शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

शिका, नोकरी करा अन् पुन्हा शिका... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 08:12 IST

पदवी शिक्षणामध्ये चौथे वर्ष वाढविण्यात आले आहे, मात्र ते सक्तीचे नाही.

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर (संचालक, उच्चशिक्षण विभाग तथा सदस्य सचिव, एनईपी सुकाणू समिती)

उद्योगाप्रमाणेच शिक्षणातही आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० तत्काळ अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एनईपी अंमलबजावणीसाठी माजी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीने राज्यातील विविध विद्यापीठे, गट, विद्यार्थी, पालक, प्राचार्य यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करीत शासनास अहवाल सादर केला. या अहवालाच्या आधारावर दि. २० एप्रिल आणि ११ मे २०२३ रोजी दोन शासन निर्णय जारी केले. त्यामध्ये एनईपीच्या अनुषंगाने उच्चशिक्षणामध्ये कोणते बदल करावे लागतील याबाबतच्या मार्गदर्शक सूचना विद्यापीठांना दिल्या आहेत.  

पदवी तीन वर्षांवरून चार वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला. अभ्यासक्रमात मुख्य विषयांना ६०, तर उपविषयांना ४० टक्के महत्त्व दिले आहे. यापूर्वी विद्यार्थ्याने अर्थशास्त्रातून बीए केले तर त्याला केवळ त्याच विषयाचा अभ्यास करावा लागत असे. आता विद्यार्थी अर्थशास्त्राबरोबर संगीत शिकू शकतो, वाणिज्य शाखेतील कररचनेबाबत कोर्स करू शकतो. एवढेच नाही तर विज्ञानातील एखादा विषयही त्याला अभ्यासता येणार आहे. पदवी अभ्यासक्रमात कौशल्यावर आधारित चार क्रेडिटचे कोर्सेस पूर्ण करावे लागणार आहेत. यासह ऑन जॉब ट्रेनिंग, इंटर्नशिप, भारतीय ज्ञान परंपरा आधारित कोर्सेसचा अंतर्भाव केला आहे.

विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने बदल केले आहेत. पूर्वीचा साचेबद्धपणा दूर होऊन अनेक विषयांचे ज्ञान मिळवण्याचा मार्ग विद्यार्थ्यांसाठी खुला केला आहे. पदवीचे शिक्षण घेताना प्रथम वर्ष पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी शिक्षण सोडून नोकरी करून पुन्हा पदवीला प्रवेश घेण्याची मुभा दिली आहे. सात वर्षांत त्याला पदवी पूर्ण करावी लागणार आहे. प्रवेश घेताना बँक खात्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांचे अकॅडेमिक बॅंक ऑफ क्रेडिट (एबीसी) खाते उघडावे लागेल. या खात्यामध्ये विद्यार्थ्याचे सर्व गुण, क्रेडिट्स जमा होत राहतील. दरवर्षी ४० क्रेडिट्स त्याला मिळू शकतात आणि ४ क्रेडिट्स कौशल्यावर आधारित असतील. एकूण ४४ क्रेडिट्सचे प्रथम वर्ष असेल. विद्यार्थ्याने प्रथम वर्ष उत्तीर्ण केल्यास प्रमाणपत्र मिळेल. द्वितीय वर्षानंतर डिप्लोमा, तृतीय वर्ष उत्तीर्ण झाल्यानंतर पदवी प्रदान केली जाईल.

पदवी शिक्षणामध्ये चौथे वर्ष वाढविण्यात आले आहे, मात्र ते सक्तीचे नाही. पदवी १६० क्रेडिट्सची असणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या विषयात संशोधन करायचे असेल, इंटर्नशिप करायची असेल, प्रोजेक्ट सादर करायचा असेल तर त्यासाठी हे वर्ष असेल. चार वर्षांची पदवी घेतल्यानंतर पदव्युत्तर पदवीसाठीचा कालावधी दोन वर्षे न राहता एक वर्षे करण्यात आला. यामुळे परदेशात शिक्षण घेतानाही एक वर्षात पीजी पूर्ण होण्यास मदत होणार आहे. या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रात धोरण राबवले जाणार आहे. 

             (शब्दांकन : प्रशांत बिडवे)  

टॅग्स :Educationशिक्षण