शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
2
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
3
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
4
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
5
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
6
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
7
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
8
'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये
9
WPL 2026 : आरसीबीच्या ताफ्यातील ब्युटीनं एका ओव्हरमध्ये २ विकेट्स घेत मैफील लुटली, पण...
10
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
11
KL Rahul Break Kohli Record: बिग सरप्राइज! KL राहुलनं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड! MS धोनी नंबर वन
12
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल
13
"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
14
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
15
WPL 2026 : मुंबई इंडियन्सचा सामना प्रेक्षकांविना खेळवण्याची वेळ; जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा
17
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
18
सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...
19
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
20
Crime: सेक्ससाठी नकार देणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं फुटलं पतीचं पितळ!
Daily Top 2Weekly Top 5

शिका, नोकरी करा अन् पुन्हा शिका... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 08:12 IST

पदवी शिक्षणामध्ये चौथे वर्ष वाढविण्यात आले आहे, मात्र ते सक्तीचे नाही.

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर (संचालक, उच्चशिक्षण विभाग तथा सदस्य सचिव, एनईपी सुकाणू समिती)

उद्योगाप्रमाणेच शिक्षणातही आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० तत्काळ अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एनईपी अंमलबजावणीसाठी माजी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीने राज्यातील विविध विद्यापीठे, गट, विद्यार्थी, पालक, प्राचार्य यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करीत शासनास अहवाल सादर केला. या अहवालाच्या आधारावर दि. २० एप्रिल आणि ११ मे २०२३ रोजी दोन शासन निर्णय जारी केले. त्यामध्ये एनईपीच्या अनुषंगाने उच्चशिक्षणामध्ये कोणते बदल करावे लागतील याबाबतच्या मार्गदर्शक सूचना विद्यापीठांना दिल्या आहेत.  

पदवी तीन वर्षांवरून चार वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला. अभ्यासक्रमात मुख्य विषयांना ६०, तर उपविषयांना ४० टक्के महत्त्व दिले आहे. यापूर्वी विद्यार्थ्याने अर्थशास्त्रातून बीए केले तर त्याला केवळ त्याच विषयाचा अभ्यास करावा लागत असे. आता विद्यार्थी अर्थशास्त्राबरोबर संगीत शिकू शकतो, वाणिज्य शाखेतील कररचनेबाबत कोर्स करू शकतो. एवढेच नाही तर विज्ञानातील एखादा विषयही त्याला अभ्यासता येणार आहे. पदवी अभ्यासक्रमात कौशल्यावर आधारित चार क्रेडिटचे कोर्सेस पूर्ण करावे लागणार आहेत. यासह ऑन जॉब ट्रेनिंग, इंटर्नशिप, भारतीय ज्ञान परंपरा आधारित कोर्सेसचा अंतर्भाव केला आहे.

विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने बदल केले आहेत. पूर्वीचा साचेबद्धपणा दूर होऊन अनेक विषयांचे ज्ञान मिळवण्याचा मार्ग विद्यार्थ्यांसाठी खुला केला आहे. पदवीचे शिक्षण घेताना प्रथम वर्ष पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी शिक्षण सोडून नोकरी करून पुन्हा पदवीला प्रवेश घेण्याची मुभा दिली आहे. सात वर्षांत त्याला पदवी पूर्ण करावी लागणार आहे. प्रवेश घेताना बँक खात्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांचे अकॅडेमिक बॅंक ऑफ क्रेडिट (एबीसी) खाते उघडावे लागेल. या खात्यामध्ये विद्यार्थ्याचे सर्व गुण, क्रेडिट्स जमा होत राहतील. दरवर्षी ४० क्रेडिट्स त्याला मिळू शकतात आणि ४ क्रेडिट्स कौशल्यावर आधारित असतील. एकूण ४४ क्रेडिट्सचे प्रथम वर्ष असेल. विद्यार्थ्याने प्रथम वर्ष उत्तीर्ण केल्यास प्रमाणपत्र मिळेल. द्वितीय वर्षानंतर डिप्लोमा, तृतीय वर्ष उत्तीर्ण झाल्यानंतर पदवी प्रदान केली जाईल.

पदवी शिक्षणामध्ये चौथे वर्ष वाढविण्यात आले आहे, मात्र ते सक्तीचे नाही. पदवी १६० क्रेडिट्सची असणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या विषयात संशोधन करायचे असेल, इंटर्नशिप करायची असेल, प्रोजेक्ट सादर करायचा असेल तर त्यासाठी हे वर्ष असेल. चार वर्षांची पदवी घेतल्यानंतर पदव्युत्तर पदवीसाठीचा कालावधी दोन वर्षे न राहता एक वर्षे करण्यात आला. यामुळे परदेशात शिक्षण घेतानाही एक वर्षात पीजी पूर्ण होण्यास मदत होणार आहे. या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रात धोरण राबवले जाणार आहे. 

             (शब्दांकन : प्रशांत बिडवे)  

टॅग्स :Educationशिक्षण