शहरं
Join us  
Trending Stories
1
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
2
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
3
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
4
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
5
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
6
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
7
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
8
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
9
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
10
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
11
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
12
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
13
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
14
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
15
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
16
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
17
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
18
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
19
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
20
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
Daily Top 2Weekly Top 5

एकात्मिक पाठ्यपुस्तक प्रकल्प; एका विद्यार्थ्यासाठी वर्षभर फक्त तीन पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 10:46 IST

इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सर्व विषयांच्या पाठ्यपुस्तकांचे एकात्मिक स्वरुपात तीन स्वतंत्र भागामध्ये पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार वर्षभर केवळ तीन पुस्तके विद्यार्थ्यांना राहणार आहेत. इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये एकात्मिक पाठ्यपुस्तक प्रकल्प प्रयोगीक तत्वावर चिखली तालुक्यात राबविणार आहे.नवीन शैक्षणिक वर्षामध्ये एकात्मिक पाठ्यपुस्तक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. इयत्ता पहिली ते सातवीच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी हा विशेष प्रयोग आहे. ज्या इयत्तेला जेवढे पाठ्यपुस्तके असतील तेवढे एकत्र करण्यात आले असून, त्याचे तीन भाग केले आहेत. पहिल्या भागात पहिल्या तीन महिण्यात शिकविला जाणारा अभ्यासक्रम आहे. दुसऱ्या भागात पुढील तीन महिण्यात शिकविला जाणारा अभ्यासक्रम आहे.तिसºया भागात त्यापुढील तीन महिण्यात शिकविला जाणारा अभ्यासक्रम आहे. त्यानुसार एका विद्यार्थ्यासाठी वर्षभर फक्त तीन पुस्तके असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व पुस्तके शाळेमध्ये नेण्याची आवश्यकता नाही. प्रायोगीक तत्वावर राबविण्यात येणाºया या प्रकल्पासाठी बुलडाणा जिल्ह्यातून चिखली तालुक्याची निवड करण्यात आली आहे. चिखली तालुक्यात २७२ शाळा आहेत. त्यामध्ये जवळपास पहिली ते सातवीपर्यंतचे २३ हजार ४२४ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना एकात्मिक पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

पाच दिवसात मिळतील एमात्मिक पुस्तकेएकात्मिक प्रकल्पांतर्गत दिली जाणारी पुस्तकेही येत्या पाच दिवसात उपलब्ध होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. सध्या दरवर्षीप्रमाणे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना बालभारतीचे मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या ठिकाणी तीन पुस्तकांचा उपक्रम आहे, त्याठिकाणी समग्र शिक्षा अभियानांतर्गत दिली जणारी मोफत पाठ्यपुस्तके वितरीत होणार नाहीत.

विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी हा विशेष प्रयोग आहे. ज्यामध्ये वर्षभर फक्त तीन पुस्तके व त्यात सर्व विषयांचा अभ्यासक्रम आहे. त्यामुळे मुलांना सर्व पुस्तके शाळेत आणण्याची गरज राहणार नाही. यासाठी चिखली तालुक्याची निवड केली असून या आठवड्यात पुस्तके उपलब्ध होतील.- एजाज खान,शिक्षणाधिकारी, प्राथमिक, बुलडाणा.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी