपण गोळा करून हवेच्या प्रदुषणाबरोबरच पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे. दरम्यान शनिवार, रविवारी सुटीच्या दिवशी गाडीतल्या कर्णकर्कश डेकवर काही तरूणाई थिरकत असल्याने कास तलावावर पाणी पिण्याच्या मार्गावर असणाऱ्या वन्य पशुपक्ष्यांना आपला मार्गही बदलावा लागत आहे.कास तलाव परिसरातील या कचऱ्यांमध्ये दिवसेंदिवस होणाऱ्या वाढीमुळे भविष्यात जणू काही कास तलाव काच तलाव म्हणून ओळखला जाऊ नये, यासाठी पर्यटनास आलेल्या प्रत्येक पर्यटकांनी आपली मानसिकता बदलून स्वच्छ कास राहावा यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. पाण्यात जलविहार करणे, पार्ट्यांची तेलकट भांडी , साबण अथवा डिटर्जंटने धुणे, काठावर गाडया लाऊन वाहनांचे वॉशिंग करणे यामुळे पाणी दुषित होण्याचा संभव अधिक असून तेल, साबणाचा फेस, ऑईल यामुळे जलचर प्राण्यांच्या जीवितास धोका उदभवण्याची शक्यता आहे.कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने या परिसरात पर्यटनास बंदी होती. परंतू सध्या कास तलावावर बहुसंख्य पर्यटक गर्दी करत आहेत ; वाढत्या अस्वच्छतेने पर्यावरणप्रेमीतून नाराजीचे सुर उमटत आहेत.

टॅग्स :Kas Patharकास पठारGarbage Disposal Issueकचरा प्रश्नSatara areaसातारा परिसरenvironmentपर्यावरण