शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

Coronavirus: कोरोना रुग्णसंख्या वाढतेय, शाळा वेळेत सुरू होणार की नाही? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 16:05 IST

School in Maharashtra: राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आता कोरोनाचे अजून निर्बंध लागणार का? तसेच उन्हाळी सुट्टी संपल्यावर शाळा पुन्हा वेळेवर सुरू होणार का? असा प्रश्न पालकांच्या मनात निर्माण झाला आहे. दरम्यान, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठं विधान केलं आहे.

मुंबई - कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर सर्व निर्बंध हटल्याने गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला होता. मात्र या महिन्याच्या सुरुवातीपासून अचानक रुग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेसह सरकार अलर्ट झाले आहे. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी मास्कसक्ती नसली तरी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे आता कोरोनाचे अजून निर्बंध लागणार का? तसेच उन्हाळी सुट्टी संपल्यावर शाळा पुन्हा वेळेवर सुरू होणार का? असा प्रश्न पालकांच्या मनात निर्माण झाला आहे. दरम्यान, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांबाबतशिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी मोठं विधान केलं आहे.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे शाळा ह्या बहुतांशी ऑनलाईन सुरू ठेवण्यात आल्या होत्या. तसेच फारच कमी काळासाठी विद्यार्थी शाळेत आले होते. त्यामुळे आतातरी नव्या शैक्षणिक वर्षात शाळा वेळेत सुरू होऊन वर्षभर व्यवस्थित अभ्यासक्रम पूर्ण होईल का? असा प्रश्न पालकांना पडला आहे. दरम्यान, शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी शाळांबाबत एसओपी तयार करणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच काळजी घेऊन शाळा सुरू केल्या जातील. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नाही, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

याबाबत माहिती देताना वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, राज्यातील कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही आरोग्य विभागाचा सल्ला घेणार आहोत. याआधीही आम्ही शाळांबाबत एसओपी तयार केल्या होत्या, यावेळीही तशी पावले उचलली जातील. मात्र चर्चा करूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. तसेही शाळा सुरू करणे ही काळाची गरज आहे. कारण दोन वर्षांपासून मुलांचं मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान झालेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं अजून नुकसान होऊ नये म्हणून काळजी घेऊन शाळा सुरू करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सातत्याने रुग्ण वाढत असून, मागचे दोन तीन दिवस हा आकडा एक हजाराच्या वर गेला आहे. काल राज्यात १३०० हून अधिक कोरोना रुग्ण सापडले होते. त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

टॅग्स :Varsha Gaikwadवर्षा गायकवाडEducationशिक्षणSchoolशाळाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस