शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

पदवी प्रवेशाचा तिढा कायम, पारंपरिक अभ्यासक्रमांची सीईटी होणार की नाही, याबाबत संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 11:39 IST

Education:

मुंबई : राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला, मात्र पदवी प्रवेशाचा तिढा कायम आहे. यंदा बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे पदवी प्रवेशाची प्रक्रिया कशी राबवायची यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. पारंपरिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षांच्या प्रवेशासाठी सीईटी घ्यावी, असे मत अनेक प्राचार्य आणि शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर यासंदर्भात निकालानंतरच निर्णय घेण्यात येणार असून त्यासाठी राज्यातील तेराही विद्यापीठांच्या कुलगुरूंची समिती तयार करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली होती. मात्र अद्याप यावर काहीच निर्णय न झाल्याने आणि पदवी प्रवेशाबाबत स्पष्टता देण्यात न आल्याने विद्यार्थी, पालक संभ्रमात आहेत.

वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, आर्किटेक्ट, कृषी अशा अभ्यासक्रमांसाठी बारावी मंडळाच्या परीक्षेनंतर स्वतंत्र प्रवेश परीक्षा होत असतात, मात्र पारंपरिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बारावीच्या गुणांवर मेरिट लिस्ट जाहीर होते. पण यंदा मात्र या प्रवेश पद्धतीत बदल होण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्वच पारंपरिक विद्यापीठांमध्ये पदवीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्या स्तरावर नियोजन केले जाते आणि ती प्रक्रिया राबवली जाते. मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीत येणाऱ्या महाविद्यालयातही प्रवेशावेळी विद्यापीठामार्फत प्रवेशासाठी नोंदणी केली जाते. यानंतर प्रवेश मात्र महाविद्यालय स्तरावर घेतले जातात. मात्र उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून पदवी प्रवेशाबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने, सूचना नसल्याने विद्यापीठाकडून यंदा पदवीपूर्व प्रवेश नोंदणीचीही सुरुवात करण्यात आलेली नाही. काही विद्यापीठांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया असते. यामुळे अकरावीप्रमाणे प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठीही केंद्रीभूत प्रक्रियेचे नियोजन करावे असे मत अनेक प्राचार्य मांडत असल्याने पदवी प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया कशी राबवावी, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच प्रवेश परीक्षा पुरेशी नाही, कारण प्रत्येक शाखेच्या गरजा आणि अभ्यासक्रम वेगवेगळे आहेत. बीएमएस, बीएफएफ, बीएमएम अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा घेणे हा एक पर्याय असल्याचे मत अनेक तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. 

...तर प्रवेश प्रक्रियेत गोंधळ होण्याची शक्यता विद्यापीठ स्तरावर योग्य निर्णय घेतला गेला नाही तर प्रवेश प्रक्रियेत गोंधळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी प्रत्येक विद्यापीठाने एकसमान पातळीवर निकष निश्चित करणे आवश्यक आहे, असे मत प्राचार्य व्यक्त करीत आहेत. शिवाय बारावीच्या लेखी परीक्षेवर विसंबून न राहता त्यांची बौद्धिक क्षमता विचारात घेतली जावी असे मतही विद्यार्थी मांडत आहेत.  

टॅग्स :Educationशिक्षण