शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोना रुग्णसंख्या वाढतेय, शाळा वेळेत सुरू होणार की नाही? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 16:05 IST

School in Maharashtra: राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आता कोरोनाचे अजून निर्बंध लागणार का? तसेच उन्हाळी सुट्टी संपल्यावर शाळा पुन्हा वेळेवर सुरू होणार का? असा प्रश्न पालकांच्या मनात निर्माण झाला आहे. दरम्यान, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठं विधान केलं आहे.

मुंबई - कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर सर्व निर्बंध हटल्याने गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला होता. मात्र या महिन्याच्या सुरुवातीपासून अचानक रुग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेसह सरकार अलर्ट झाले आहे. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी मास्कसक्ती नसली तरी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे आता कोरोनाचे अजून निर्बंध लागणार का? तसेच उन्हाळी सुट्टी संपल्यावर शाळा पुन्हा वेळेवर सुरू होणार का? असा प्रश्न पालकांच्या मनात निर्माण झाला आहे. दरम्यान, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांबाबतशिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी मोठं विधान केलं आहे.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे शाळा ह्या बहुतांशी ऑनलाईन सुरू ठेवण्यात आल्या होत्या. तसेच फारच कमी काळासाठी विद्यार्थी शाळेत आले होते. त्यामुळे आतातरी नव्या शैक्षणिक वर्षात शाळा वेळेत सुरू होऊन वर्षभर व्यवस्थित अभ्यासक्रम पूर्ण होईल का? असा प्रश्न पालकांना पडला आहे. दरम्यान, शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी शाळांबाबत एसओपी तयार करणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच काळजी घेऊन शाळा सुरू केल्या जातील. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नाही, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

याबाबत माहिती देताना वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, राज्यातील कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही आरोग्य विभागाचा सल्ला घेणार आहोत. याआधीही आम्ही शाळांबाबत एसओपी तयार केल्या होत्या, यावेळीही तशी पावले उचलली जातील. मात्र चर्चा करूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. तसेही शाळा सुरू करणे ही काळाची गरज आहे. कारण दोन वर्षांपासून मुलांचं मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान झालेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं अजून नुकसान होऊ नये म्हणून काळजी घेऊन शाळा सुरू करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सातत्याने रुग्ण वाढत असून, मागचे दोन तीन दिवस हा आकडा एक हजाराच्या वर गेला आहे. काल राज्यात १३०० हून अधिक कोरोना रुग्ण सापडले होते. त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

टॅग्स :Varsha Gaikwadवर्षा गायकवाडEducationशिक्षणSchoolशाळाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस