शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशाची परीक्षा हायकोर्टानं केली रद्द, आता शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांनी काढला नवा मार्ग; म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 17:04 IST

मुंबई हायकोर्टानं महाराष्ट्र सरकारला दणका देत इयत्ता अकरावी प्रवेशासाठीची २१ ऑगस्ट २०२१ रोजी होणारी सीईटी परीक्षा रद्द केली आहे.

मुंबई हायकोर्टानं महाराष्ट्र सरकारला दणका देत इयत्ता अकरावी प्रवेशासाठीची २१ ऑगस्ट २०२१ रोजी होणारी सीईटी परीक्षा रद्द केली आहे. राज्य सरकारनं यावेळी इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा लेखी परीक्षा न घेता नव्या निषकांनुसार निकाल जाहीर केला होता. त्यानंतर इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यासंदर्भात २८ मे रोजी एक अध्यादेश काढला होता. सरकारचा हा अध्यादेश हायकोर्टानं रद्द केला आहे. 

विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारेच इयत्ता अकरावीसाठीचे प्रवेश द्यावेत, असे निर्देश कोर्टानं दिले आहेत. कोर्टाच्या निकालावर आता राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 

"न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करून त्यानंतर अंतर्गत गुणांच्या निकालाच्या आधारावर प्रवेशक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात येईल, तसेच त्याचे नियोजन करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेसाठी नोंदणीही केली होती, तर काहींनी अभ्यासही सुरू केला होता. राज्य सरकारने न्यायालयात बाजू मांडण्याचा प्रयत्न केला मात्र कोर्टाच्या निर्णयानुसारच प्रवेश प्रक्रिया राबवावी लागणार आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदा ही अकरावीची प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यात येईल आणि प्रत्येकाला प्रवेश मिळेल", असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. 

४८ तासांत विद्यार्थ्यांना माहिती द्याराज्य सरकारनं ४८ तासांत निकालाची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी, असंही निर्देश कोर्टानं दिले आहेत. तसेच पुढील सहा आठवड्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधीच्या सुनावणीत राज्य सरकारकडून आशुतोष कुंभकोणी यांनी सीईटी परीक्षा घेण्यासंदर्भात राज्य सरकारची बाजू मांडली होती. 

टॅग्स :Varsha Gaikwadवर्षा गायकवाडssc examदहावीexamपरीक्षा