शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘कॉपी’ला जबाबदार कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2022 12:21 IST

शाळा व्यवस्थापन आणि खासगी शिकविण्याची १०० टक्के निकालाची स्पर्धा विद्यार्थ्यांना गैरमार्गावर चालण्यास मदत करत असल्याची चर्चा या निमित्त रंगत आहे. 

- सीमा महांगडे अखेर दहावी, बारावीच्या प्रत्यक्ष परीक्षांना यंदा मुहूर्त मिळून त्या सुरूही झाल्या. मात्र, यंदा कॉपीसारख्या गैरप्रकरणांच्या वाढलेल्या संख्येने परीक्षांचे खरे सत्त्व हरवून गेले आहे. परीक्षांना विद्यार्थी घाबरले होते, मानसिकता नव्हती हे सगळे जरी खरे असले तरी विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता वाढीची आणखी एक संधी असणार आहे, हेच विद्यार्थी विसरले आहेत. कॉपी प्रकरणांच्या संख्येने सुरू असलेल्या परीक्षांना बट्टा तर लागलाच मात्र, या निमित्ताने शाळा व्यवस्थापन आणि खासगी शिकविण्याची १०० टक्के निकालाची स्पर्धा विद्यार्थ्यांना गैरमार्गावर चालण्यास मदत करत असल्याची चर्चा या निमित्त रंगत आहे. कुठे कॉपी प्रकरण आढळून शाळा मान्यतेची प्रक्रिया सुरू झाली, तर कुठे पेपर कठीण गेल्यामुळे आत्महत्येची घटना घडली. पेपर कठीण गेला म्हणून विद्यार्थ्याने जीवन संपवून टाकणे, पेपर कठीण जाऊ नये म्हणून चिट्ठ्या, मोबाइलमधून प्रश्न मिळवून कॉपी करणे या गंभीर समस्या आज विद्यार्थ्यांसमोर आहेत. त्यांच्या या समस्येला अनेक पैलू असल्याचे दिसून येतात. सुरुवातीपासूनच प्रत्यक्ष परीक्षा नको, अशी री ओढणारी विद्यार्थ्यांची टोळी सक्रिय होती. त्यात हिंदुस्थानी भाऊसारख्या काही व्यक्तींनी हातभार लावत परीक्षांचे वातावरण दूषित केले. एका सर्वेक्षणानुसार शालेय जीवनातील ताण, अडचणी, परीक्षांच्या भीतीमुळे देशातील जवळपास २५ हजार विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य संपविले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या परीक्षेनंतर नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून लगेचच दुसरी परीक्षा घेतली जाते. त्यात पास होण्याची संधी उपलब्ध आहे. तसेच पुढील करिअरवर नापास झालेल्या विषयाचा काहीही परिणाम होणार नाही हे शिक्षकांकडून, पालकांकडून विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यात शिक्षण व्यवस्था कमी पडतेय का ? किंवा कमी गुण मिळाल्यामुळे किंवा नापास झाल्यामुळे समाजातील त्याच्या अस्तित्वावर शिंतोडे उडणार नाहीत, हे समजावण्यात समाजव्यवस्था कमी पडत आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. परीक्षा हा तर शिक्षण व्यवस्थेचा एक भागपरीक्षा हा केवळ शिक्षण व्यवस्थेचा एक भाग आहे, शिक्षण व्यवस्था नाही. त्यामुळे त्यातील कामगिरीवर आपण यशाची शिखरे गाठू शकतो; पण चांगली कामगिरी नाही करू शकलो तर आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही, हा गैरसमज विद्यार्थ्याच्या मनातून कायमचा पुसण्याची गरज आहे.