शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पदवी प्रवेशाचा तिढा कायम, पारंपरिक अभ्यासक्रमांची सीईटी होणार की नाही, याबाबत संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 11:39 IST

Education:

मुंबई : राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला, मात्र पदवी प्रवेशाचा तिढा कायम आहे. यंदा बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे पदवी प्रवेशाची प्रक्रिया कशी राबवायची यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. पारंपरिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षांच्या प्रवेशासाठी सीईटी घ्यावी, असे मत अनेक प्राचार्य आणि शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर यासंदर्भात निकालानंतरच निर्णय घेण्यात येणार असून त्यासाठी राज्यातील तेराही विद्यापीठांच्या कुलगुरूंची समिती तयार करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली होती. मात्र अद्याप यावर काहीच निर्णय न झाल्याने आणि पदवी प्रवेशाबाबत स्पष्टता देण्यात न आल्याने विद्यार्थी, पालक संभ्रमात आहेत.

वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, आर्किटेक्ट, कृषी अशा अभ्यासक्रमांसाठी बारावी मंडळाच्या परीक्षेनंतर स्वतंत्र प्रवेश परीक्षा होत असतात, मात्र पारंपरिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बारावीच्या गुणांवर मेरिट लिस्ट जाहीर होते. पण यंदा मात्र या प्रवेश पद्धतीत बदल होण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्वच पारंपरिक विद्यापीठांमध्ये पदवीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्या स्तरावर नियोजन केले जाते आणि ती प्रक्रिया राबवली जाते. मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीत येणाऱ्या महाविद्यालयातही प्रवेशावेळी विद्यापीठामार्फत प्रवेशासाठी नोंदणी केली जाते. यानंतर प्रवेश मात्र महाविद्यालय स्तरावर घेतले जातात. मात्र उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून पदवी प्रवेशाबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने, सूचना नसल्याने विद्यापीठाकडून यंदा पदवीपूर्व प्रवेश नोंदणीचीही सुरुवात करण्यात आलेली नाही. काही विद्यापीठांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया असते. यामुळे अकरावीप्रमाणे प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठीही केंद्रीभूत प्रक्रियेचे नियोजन करावे असे मत अनेक प्राचार्य मांडत असल्याने पदवी प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया कशी राबवावी, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच प्रवेश परीक्षा पुरेशी नाही, कारण प्रत्येक शाखेच्या गरजा आणि अभ्यासक्रम वेगवेगळे आहेत. बीएमएस, बीएफएफ, बीएमएम अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा घेणे हा एक पर्याय असल्याचे मत अनेक तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. 

...तर प्रवेश प्रक्रियेत गोंधळ होण्याची शक्यता विद्यापीठ स्तरावर योग्य निर्णय घेतला गेला नाही तर प्रवेश प्रक्रियेत गोंधळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी प्रत्येक विद्यापीठाने एकसमान पातळीवर निकष निश्चित करणे आवश्यक आहे, असे मत प्राचार्य व्यक्त करीत आहेत. शिवाय बारावीच्या लेखी परीक्षेवर विसंबून न राहता त्यांची बौद्धिक क्षमता विचारात घेतली जावी असे मतही विद्यार्थी मांडत आहेत.  

टॅग्स :Educationशिक्षण