शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

Coronavirus: कोरोना रुग्णसंख्या वाढतेय, शाळा वेळेत सुरू होणार की नाही? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 16:05 IST

School in Maharashtra: राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आता कोरोनाचे अजून निर्बंध लागणार का? तसेच उन्हाळी सुट्टी संपल्यावर शाळा पुन्हा वेळेवर सुरू होणार का? असा प्रश्न पालकांच्या मनात निर्माण झाला आहे. दरम्यान, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठं विधान केलं आहे.

मुंबई - कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर सर्व निर्बंध हटल्याने गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला होता. मात्र या महिन्याच्या सुरुवातीपासून अचानक रुग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेसह सरकार अलर्ट झाले आहे. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी मास्कसक्ती नसली तरी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे आता कोरोनाचे अजून निर्बंध लागणार का? तसेच उन्हाळी सुट्टी संपल्यावर शाळा पुन्हा वेळेवर सुरू होणार का? असा प्रश्न पालकांच्या मनात निर्माण झाला आहे. दरम्यान, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांबाबतशिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी मोठं विधान केलं आहे.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे शाळा ह्या बहुतांशी ऑनलाईन सुरू ठेवण्यात आल्या होत्या. तसेच फारच कमी काळासाठी विद्यार्थी शाळेत आले होते. त्यामुळे आतातरी नव्या शैक्षणिक वर्षात शाळा वेळेत सुरू होऊन वर्षभर व्यवस्थित अभ्यासक्रम पूर्ण होईल का? असा प्रश्न पालकांना पडला आहे. दरम्यान, शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी शाळांबाबत एसओपी तयार करणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच काळजी घेऊन शाळा सुरू केल्या जातील. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नाही, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

याबाबत माहिती देताना वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, राज्यातील कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही आरोग्य विभागाचा सल्ला घेणार आहोत. याआधीही आम्ही शाळांबाबत एसओपी तयार केल्या होत्या, यावेळीही तशी पावले उचलली जातील. मात्र चर्चा करूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. तसेही शाळा सुरू करणे ही काळाची गरज आहे. कारण दोन वर्षांपासून मुलांचं मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान झालेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं अजून नुकसान होऊ नये म्हणून काळजी घेऊन शाळा सुरू करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सातत्याने रुग्ण वाढत असून, मागचे दोन तीन दिवस हा आकडा एक हजाराच्या वर गेला आहे. काल राज्यात १३०० हून अधिक कोरोना रुग्ण सापडले होते. त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

टॅग्स :Varsha Gaikwadवर्षा गायकवाडEducationशिक्षणSchoolशाळाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस