शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

नगरमध्ये रोज ६० एमएलडी सांडपाणी सीना नदीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 12:08 IST

परिसरातील शेतीचे आरोग्य धोक्यात

- अण्णा नवथर

अहमदनगर : शहराची लोकसंख्या साडेचार लाख असून, शहराला दररोज ७२ एमएलडी पाणी लागते़  यातील सुमारे ६० एमएलडी सांडपाणी जवळच असलेल्या सीना नदीत सोडण्यात येते़  या पाण्याचा पिण्यासाठी वापर होत नसला तरी शेतीसाठी मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे शेतीचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी १९९० मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने १०.५० एमएलडीचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला. मात्र, अवघ्या सात वर्षांत या प्रकल्पाला घरघर लागली़  तेव्हापासून शहरातील सांडपाणी सीना नदीपात्रात सोडण्यात येते़  नव्याने उभ्या राहिलेल्या सावेडी, बोल्हेगाव, केडगाव, सारसनगर, बुरूडगाव आदी उपनगरांतील वसाहतींमध्ये सांडपाणी साठविण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे; परंतु मध्यवर्ती शहरातील सांडपाणी आजही या नदीपात्रातच सोडले जाते़  या भागातील नेमके किती सांडपाणी नदीत सोडले जाते, याची आकडेवारी महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध नसली तरी सुमारे ८० टक्के पाणी नदीत सोडले जात असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे़. याचा अर्थ सुमारे ६० एमएलडी पाणी दररोज नदीपात्रात सोडण्यात येते़.

शहरातील सांडपाणी नदीत न सोडता त्यावर प्रक्रिया करण्यासाठी नव्याने प्रकल्प हाती घेण्यात आला आहे़ शासनाच्या अमृत योजनेंतर्गत जलशुद्धीकरण प्रकल्पासह भुयारी गटारीचे काम सुरू आहे़  सुमारे १२४ कोटी रुपये खर्चून पहिल्या टप्प्यात मध्यवर्ती शहरातील पाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे़  हा प्रकल्प ५७ एमएलडी क्षमतेचा असून, जलशुद्धीकरण प्रकल्पाचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे़  येत्या वर्षभरात हा प्रकल्प कार्यान्वित होईल़  प्रक्रिया केलेले पाणी वाकोडी भागातील शेतकऱ्यांना दिले जाईल़  त्यामुळे सीना नदी प्रदूषित होणार नाही, असे महापालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे. 

सांडपाण्यावर प्रक्रिया हाच पर्यायअ‍ॅसिडयुक्त पाण्यात ऑक्सिजन नसतो़  त्यामुळे जलचर प्राणी जगूच शकत नाहीत. हे पाणी झिरपून विहिरीत जाते़  हे पाणी पिण्यासाठी घातक असते़  या पाण्याचे सिंचन केल्यास पिके तरारून येतात; पण ही पिके आरोग्यासाठी घातक असतात़  त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया हाच एकमेव उपाय आहे़  प्रक्रिया केलेले पाणी फळे, भाजीपाला, धान्य आदी पिकांना वापरू नये़  प्रक्रिया केलेले पाणी खाद्य पिकांसाठी न वापरता अखाद्य पिकांना वापरावे़, अशी माहिती पर्यावरणतज्ज्ञ बी़ एऩ शिंदे यांनी दिली. 

1990 मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने १०़ ५० एमएलडीचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला. मात्र, अवघ्या सात वर्षांत या प्रकल्पाला घरघर लागली़  तेव्हापासून शहरातील सांडपाणी सीना नदीपात्रात सोडण्यात येते़  

350 हेक्टर क्षेत्र या नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. या क्षेत्रावर ऊस, मका यासारखी पिके घेतली जातात, तसेच या भागात फुलकोबी, कोथिंबीर यासारखा भाजीपाला पिकविला जातो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची माहिती या गावकऱ्यांनी दिली. 

4.5 लाख अहमदनगर शहराची लोकसंख्या 72 एमएलडी पाणी शहराला दररोज लागते 60 एमएलडी पाणी नदीत रोज सोडण्यात येते350 हेक्टर क्षेत्र अवलंबून सीना नदीच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर होत नाही; पण सीना नदीतीरावर नागापूर, बोलेगाव, बुरुडगाव, पारगाव ही गावे आहेत.

टॅग्स :pollutionप्रदूषणriverनदीWaterपाणी