शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

‘कॉपी’ला जबाबदार कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2022 12:21 IST

शाळा व्यवस्थापन आणि खासगी शिकविण्याची १०० टक्के निकालाची स्पर्धा विद्यार्थ्यांना गैरमार्गावर चालण्यास मदत करत असल्याची चर्चा या निमित्त रंगत आहे. 

- सीमा महांगडे अखेर दहावी, बारावीच्या प्रत्यक्ष परीक्षांना यंदा मुहूर्त मिळून त्या सुरूही झाल्या. मात्र, यंदा कॉपीसारख्या गैरप्रकरणांच्या वाढलेल्या संख्येने परीक्षांचे खरे सत्त्व हरवून गेले आहे. परीक्षांना विद्यार्थी घाबरले होते, मानसिकता नव्हती हे सगळे जरी खरे असले तरी विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता वाढीची आणखी एक संधी असणार आहे, हेच विद्यार्थी विसरले आहेत. कॉपी प्रकरणांच्या संख्येने सुरू असलेल्या परीक्षांना बट्टा तर लागलाच मात्र, या निमित्ताने शाळा व्यवस्थापन आणि खासगी शिकविण्याची १०० टक्के निकालाची स्पर्धा विद्यार्थ्यांना गैरमार्गावर चालण्यास मदत करत असल्याची चर्चा या निमित्त रंगत आहे. कुठे कॉपी प्रकरण आढळून शाळा मान्यतेची प्रक्रिया सुरू झाली, तर कुठे पेपर कठीण गेल्यामुळे आत्महत्येची घटना घडली. पेपर कठीण गेला म्हणून विद्यार्थ्याने जीवन संपवून टाकणे, पेपर कठीण जाऊ नये म्हणून चिट्ठ्या, मोबाइलमधून प्रश्न मिळवून कॉपी करणे या गंभीर समस्या आज विद्यार्थ्यांसमोर आहेत. त्यांच्या या समस्येला अनेक पैलू असल्याचे दिसून येतात. सुरुवातीपासूनच प्रत्यक्ष परीक्षा नको, अशी री ओढणारी विद्यार्थ्यांची टोळी सक्रिय होती. त्यात हिंदुस्थानी भाऊसारख्या काही व्यक्तींनी हातभार लावत परीक्षांचे वातावरण दूषित केले. एका सर्वेक्षणानुसार शालेय जीवनातील ताण, अडचणी, परीक्षांच्या भीतीमुळे देशातील जवळपास २५ हजार विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य संपविले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या परीक्षेनंतर नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून लगेचच दुसरी परीक्षा घेतली जाते. त्यात पास होण्याची संधी उपलब्ध आहे. तसेच पुढील करिअरवर नापास झालेल्या विषयाचा काहीही परिणाम होणार नाही हे शिक्षकांकडून, पालकांकडून विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यात शिक्षण व्यवस्था कमी पडतेय का ? किंवा कमी गुण मिळाल्यामुळे किंवा नापास झाल्यामुळे समाजातील त्याच्या अस्तित्वावर शिंतोडे उडणार नाहीत, हे समजावण्यात समाजव्यवस्था कमी पडत आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. परीक्षा हा तर शिक्षण व्यवस्थेचा एक भागपरीक्षा हा केवळ शिक्षण व्यवस्थेचा एक भाग आहे, शिक्षण व्यवस्था नाही. त्यामुळे त्यातील कामगिरीवर आपण यशाची शिखरे गाठू शकतो; पण चांगली कामगिरी नाही करू शकलो तर आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही, हा गैरसमज विद्यार्थ्याच्या मनातून कायमचा पुसण्याची गरज आहे.