शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

गुणवंतांची ही कसली कदर? बारा वर्षांत शिष्यवृत्तीत एका रुपयाचीही वाढ नाही !

By दीपक होमकर | Updated: October 14, 2022 06:43 IST

गुणवत्ता यादीत आल्यावरही वर्षाला मिळतात अवघे सरासरी ५०० रु.

- दीपक होमकर लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गेल्या बारा वर्षांत शिक्षकांना सहावा आणि सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे महिन्याला सुमारे पन्नास हजारांची वाढ झाली आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांमुळे शिक्षकांचे अस्तित्व आहे त्यांच्या शिष्यवृत्तीत एक रुपयाचीही वाढ झाली नाही.

पाचवी आणि आठवीचे विद्यार्थी अतिशय कठीण असलेली शिष्यवृत्ती परीक्षा देतात. गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाते. २०१० पर्यंत शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत येणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना सुमारे १५० ते २५० रुपये, तर शहरी विद्यार्थ्यांना २५० ते ७०० रुपये शिष्यवृत्ती दिली जात होती. बारा वर्षांनंतरही २०२२ मध्ये हीच रक्कम मिळत आहे. रखडलेली शिक्षक भरती, न मिळणारे अनुदान, अतिरिक्त शिक्षक आणि वेळेवर न होणारे वेतन आदी विषयांवर माध्यमांकडून शिक्षणमंत्र्यांना सातत्याने प्रश्न विचारले जात हाेते. त्यावर संताप व्यक्त करत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ‘प्रचंड अभ्यास करून गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत अनेक वर्षांपासून काहीच वाढ झाली नाही, त्यावर कोणीच काही बोलत नाही’, अशी खंत व्यक्त केली होती.

‘लोकमत‘ने शिष्यवृत्तीची रक्कम किती? ती किती मुलांना दिली गेली,  त्यामध्ये कोणत्या साली किती वाढ झाली याची माहिती घेतली तेव्हा केसरकर यांची मुलांविषयीची खदखद खरी असल्याचे दिसले.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाते. पूर्वी चौथी आणि सातवीसाठी ही परीक्षा घेतली जात होती. नंतर बदल करून पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ती घेतली जात आहे. उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या १५ ते सोळा हजार विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. त्यांना राज्य शासनाकडून दिली जाणारी शिष्यवृत्ती नाममात्रच आहे.

पाचवीसाठी तीन, तर आठवीसाठी दोन वर्षे पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थी गुणवत्ता यादीत आला तर त्याला सहावी, सातवी आणि आठवीसाठी दरवर्षी तीनशे ते पाचशे (ग्रामीण व शहरी वर्गीकरणानुसार) रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत उत्तीर्ण झाला असेल तर नववी व दहावी या दोन वर्षांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते.