शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

आरटीई प्रवेशासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ; ओटीपी समस्या, लॉकडाऊनमुळे निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 07:04 IST

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुले किंवा मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे

मुंबई : वाढत्या कोरोनामुळे विविध जिल्ह्यांमध्ये करण्यात येत असलेले लॉकडाऊन आणि आरटीई प्रवेश प्रक्रियेत ओटीपीच्या निर्माण झालेल्या तांत्रिक समस्येमुळे आरटीई प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी पालकांना ३० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे २०२१-२२ या वर्षाची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत आहे. 

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुले किंवा मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. २०२०-२१  या वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी सर्व जिल्ह्यांतील आरटीईअंतर्गत पात्र असलेल्या ९४३२ शाळांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरण्यास ३ मार्चपासून सुरुवात झाली. पालकांना २१ मार्चपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत दिली होती; परंतु मात्र ११ ते १५ मार्चदरम्यान ओटीपीची तांत्रिक अडचण आल्यामुळे पालकांना अर्ज भरता आले नाहीत. आता तांत्रिक अडचण दूर करण्यात आली असली तरी अनेक पालकांना अर्ज करण्यसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी त्यांनी संचालनालयाकडे केली होती. त्यातच काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन घोषित झाल्याने मुदतवाढ देण्यात आली.

मुंबई जिल्ह्यात गेल्या वर्षी ३६७ शाळांनी नोंदणी केली होती. त्यातून ७ हजार २ जागा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाल्या होत्या. यंदा मात्र शाळांच्या नोंदणीत घट झाली असून केवळ ३५२ शाळांची नोंदणी झाली. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी केवळ ६४६३ जागा उपलब्ध होऊ शकतील. 

आरटीई २०२१-२२शाळांची संख्या - पहिलीसाठी जागा - पूर्वप्राथमिक जागा  राज्य मंडळ - २९०-४८०९-४१८इतर बोर्ड - ६२-११७२-६४एकूण - ३५२-५९८१-४८२

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाSchoolशाळाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस