शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

‘कॉपी’ला जबाबदार कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2022 12:21 IST

शाळा व्यवस्थापन आणि खासगी शिकविण्याची १०० टक्के निकालाची स्पर्धा विद्यार्थ्यांना गैरमार्गावर चालण्यास मदत करत असल्याची चर्चा या निमित्त रंगत आहे. 

- सीमा महांगडे अखेर दहावी, बारावीच्या प्रत्यक्ष परीक्षांना यंदा मुहूर्त मिळून त्या सुरूही झाल्या. मात्र, यंदा कॉपीसारख्या गैरप्रकरणांच्या वाढलेल्या संख्येने परीक्षांचे खरे सत्त्व हरवून गेले आहे. परीक्षांना विद्यार्थी घाबरले होते, मानसिकता नव्हती हे सगळे जरी खरे असले तरी विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता वाढीची आणखी एक संधी असणार आहे, हेच विद्यार्थी विसरले आहेत. कॉपी प्रकरणांच्या संख्येने सुरू असलेल्या परीक्षांना बट्टा तर लागलाच मात्र, या निमित्ताने शाळा व्यवस्थापन आणि खासगी शिकविण्याची १०० टक्के निकालाची स्पर्धा विद्यार्थ्यांना गैरमार्गावर चालण्यास मदत करत असल्याची चर्चा या निमित्त रंगत आहे. कुठे कॉपी प्रकरण आढळून शाळा मान्यतेची प्रक्रिया सुरू झाली, तर कुठे पेपर कठीण गेल्यामुळे आत्महत्येची घटना घडली. पेपर कठीण गेला म्हणून विद्यार्थ्याने जीवन संपवून टाकणे, पेपर कठीण जाऊ नये म्हणून चिट्ठ्या, मोबाइलमधून प्रश्न मिळवून कॉपी करणे या गंभीर समस्या आज विद्यार्थ्यांसमोर आहेत. त्यांच्या या समस्येला अनेक पैलू असल्याचे दिसून येतात. सुरुवातीपासूनच प्रत्यक्ष परीक्षा नको, अशी री ओढणारी विद्यार्थ्यांची टोळी सक्रिय होती. त्यात हिंदुस्थानी भाऊसारख्या काही व्यक्तींनी हातभार लावत परीक्षांचे वातावरण दूषित केले. एका सर्वेक्षणानुसार शालेय जीवनातील ताण, अडचणी, परीक्षांच्या भीतीमुळे देशातील जवळपास २५ हजार विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य संपविले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या परीक्षेनंतर नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून लगेचच दुसरी परीक्षा घेतली जाते. त्यात पास होण्याची संधी उपलब्ध आहे. तसेच पुढील करिअरवर नापास झालेल्या विषयाचा काहीही परिणाम होणार नाही हे शिक्षकांकडून, पालकांकडून विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यात शिक्षण व्यवस्था कमी पडतेय का ? किंवा कमी गुण मिळाल्यामुळे किंवा नापास झाल्यामुळे समाजातील त्याच्या अस्तित्वावर शिंतोडे उडणार नाहीत, हे समजावण्यात समाजव्यवस्था कमी पडत आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. परीक्षा हा तर शिक्षण व्यवस्थेचा एक भागपरीक्षा हा केवळ शिक्षण व्यवस्थेचा एक भाग आहे, शिक्षण व्यवस्था नाही. त्यामुळे त्यातील कामगिरीवर आपण यशाची शिखरे गाठू शकतो; पण चांगली कामगिरी नाही करू शकलो तर आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही, हा गैरसमज विद्यार्थ्याच्या मनातून कायमचा पुसण्याची गरज आहे.