शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विद्या येई घम घम... ‘त्या’ निर्णयांनी आणखी वाट लागणार

By सीमा महांगडे | Updated: September 26, 2022 06:12 IST

तूर्तास तरी पुढील किमान २ वर्षांत शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी मोटबांधणी करण्याचे आव्हान शिक्षण विभागापुढे आहे.

सीमा महांगडे, वार्ताहर

कोविड-१९ चा सर्वच क्षेत्रांप्रमाणे शिक्षण क्षेत्रावरही परिणाम झाला! युनिसेफच्या मते, शाळा बंद असल्याने मुलांवर याचा गंभीर परिणाम झाला असून, अनेक विद्यार्थी शाळाबाह्य झाले आहेत. बालविवाह, बालमजुरीचे प्रमाण वाढले आहे. हे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी पुढील दशकांचा कालावधी लागू शकतो. पण, तूर्तास तरी पुढील किमान २ वर्षांत शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी मोटबांधणी करण्याचे आव्हान शिक्षण विभागापुढे आहे. मात्र, शिक्षण विभागातील सध्यस्थितीत एकामागून एक येणारे अनाकलनीय निर्णय पाहून शिक्षण विभागाचीच शाळा घेऊन, गृहपाठ करायला लावला पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शाळा, विद्यार्थी, पालक -शिक्षक सगळेच शिक्षण विभागाच्या या अनाकलनीय उपक्रम आणि प्रयोगांमध्ये भरडले जात आहेत. 

देशोदेशीच्या यंत्रणा शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी कामाला लागलेल्या असताना राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे आणि त्यावर होणार खर्च मोजणे कितपत शोभणारे आहे हे सरकारी यंत्रणेलाच ठाऊक..! पूर्वी शिक्षणावर होणारा २० टक्के खर्च आता १८ टक्क्यांवर आला असला, तरी तो सरकारला डोईजड होत असेल तर राज्याच्या प्रगतीत आणि सार्वत्रिक विकासाचे मूळ असणाऱ्या शिक्षणाची गंगा प्रत्येक वंचित घटकापर्यंत पोहोचणार कशी, असा प्रश्न उपस्थित होतो. शासनाचे अनेक अंगीकृत उपक्रम, मंडळे, महामंडळे हे पांढरे हत्ती असून तेथे केल्या जाणाऱ्या राजकीय नियुक्त्या बंद केल्यास खर्चावर नियंत्रण येईल. मात्र शिक्षण व शिक्षक वेतनाची तुलना प्रशासकीय खर्चांशी करू नये, अशी भूमिका शिक्षण क्षेत्रातून मांडली जात आहे.

राज्यात सध्या दोन-तीन वर्गांसाठी १ शिक्षक, त्यातही एकीकडे मुख्याध्यापकाचा प्रभार आणि अशैक्षणिक कामांचा ससेमिरा अशी परिस्थिती आहे. मग शिक्षकांकडून तरी विद्यार्थ्यांना परिपूर्ण, आनंददायी, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची हमी कशी बाळगता येणार आहे? मुख्याध्यापक, कला शिक्षक, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी अशी पदेच रिक्त असल्यास शिक्षणाचा प्रशासकीय कणा ताठ राहील, याची अपेक्षा आपोआपच फोल ठरते. शिक्षकांचे फोटो वर्गात लावण्याऐवजी सर्व पदे भरली गेल्यास कामकाजात गतिमानता येईल. गुणवत्ता संवर्धनासाठी आवश्यक पर्यवेक्षण आणि विद्यार्थी हिताच्या योजना परिणामकारकपणे राबविता येणार नाही. मात्र, आता राज्य सरकारला पद भरतीचा हा खर्चही सोसवेनासा झाला आहे. 

टीईटी घोटाळ्याला जबाबदार शासन यंत्रणेवरील कारवाई बाजूलाच राहिली आहे. त्यामुळे बेरोजगार आजही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. रिक्त पदे, अर्हता असलेले बेरोजगार तरुण आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जासाठी आवश्यक यंत्रणा यांचा ताळमेळ साधला तर मागील २ वर्षांत झालेले नुकसान भरून काढण्यासाठी किमान कार्यक्रम तरी तयार होईल. मात्र, या सगळ्याला छेद देत शिक्षण विभागाकडून चित्रविचित्र उपक्रमांचा उहापोह चालविला आहे. यामुळे शिक्षणाची आणखी वाट लागण्याची शक्यता आहे.

  • शालेय शिक्षण विभागासाठी शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी दिवास्वप्न ठरले आहे. एकीकडे नवीन शैक्षणिक धोरणातील विद्यार्थी सुसंगत, शिक्षक व शाळा यांना दिलासा देणाऱ्या तरतुदी, तर दुसरीकडे सध्याच्या अनाकलनीय निर्णयामधून त्याला दिला जाणार छेद परस्परविरोधी असल्याचे दिसत आहे.
  • शिक्षण विभागातील समस्या, अडचणी सोडवायच्या सोडून गृहपाठासारख्या दृढ संकल्पना असणाऱ्या विषयाला हात घालणे, शिक्षकांचा फोटो वर्गात लावणे सारख्या उपक्रमाची उठाठेव करण्यामागे शैक्षणिक की राजकीय हेतू आहे, हे कळेनासे झाले आहे. 
  • सरकारने राजकारण बाजूला ठेवून विद्यार्थी, शिक्षक केंद्री शिक्षणाला महत्त्व दिले तर शिक्षणाची गाडी पुन्हा रुळावर यायला नक्कीच मदत होईल.
टॅग्स :Educationशिक्षण