शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

MPSC, UPSC: एमपीएससी, यूपीएससीमध्ये वारंवार अपयश आलेल्यांचे पुढे होते काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 13:29 IST

जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी आयएएस, आयपीएस तसेच, शासकीय अधिकारी बनण्याची स्वप्ने पाहत स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात.

प्रज्ञा म्हात्रेठाणे :

जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी आयएएस, आयपीएस तसेच, शासकीय अधिकारी बनण्याची स्वप्ने पाहत स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. या परीक्षेला बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला यात यश येतेच असे नाही आणि वारंवार येणाऱ्या अपयशामुळे हे विद्यार्थी खचून जातात. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी दुसरा पर्याय निवडण्याचा सल्लाही शिक्षणतज्ज्ञ देतात. दरवर्षी स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या, त्यातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बरीच मोठी तफावत पाहायला मिळते. हे विद्यार्थी ही परीक्षा वारंवार देतात. तर दुसरीकडे वय उलटून जात असल्याचे दडपण येत असते. वारंवार येणारे अपयश पाहता दुसऱ्या पर्यायाकडे नाइलाजाने जातात आणि स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहते, असे या परीक्षेची तयारी करणारे सांगतात. 

वर्षाचा खर्च एक लाख घरच्या घरी अभ्यास करीत असेल तर पुस्तकाचा खर्च सात ते आठ हजार रुपये येतो. कोचिंग क्लास हॉस्टेलसह अंदाजे एक लाख रुपये खर्च येतो आणि क्लास लावला तर ३० ते ६० हजार रुपये फी घेतली जाते. 

दोन टक्के यशस्वी  स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यात मोठी दरी असल्याने या विद्यार्थ्यांपुढे सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्न आ वासून समोर उभे राहतात. त्यामुळे असे विद्यार्थी दुसरा पर्याय निवडतात.  

वय उलटू लागले, पुढे काय? तीन ते चार वर्षे झाले एमपीएससीचा अभ्यास करीत आहे. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे अर्थार्जनासाठी बाहेर पडावे लागते. त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. यश येत नसल्याने आता एमपीएससीकडे मी पर्याय म्हणून पाहत आहे. एमएसडब्ल्यूचा अभ्यास करीत आहे.    - अजय  मी यूपीएससीची तयारी करीत आहे. परीक्षा २०२३ ला देणार आहे. त्यानंतर वारंवार अपयश येत गेले तर पार्टटाईम किंवा फुलटाईम नोकरी करणार. प्लॅन बी तयार आहे.    -गोविंदा मी यूपीएससीची तयारी करीत आहे. उत्तीर्ण होण्याच्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करीत आहे; परंतु यश न आल्यास प्लॅन बी तयार आहे. - सेजल 

दुसरा पर्याय असायलाच हवा यूपीएससी परीक्षा ज्यांना द्यायची आहे त्यांनी तीन वर्षे प्रामाणिकपणे अभ्यास करावा. त्यात यश येत नसेल तर दुसरा पर्याय निवडायला हवा. स्पर्धा परीक्षेची तयारी अकरावी- बारावीपासूनच करावी, त्यामुळे पदवीधर झाल्यानंतर बरीच तयारी झालेली असते. या परीक्षांत अपयश आले तर खचून जाऊ नका.  - महादेव जगताप, संचालक, देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे दुसरा पर्याय असायलाच हवा. कोणत्याही क्षेत्रात प्लॅन ए आणि प्लॅन बी असायलाच हवे. पूर्ण लक्ष हे प्लॅन ‘ए’वर असायला हवे आणि त्यासाठी झटले पाहिजे; परंतु मनासारखे यश प्लॅन ‘ए’मध्ये नाही मिळाले तर प्लॅन ‘बी’ स्वीकारायला हवा.  - डॉ. चंद्रशेखर मराठे, माजी प्राचार्य, ज्ञानसाधना महाविद्यालयआकडे काय सांगतात?२३ जानेवारी २०२२एमपीएससी परीक्षेला बसलेले विद्यार्थी: ९,३२१५ जून २०२२यूपीएससी परीक्षेला बसलेले विद्यार्थी : ५,८८९

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाupscकेंद्रीय लोकसेवा आयोगEducationशिक्षण