शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

जेईई ॲडव्हान्सची फेरपरीक्षा घ्यावी, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 13:38 IST

परीक्षेदरम्यान अशा तांत्रिक अडचणी आल्याने अनेक विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला, त्यांना प्रश्नांची उत्तरे नीट सोडविता आली नाहीत, त्यांना परीक्षेवर लक्ष केंद्रित करता आले नाही, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या.

मुंबई : देशातील आयआयटी आणि एनआयटी या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेली जेईई ॲडव्हान्सची परीक्षा रविवारी पार पडली. या परीक्षेसाठी एक लाख ६० हजार ३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी एक लाख ५६ हजार ८९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. जेईई ॲडव्हान्स परीक्षेत काही केंद्रांवर तांत्रिक अडचणी आल्याने, विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून, अडचणी आलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात यावी, या मागणीसाठी पालक आणि विद्यार्थी उच्च न्यायालयात गेले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, गुरुवारपर्यंत आयआयटी मुंबईला स्पष्टीकरण देण्याची सूचना देण्यात आली आहे, अशी माहिती याचिकाकर्ते गोरक्ष झेंड्ये यांनी दिली आहे.

 यंदा आयआयटी मुंबईकडून २८ ऑगस्टला ऑनलाइन जेईई ॲडव्हान्सची परीक्षा घेण्यात आली. परीक्षेदरम्यान अनेक तांत्रिक दोषांचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला. झूम इन होणे, परीक्षा सुरू असताना स्क्रीनवर एकही प्रश्न न दिसणे, माऊस व्यवस्थित न चालणे, अशा अनेक तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. परीक्षेदरम्यान अशा तांत्रिक अडचणी आल्याने अनेक विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला, त्यांना प्रश्नांची उत्तरे नीट सोडविता आली नाहीत, त्यांना परीक्षेवर लक्ष केंद्रित करता आले नाही, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या. मात्र, त्यांची कोणतीही दखल घेण्यात आली नाही, अशी माहिती  याचिकाकर्त्यांनी दिली आहे. तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी आम्ही विद्यार्थी आणि पालकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी दिली. 

११ सप्टेंबरला जाहीर हाेणार निकाल-     संपूर्ण देशभरातील विविध ठिकाणी अशा अडचणी आल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहेे. जेईईची परीक्षा एकाच वेळी देशभरात घेण्यात आली. ११ सप्टेंबरला निकाल जाहीर होणार आहे. 

-     ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक दोषांअभावी पेपर सोडविता आला नाही, त्यांचे यामुळे नुकसान होणार आहे. यात विद्यार्थ्यांचा कोणताही दोष नसताना, त्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे, असे याचिकाकर्त्यांनी सांगितले. 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीMumbai High Courtमुंबई हायकोर्ट