शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

Ganesh Festival 2019 : गणेशोत्सवात खर्च कमी आणि पर्यावरणाची हमी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 11:03 IST

पर्यावरणपूरक उत्सवाची कास धरली तर नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास थांबून आपला शाश्वत विकास होईल व गणपती बाप्पांची आपल्यावर निरंतर कृपादृष्टी राहील, यात शंका नाही. चला तर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला सुरुवात करूया!!!

अमोल सावंत

अकोला - भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण हा निसर्गाशी निगडित आहे, प्रत्येक सण हा निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारा व निसर्गाजवळघेऊन जाणारा सण आहे; पण कालानुरूप याचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे निसर्गाचे संवर्धन दूर त्याचा ऱ्हासच मोठ्या प्रमाणात होत आहे, आता वेळ आली आहे यात बदल करण्याची. आपले सण पर्यावरणपूरक साजरे करण्याची. ज्यामधून निसर्गाचे संवर्धन पण होईल व येणाऱ्या पिढीवर निसर्ग संवर्धनाचे व संस्कृतीचे संस्कारदेखील होतील.

वृत्तपत्र व सोशल मीडियाच्या माध्यमातून या बदलांची दखल घेऊन चांगले व प्रेरणादायी उपक्रम समाजामध्ये राबविताना दिसून येत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव म्हटला की, डोळ्यासमोर भव्य देखावे, लायटिंग व मंडप असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. पूर्वी होतं का हे सगळं? १२६ वर्षांची परंपरा लाभलेला हा उत्सव आहे. यात पण बदल होणे गरजेचे आहे.

प्रत्येक मंडळाने जर ठरविले की भव्य देखावे, लायटिंग व मंडपावर भरपूर खर्च न करता साध्या पद्धतीने सामाजिक संदेश देणारा हा उत्सव झाला पाहिजे. त्यामध्ये लहान मूर्ती आणून त्यासमोर आपल्या संस्कृती व परंपरेचे चालते बोलते देखावे करायचे. या देखाव्यात आपल्या भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विविध भूमिका घ्याव्यात त्यामुळे त्यांचे स्टेज डेअरिंग वाढेल. ‘एक गाव एक गणपती  त्याचप्रमाणे एक मोहल्ला एक गणपती’ हा उपक्रम राबवावा. मिरवणुकीमध्ये डीजे न लावता ग्रामीण भागातील कलावंतांना बोलून लेझीम, हलगी, ढोल, होलारबाजा, कैकाडी वाद्य, सनई ताशा, दिंडी व त्यासोबतच मर्दानी खेळ ठेवावेत. त्यामधूनच ग्रामीण लोकांना रोजगार मिळेल व शहरातील लोकांना ग्रामीण संस्कृतीचे दर्शन होईल.

मंडळात मातीच्या गणेशमूर्तीची स्थापना करून त्याचे विसर्जन मोहल्ल्यातच करावे व ती माती परत मूर्तिकाराला परत करावी. या उपायांमुळे आर्थिक भार पण कमी होईल व इतर सामाजिक उपक्रमांसाठी निधी उपलब्ध होईल.

घरात आणि दारात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाचे स्वरूप हे पर्यावरणपूरक असणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे.

1. गणेशमूर्ती मातीचीच व आकाराने लहान बसवावी.

2. रोषणाई कमी प्रमाणात करावी.

3. सजावट करताना थर्माकोल, फोम व प्लास्टिकचा वापर न करता नैसर्गिक व पुनर्वापर होणाऱ्या वस्तूंचा वापर करावा.

4. पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे देखावे करावेत.

5. विसर्जनाच्या दिवशी मंडपातच पाण्याची टाकी ठेवून मूर्तीचे विसर्जन करावे व माती मूर्तिकाराला परत करावी.

(लेखक अकोल्यातील निसर्गकट्टाचे संस्थापक आहेत.)

 

टॅग्स :environmentपर्यावरणGanesh Mahotsavगणेश महोत्सव