शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

एकात्मिक पाठ्यपुस्तक प्रकल्प; एका विद्यार्थ्यासाठी वर्षभर फक्त तीन पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 10:46 IST

इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सर्व विषयांच्या पाठ्यपुस्तकांचे एकात्मिक स्वरुपात तीन स्वतंत्र भागामध्ये पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार वर्षभर केवळ तीन पुस्तके विद्यार्थ्यांना राहणार आहेत. इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये एकात्मिक पाठ्यपुस्तक प्रकल्प प्रयोगीक तत्वावर चिखली तालुक्यात राबविणार आहे.नवीन शैक्षणिक वर्षामध्ये एकात्मिक पाठ्यपुस्तक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. इयत्ता पहिली ते सातवीच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी हा विशेष प्रयोग आहे. ज्या इयत्तेला जेवढे पाठ्यपुस्तके असतील तेवढे एकत्र करण्यात आले असून, त्याचे तीन भाग केले आहेत. पहिल्या भागात पहिल्या तीन महिण्यात शिकविला जाणारा अभ्यासक्रम आहे. दुसऱ्या भागात पुढील तीन महिण्यात शिकविला जाणारा अभ्यासक्रम आहे.तिसºया भागात त्यापुढील तीन महिण्यात शिकविला जाणारा अभ्यासक्रम आहे. त्यानुसार एका विद्यार्थ्यासाठी वर्षभर फक्त तीन पुस्तके असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व पुस्तके शाळेमध्ये नेण्याची आवश्यकता नाही. प्रायोगीक तत्वावर राबविण्यात येणाºया या प्रकल्पासाठी बुलडाणा जिल्ह्यातून चिखली तालुक्याची निवड करण्यात आली आहे. चिखली तालुक्यात २७२ शाळा आहेत. त्यामध्ये जवळपास पहिली ते सातवीपर्यंतचे २३ हजार ४२४ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना एकात्मिक पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

पाच दिवसात मिळतील एमात्मिक पुस्तकेएकात्मिक प्रकल्पांतर्गत दिली जाणारी पुस्तकेही येत्या पाच दिवसात उपलब्ध होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. सध्या दरवर्षीप्रमाणे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना बालभारतीचे मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या ठिकाणी तीन पुस्तकांचा उपक्रम आहे, त्याठिकाणी समग्र शिक्षा अभियानांतर्गत दिली जणारी मोफत पाठ्यपुस्तके वितरीत होणार नाहीत.

विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी हा विशेष प्रयोग आहे. ज्यामध्ये वर्षभर फक्त तीन पुस्तके व त्यात सर्व विषयांचा अभ्यासक्रम आहे. त्यामुळे मुलांना सर्व पुस्तके शाळेत आणण्याची गरज राहणार नाही. यासाठी चिखली तालुक्याची निवड केली असून या आठवड्यात पुस्तके उपलब्ध होतील.- एजाज खान,शिक्षणाधिकारी, प्राथमिक, बुलडाणा.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी