शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

‘कॉपी’ला जबाबदार कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2022 12:21 IST

शाळा व्यवस्थापन आणि खासगी शिकविण्याची १०० टक्के निकालाची स्पर्धा विद्यार्थ्यांना गैरमार्गावर चालण्यास मदत करत असल्याची चर्चा या निमित्त रंगत आहे. 

- सीमा महांगडे अखेर दहावी, बारावीच्या प्रत्यक्ष परीक्षांना यंदा मुहूर्त मिळून त्या सुरूही झाल्या. मात्र, यंदा कॉपीसारख्या गैरप्रकरणांच्या वाढलेल्या संख्येने परीक्षांचे खरे सत्त्व हरवून गेले आहे. परीक्षांना विद्यार्थी घाबरले होते, मानसिकता नव्हती हे सगळे जरी खरे असले तरी विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता वाढीची आणखी एक संधी असणार आहे, हेच विद्यार्थी विसरले आहेत. कॉपी प्रकरणांच्या संख्येने सुरू असलेल्या परीक्षांना बट्टा तर लागलाच मात्र, या निमित्ताने शाळा व्यवस्थापन आणि खासगी शिकविण्याची १०० टक्के निकालाची स्पर्धा विद्यार्थ्यांना गैरमार्गावर चालण्यास मदत करत असल्याची चर्चा या निमित्त रंगत आहे. कुठे कॉपी प्रकरण आढळून शाळा मान्यतेची प्रक्रिया सुरू झाली, तर कुठे पेपर कठीण गेल्यामुळे आत्महत्येची घटना घडली. पेपर कठीण गेला म्हणून विद्यार्थ्याने जीवन संपवून टाकणे, पेपर कठीण जाऊ नये म्हणून चिट्ठ्या, मोबाइलमधून प्रश्न मिळवून कॉपी करणे या गंभीर समस्या आज विद्यार्थ्यांसमोर आहेत. त्यांच्या या समस्येला अनेक पैलू असल्याचे दिसून येतात. सुरुवातीपासूनच प्रत्यक्ष परीक्षा नको, अशी री ओढणारी विद्यार्थ्यांची टोळी सक्रिय होती. त्यात हिंदुस्थानी भाऊसारख्या काही व्यक्तींनी हातभार लावत परीक्षांचे वातावरण दूषित केले. एका सर्वेक्षणानुसार शालेय जीवनातील ताण, अडचणी, परीक्षांच्या भीतीमुळे देशातील जवळपास २५ हजार विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य संपविले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या परीक्षेनंतर नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून लगेचच दुसरी परीक्षा घेतली जाते. त्यात पास होण्याची संधी उपलब्ध आहे. तसेच पुढील करिअरवर नापास झालेल्या विषयाचा काहीही परिणाम होणार नाही हे शिक्षकांकडून, पालकांकडून विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यात शिक्षण व्यवस्था कमी पडतेय का ? किंवा कमी गुण मिळाल्यामुळे किंवा नापास झाल्यामुळे समाजातील त्याच्या अस्तित्वावर शिंतोडे उडणार नाहीत, हे समजावण्यात समाजव्यवस्था कमी पडत आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. परीक्षा हा तर शिक्षण व्यवस्थेचा एक भागपरीक्षा हा केवळ शिक्षण व्यवस्थेचा एक भाग आहे, शिक्षण व्यवस्था नाही. त्यामुळे त्यातील कामगिरीवर आपण यशाची शिखरे गाठू शकतो; पण चांगली कामगिरी नाही करू शकलो तर आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही, हा गैरसमज विद्यार्थ्याच्या मनातून कायमचा पुसण्याची गरज आहे.