शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

Education: शिक्षकांनी शिकवणे महत्त्वाचे, की मुख्यालयी राहणे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 05:37 IST

Education: शिक्षकांनी वेळेवर येणे, अध्यापन करणे महत्त्वाचे, की मुख्यालयी राहणे? त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. मुख्यालयी राहत नाही म्हणून वेळेवर येत नाही, गुणवत्ताच नाही हे विधान शिक्षकांच्या मानसिकेला धक्का देणारे आहे.

- शिवाजी काकडे, सहायक शिक्षक, लालवण निधोना, जि. औरंगाबादमहाराष्ट्र कायदेमंडळाचे सन्माननीय सदस्य प्रशांत बंब यांनी शिक्षक मुख्यालयात उपस्थित राहात नाहीत, याबाबत प्रश्न केला आहे. माझ्या लहानपणी खूप बैल असायचे. आज शेतकरी बैल पाळत नाही म्हणून तो शेतीत काम करत नाही; असा दावा केला तर तो चुकीचा ठरेल ना? कामाचे स्वरूप बदलले, काम कमी झाले नाही. शिक्षकाने शाळेच्या गावात राहावे, याबाबतचा शासन निर्णय झाला तेव्हाच्या दळणवळण सुविधा व आजच्या सुविधा यात फरक आहे. काळाप्रमाणे परिस्थिती बदलणारच! शिक्षकांनी वेळेवर येणे, अध्यापन करणे महत्त्वाचे, की मुख्यालयी राहणे? त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. मुख्यालयी राहत नाही म्हणून वेळेवर येत नाही, गुणवत्ताच नाही हे विधान शिक्षकांच्या मानसिकेला धक्का देणारे आहे. अपवाद असतीलच. परंतु सरसकट सर्वांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य होणार नाही. आजही ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत. आपला मुलगा कितवीत आहे, हे माहीत नसणाऱ्यांच्या मुलांना आम्ही आई - वडिलांप्रमाणे जपतो, शिकवतो. सर्व विद्यार्थ्यांना गणवेश नाही मिळत तेंव्हा पदरमोड करणारेही अनेक शिक्षक आहेत.ग्रामीण भागातील ८० टक्के गावातील ८० टक्के लोकांनी स्वतःचे गाव सोडून शेत, शेतालगत घरे बांधली. जागेच्या अडचणी, पाण्याच्या अडचणी अनेक कारणे आहेत. मला स्वतःला लालवण गावात खोली मिळाली नाही. काही दिवस मी बाजूच्या गावाला राहिलो. तिथेही तीच अडचण! शेवटी ग्रामपंचायतीच्या खोलीत आम्ही शिक्षक राहिलो. भाड्याने देता येतील, अशी अधिकची घरे बांधण्याइतका ग्रामीण भागात पैसा नाही. मी जन्मापासून आजपर्यंत गावात राहतो. पंढरपुराला पायी गेले तरच विठ्ठल पावतो, अशीही धारणा आहे. परंतु गाडीचा, विमानाचा वापर करून जाणाराही भाविकच ना! शिक्षणाच्या या वारीत कुणी मुख्यालयी राहील, तर कुणी अप-डाऊन करत विठ्ठलाला (विद्यार्थ्याला) गुणवत्तापूर्ण शिक्षण देत राहील, एवढे नक्की! 

टॅग्स :Teacherशिक्षकEducationशिक्षण