शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सेतू अभियान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 10:10 IST

कोरोनाकाळात शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे सेवाआभावी शैक्षणिक नुकसान होऊ नये हा त्यामागील मूळ उद्देश असणार आहे.

- सीमा महांगडेमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये यासाठी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून शिक्षण सेतू अभियान राबविण्यात येणार आहे. कोरोनाकाळात शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे सेवाआभावी शैक्षणिक नुकसान होऊ नये हा त्यामागील मूळ उद्देश असणार आहे.अभियान उत्तमरीतीने पार पाडण्यासाठी सर्वप्रथम यासाठी आवश्यक माहिती प्रणाली निर्माण करण्यात येणार आहे. यामध्ये विविध स्तरावर काम करण्यासाठी कार्यकारी समिती, सनियंत्रण समिती, अंमलबजावणी आणि मानांकन समिती यांचा समावेश असणार आहे. या प्रत्येक समितीची रचना, कार्यपद्धती वेगवेगळी असणार असून, त्यांनी नेमून दिलेली कामांची योग्य अंमलबाजवणी करणे अपेक्षित असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होईपर्यंतच्या कालावधीसाठी हे अभियान राबविण्यात येणार असल्याने १५ जून ते १५ ऑगस्टपर्यंत हे अभियान सुरू राहील असा प्राथमिक अंदाज आहे; मात्र प्रकल्पनिहाय त्यात फेरबदल करण्याचा अधिकार कार्यकारी समितीला असणार आहे.

शिक्षण मित्र साधणार दुवाआदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याकरिता ठरावीक कालांतराने शिक्षण मित्रांमार्फत पालक संस्थेला ते पोहोचविण्यात येणार आहे. यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची मदत घेतली जाणार आहे. तसेच गावातील चावडी, ग्रामपंचायतीतील उपलब्ध जागा, शाळेतील उपलब्ध जागा येथे शासनाच्या कोविड नियमांचे पालन करीत विद्यार्थ्यांकडून स्वाध्याय पूर्ण करून घेण्याची जबाबदारी ही शिक्षण मित्रांची असणार आहे. गुगल क्लासरूम, व्हाॅट्सॲप, टेलिग्राम, प्रत्यक्ष भेट यातील एक पर्याय निवडून त्यांना हे स्वाध्याय पुन्हा नियंत्रण कक्षाकडे परत करण्याचेही काम हाती घ्यावे लागणार आहे. या अभियान आणि त्यातील शिक्षण मित्र साधणार असलेल्या दुव्यामुळे आदिवासी भागातील विद्यार्थीही शिक्षण प्रवाहात कायम राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणMaharashtraमहाराष्ट्र