शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

Ganesh Festival 2019 : गणेशोत्सवात खर्च कमी आणि पर्यावरणाची हमी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 11:03 IST

पर्यावरणपूरक उत्सवाची कास धरली तर नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास थांबून आपला शाश्वत विकास होईल व गणपती बाप्पांची आपल्यावर निरंतर कृपादृष्टी राहील, यात शंका नाही. चला तर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला सुरुवात करूया!!!

अमोल सावंत

अकोला - भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण हा निसर्गाशी निगडित आहे, प्रत्येक सण हा निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारा व निसर्गाजवळघेऊन जाणारा सण आहे; पण कालानुरूप याचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे निसर्गाचे संवर्धन दूर त्याचा ऱ्हासच मोठ्या प्रमाणात होत आहे, आता वेळ आली आहे यात बदल करण्याची. आपले सण पर्यावरणपूरक साजरे करण्याची. ज्यामधून निसर्गाचे संवर्धन पण होईल व येणाऱ्या पिढीवर निसर्ग संवर्धनाचे व संस्कृतीचे संस्कारदेखील होतील.

वृत्तपत्र व सोशल मीडियाच्या माध्यमातून या बदलांची दखल घेऊन चांगले व प्रेरणादायी उपक्रम समाजामध्ये राबविताना दिसून येत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव म्हटला की, डोळ्यासमोर भव्य देखावे, लायटिंग व मंडप असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. पूर्वी होतं का हे सगळं? १२६ वर्षांची परंपरा लाभलेला हा उत्सव आहे. यात पण बदल होणे गरजेचे आहे.

प्रत्येक मंडळाने जर ठरविले की भव्य देखावे, लायटिंग व मंडपावर भरपूर खर्च न करता साध्या पद्धतीने सामाजिक संदेश देणारा हा उत्सव झाला पाहिजे. त्यामध्ये लहान मूर्ती आणून त्यासमोर आपल्या संस्कृती व परंपरेचे चालते बोलते देखावे करायचे. या देखाव्यात आपल्या भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विविध भूमिका घ्याव्यात त्यामुळे त्यांचे स्टेज डेअरिंग वाढेल. ‘एक गाव एक गणपती  त्याचप्रमाणे एक मोहल्ला एक गणपती’ हा उपक्रम राबवावा. मिरवणुकीमध्ये डीजे न लावता ग्रामीण भागातील कलावंतांना बोलून लेझीम, हलगी, ढोल, होलारबाजा, कैकाडी वाद्य, सनई ताशा, दिंडी व त्यासोबतच मर्दानी खेळ ठेवावेत. त्यामधूनच ग्रामीण लोकांना रोजगार मिळेल व शहरातील लोकांना ग्रामीण संस्कृतीचे दर्शन होईल.

मंडळात मातीच्या गणेशमूर्तीची स्थापना करून त्याचे विसर्जन मोहल्ल्यातच करावे व ती माती परत मूर्तिकाराला परत करावी. या उपायांमुळे आर्थिक भार पण कमी होईल व इतर सामाजिक उपक्रमांसाठी निधी उपलब्ध होईल.

घरात आणि दारात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाचे स्वरूप हे पर्यावरणपूरक असणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे.

1. गणेशमूर्ती मातीचीच व आकाराने लहान बसवावी.

2. रोषणाई कमी प्रमाणात करावी.

3. सजावट करताना थर्माकोल, फोम व प्लास्टिकचा वापर न करता नैसर्गिक व पुनर्वापर होणाऱ्या वस्तूंचा वापर करावा.

4. पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे देखावे करावेत.

5. विसर्जनाच्या दिवशी मंडपातच पाण्याची टाकी ठेवून मूर्तीचे विसर्जन करावे व माती मूर्तिकाराला परत करावी.

(लेखक अकोल्यातील निसर्गकट्टाचे संस्थापक आहेत.)

 

टॅग्स :environmentपर्यावरणGanesh Mahotsavगणेश महोत्सव