शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
6
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
7
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
8
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
9
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
10
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
11
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
12
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
13
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
14
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
15
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
16
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
17
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
18
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
19
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
20
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग

Ganesh Festival 2019 : गणेशोत्सवात खर्च कमी आणि पर्यावरणाची हमी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 11:03 IST

पर्यावरणपूरक उत्सवाची कास धरली तर नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास थांबून आपला शाश्वत विकास होईल व गणपती बाप्पांची आपल्यावर निरंतर कृपादृष्टी राहील, यात शंका नाही. चला तर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला सुरुवात करूया!!!

अमोल सावंत

अकोला - भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण हा निसर्गाशी निगडित आहे, प्रत्येक सण हा निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारा व निसर्गाजवळघेऊन जाणारा सण आहे; पण कालानुरूप याचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे निसर्गाचे संवर्धन दूर त्याचा ऱ्हासच मोठ्या प्रमाणात होत आहे, आता वेळ आली आहे यात बदल करण्याची. आपले सण पर्यावरणपूरक साजरे करण्याची. ज्यामधून निसर्गाचे संवर्धन पण होईल व येणाऱ्या पिढीवर निसर्ग संवर्धनाचे व संस्कृतीचे संस्कारदेखील होतील.

वृत्तपत्र व सोशल मीडियाच्या माध्यमातून या बदलांची दखल घेऊन चांगले व प्रेरणादायी उपक्रम समाजामध्ये राबविताना दिसून येत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव म्हटला की, डोळ्यासमोर भव्य देखावे, लायटिंग व मंडप असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. पूर्वी होतं का हे सगळं? १२६ वर्षांची परंपरा लाभलेला हा उत्सव आहे. यात पण बदल होणे गरजेचे आहे.

प्रत्येक मंडळाने जर ठरविले की भव्य देखावे, लायटिंग व मंडपावर भरपूर खर्च न करता साध्या पद्धतीने सामाजिक संदेश देणारा हा उत्सव झाला पाहिजे. त्यामध्ये लहान मूर्ती आणून त्यासमोर आपल्या संस्कृती व परंपरेचे चालते बोलते देखावे करायचे. या देखाव्यात आपल्या भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विविध भूमिका घ्याव्यात त्यामुळे त्यांचे स्टेज डेअरिंग वाढेल. ‘एक गाव एक गणपती  त्याचप्रमाणे एक मोहल्ला एक गणपती’ हा उपक्रम राबवावा. मिरवणुकीमध्ये डीजे न लावता ग्रामीण भागातील कलावंतांना बोलून लेझीम, हलगी, ढोल, होलारबाजा, कैकाडी वाद्य, सनई ताशा, दिंडी व त्यासोबतच मर्दानी खेळ ठेवावेत. त्यामधूनच ग्रामीण लोकांना रोजगार मिळेल व शहरातील लोकांना ग्रामीण संस्कृतीचे दर्शन होईल.

मंडळात मातीच्या गणेशमूर्तीची स्थापना करून त्याचे विसर्जन मोहल्ल्यातच करावे व ती माती परत मूर्तिकाराला परत करावी. या उपायांमुळे आर्थिक भार पण कमी होईल व इतर सामाजिक उपक्रमांसाठी निधी उपलब्ध होईल.

घरात आणि दारात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाचे स्वरूप हे पर्यावरणपूरक असणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे.

1. गणेशमूर्ती मातीचीच व आकाराने लहान बसवावी.

2. रोषणाई कमी प्रमाणात करावी.

3. सजावट करताना थर्माकोल, फोम व प्लास्टिकचा वापर न करता नैसर्गिक व पुनर्वापर होणाऱ्या वस्तूंचा वापर करावा.

4. पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे देखावे करावेत.

5. विसर्जनाच्या दिवशी मंडपातच पाण्याची टाकी ठेवून मूर्तीचे विसर्जन करावे व माती मूर्तिकाराला परत करावी.

(लेखक अकोल्यातील निसर्गकट्टाचे संस्थापक आहेत.)

 

टॅग्स :environmentपर्यावरणGanesh Mahotsavगणेश महोत्सव