शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊनंतर भरवा, अन्यथा कारवाई; मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांचा इशारा

By रेश्मा शिवडेकर | Updated: June 20, 2024 21:02 IST

सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा त्यानंतर भरवावे, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊनंतर भरविण्याबाबत राज्य सरकारच्या निर्णयाचे योग्यरितीने पालन करण्यात यावे. अन्यथा शाळांवर कारवाईचा इशारा मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिला आहे.

सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा त्यानंतर भरवावे, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार सर्व शाळांनी वेळांमध्ये बदल कऱण्याचे आदेश देण्यात आले होते. या निर्णयाचे योग्य रितीने पालन व्हावे. तसे न झाल्यास कारवाई कऱण्यात येईल, असे मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी स्पष्ट केले आहे.

जागेची चणचण, पालक-शिक्षकांचा विरोध अशा अनेक अडचणींमुळे मुंबई-ठाण्यातील अनेक शाळांचा चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊनंतर भरविण्याला विरोध आहे. संपूर्ण शाळाच दोन शिफ्टमध्ये भरविल्या जातात. तर काही शाळांमधील प्राथमिकच्या शिक्षकांना उशीराची वेळ मान्य नाही. तर काही शाळांकडे प्राथमिकचे वर्ग एकाचवेळी भरविता येतील इतक्या पायाभूत सुविधा नाहीत. 

टॅग्स :Schoolशाळा