शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

SSC EXAM: बाहेरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचे काय ? निकष आज जाहीर होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 11:32 IST

SSC EXAM: शिक्षण विभाग आणि शिक्षणमंत्र्यांकडून शुक्रवारी दहावीच्या मूल्यमापनाचे निकष जाहीर होण्याची शक्यता आहे. दहावीच्या मूल्यमापनासाठी त्यांच्या चाचण्या, परीक्षा तसेच नववीच्या गुणांचा विचार होण्याची शक्यता आहे.

मुंबई -  दहावीची परीक्षा रद्द केल्यामुळे सद्य:स्थितीत शिक्षण विभागाकडून यंदा दहावीचे मूल्यमापन कसे होईल यावर खलबतं सुरू आहेत. मात्र, या नियमित विद्यार्थ्यांसोबत लाखो विद्यार्थी बाहेरून म्हणजेच १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षा देत असतात. या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा शिक्षण विभाग आणि राज्य मंडळ काय विचार करणार आहे ? त्यांचे अंतर्गत मूल्यमापन होऊ शकणार नसल्याने त्यांच्या मूल्यमापनासाठी काय निकष लावणार आहे ? असे प्रश्न या विद्यार्थी आणि काही अभ्यासकांकडून उपस्थित केले जात आहेत. अनेक विद्यार्थी नववी पूर्ण केल्यानंतर, नापास झाल्यानंतर किंवा शिक्षणात खंड पडल्यामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा १७ नंबरचा अर्ज भरून देतात. या विद्यार्थ्यांची शाळांमध्ये उपस्थिती नसते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मूल्यमान कसे केले जाणार याबाबत कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत. राज्य शिक्षण मंडळ आणि शिक्षण विभाग सद्य:स्थितीत दहावी मूल्यमापनासाठी अंतर्गत मूल्यमापनाच्या पर्यायाचा विचार  करत आहे. शाळांनी आतापर्यंत घेतलेल्या चाचण्या, परीक्षा, उपक्रम यांच्या आधारावर विद्यार्थ्यांचे  दहावीचे मूल्यमापन केले जाईल. पण बाहेरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत हे निकष कसे लागू पडणार, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केला आहे. 

निकष आज जाहीर होण्याची शक्यताशिक्षण विभाग आणि शिक्षणमंत्र्यांकडून शुक्रवारी दहावीच्या मूल्यमापनाचे निकष जाहीर होण्याची शक्यता आहे. दहावीच्या मूल्यमापनासाठी त्यांच्या चाचण्या, परीक्षा तसेच नववीच्या गुणांचा विचार होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :ssc examदहावीEducation Sectorशिक्षण क्षेत्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार