शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

आता २ वर्षात मिळणार एमसीए कोर्सची पदवी; एआयसीटीईचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 08:19 IST

एमसीए कोर्सचा कालावधी ३ वर्षावरुन कमी करत २ वर्षावर आणण्यावर सहमती

नवी दिल्ली – कॅम्प्युटर एप्लिकेशनमध्ये मास्टर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. आता सर्व विद्यार्थ्यांसाठी एमसीए(MCA) डिग्री कोर्स फक्त २ वर्षाचा असणार आहे. ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन(AICTE) ने याबाबत मोठा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. यासंदर्भात काऊन्सिलनं परिपत्रकही काढलं आहे.

परिपत्रकात ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनचे सचिव राजीव कुमार यांनी सांगितले की, विद्यापीठ अनुदान आयोग(UCG) ने डिसेंबर २०१९ च्या बैठकीत एमसीए कोर्सचा कालावधी ३ वर्षावरुन कमी करत २ वर्षावर आणण्यावर सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता एआयसीटीईने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या कोर्सकडे आकर्षिक करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. काऊन्सिलने याबाबत सर्व कॉलेज आणि विद्यापीठांना परिपत्रक पाठवलं आहे.

यापूर्वी एमसीए कोर्स दोन आणि तीन वर्षासाठी होता, एका कोर्सचा दोन वेगवेगळे कालावधी होते. जे विद्यार्थी बीएससी कॅम्प्युटर सायन्स अथवा बीसीए करुन एमसीए करत होते, त्यांना २ वर्षात एमसीए पदवी मिळत होती. तर इतर पदवीधारक जे मॅथ्ससह अन्य कोर्स करत होते त्यांच्यासाठी एमसीएचा कालावधी ३ वर्षाचा होता. पण आता सर्व विद्यार्थ्यांसाठी एमसीएचा कालावधी फक्त २ वर्षाचा असणार आहे.

त्यामुळे आता २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून एमसीएचा कोर्स ३ ऐवजी २ वर्षाचा असेल. यात बीसीए, कॅम्प्युटर सायन्स, इतर पदवीधारक, गणित विषय घेतलेले बीएससी, बीकॉम आणि बीए पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना एमसीएला प्रवेश घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना एमसीएत प्रवेश घेण्यासाठी कमीत कमी ५० टक्के मार्क्स हवे आहेत. तसेच आरक्षित विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शैक्षणिक अर्हतेत ५ टक्के सूट देण्यात आली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीuniversityविद्यापीठ