शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

Education: शिक्षकांनी शिकवणे महत्त्वाचे, की मुख्यालयी राहणे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 05:37 IST

Education: शिक्षकांनी वेळेवर येणे, अध्यापन करणे महत्त्वाचे, की मुख्यालयी राहणे? त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. मुख्यालयी राहत नाही म्हणून वेळेवर येत नाही, गुणवत्ताच नाही हे विधान शिक्षकांच्या मानसिकेला धक्का देणारे आहे.

- शिवाजी काकडे, सहायक शिक्षक, लालवण निधोना, जि. औरंगाबादमहाराष्ट्र कायदेमंडळाचे सन्माननीय सदस्य प्रशांत बंब यांनी शिक्षक मुख्यालयात उपस्थित राहात नाहीत, याबाबत प्रश्न केला आहे. माझ्या लहानपणी खूप बैल असायचे. आज शेतकरी बैल पाळत नाही म्हणून तो शेतीत काम करत नाही; असा दावा केला तर तो चुकीचा ठरेल ना? कामाचे स्वरूप बदलले, काम कमी झाले नाही. शिक्षकाने शाळेच्या गावात राहावे, याबाबतचा शासन निर्णय झाला तेव्हाच्या दळणवळण सुविधा व आजच्या सुविधा यात फरक आहे. काळाप्रमाणे परिस्थिती बदलणारच! शिक्षकांनी वेळेवर येणे, अध्यापन करणे महत्त्वाचे, की मुख्यालयी राहणे? त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. मुख्यालयी राहत नाही म्हणून वेळेवर येत नाही, गुणवत्ताच नाही हे विधान शिक्षकांच्या मानसिकेला धक्का देणारे आहे. अपवाद असतीलच. परंतु सरसकट सर्वांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य होणार नाही. आजही ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत. आपला मुलगा कितवीत आहे, हे माहीत नसणाऱ्यांच्या मुलांना आम्ही आई - वडिलांप्रमाणे जपतो, शिकवतो. सर्व विद्यार्थ्यांना गणवेश नाही मिळत तेंव्हा पदरमोड करणारेही अनेक शिक्षक आहेत.ग्रामीण भागातील ८० टक्के गावातील ८० टक्के लोकांनी स्वतःचे गाव सोडून शेत, शेतालगत घरे बांधली. जागेच्या अडचणी, पाण्याच्या अडचणी अनेक कारणे आहेत. मला स्वतःला लालवण गावात खोली मिळाली नाही. काही दिवस मी बाजूच्या गावाला राहिलो. तिथेही तीच अडचण! शेवटी ग्रामपंचायतीच्या खोलीत आम्ही शिक्षक राहिलो. भाड्याने देता येतील, अशी अधिकची घरे बांधण्याइतका ग्रामीण भागात पैसा नाही. मी जन्मापासून आजपर्यंत गावात राहतो. पंढरपुराला पायी गेले तरच विठ्ठल पावतो, अशीही धारणा आहे. परंतु गाडीचा, विमानाचा वापर करून जाणाराही भाविकच ना! शिक्षणाच्या या वारीत कुणी मुख्यालयी राहील, तर कुणी अप-डाऊन करत विठ्ठलाला (विद्यार्थ्याला) गुणवत्तापूर्ण शिक्षण देत राहील, एवढे नक्की! 

टॅग्स :Teacherशिक्षकEducationशिक्षण