शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

आयआयटी प्रवेशासाठी १२ वीमध्ये ७५ टक्के मार्क्सची आवश्यकता नाही; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 9:05 AM

१२ वी कक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांनाही आयआयटीत प्रवेश घेता येईल, त्यासाठी त्यांना टक्केवारीची कोणतीही अट घालण्यात आली नाही.

मुंबई – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलोजीने प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. सरकारने २०२०-२१ मध्ये आयआयटीच्या नियमांमधील या बदलांना मान्यता दिली आहे. त्यामुळे आता आयआयटी प्रवेशासाठी १२ वीमध्ये ७५ टक्के गुण असावेत ही अट काढून टाकण्यात आली आहे. फक्त उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनाही आयआयटीमध्ये प्रवेश घेता येणार आहे.

आआयटी प्रवेशातील नियमात बदल करण्याचा निर्णय संयुक्त प्रवेश बोर्ड, आयआयटीने घेतल्याची माहिती मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटरद्वारे दिली. कोरोनामुळे अनेक बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षा काही अंशी रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आयआयटीमध्ये जेईई अँडवान्स परीक्षा पास होण्याव्यतिरिक्त १२ वीत कमीत कमी ७५ टक्के गुण मिळणे गरजेचे होते किंवा पात्रता परीक्षेत २० टक्के निकष लावले जात होते. मात्र आता जेईई अँडवान्स २०२० परीक्षा पास झालेल्यांना प्रवेशासाठी सूट देण्यात आली आहे.

त्याचसोबत १२ वी कक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांनाही आयआयटीत प्रवेश घेता येईल, त्यासाठी त्यांना टक्केवारीची कोणतीही अट घालण्यात आली नाही. यापूर्वीच्या माहितीनुसार जेईई अँडवान्स परीक्षेतील अभ्यासक्रम कमी करणे आणि प्रवेश परीक्षा नियम बदलण्यावर चर्चा सुरु आहे. यावर्षी आयआयटी दिल्लीने जेईई अँडवान्स परीक्षेचे आयोजन केले होते.

सरकारच्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बोर्डाच्या परीक्षा रद्द झाल्याने अनेक हुशाक विद्यार्थी नाराज झाले होते. बोर्डाच्या परीक्षेत चांगली कामगिरी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली असते. कोरोनामुळे जेईई परीक्षा अद्याप घेतल्या नाहीत पण १ ते ६ सप्टेंबर दरम्यान या परीक्षा प्रस्तावित आहेत.

टॅग्स :IIT Mumbaiआयआयटी मुंबईEducationशिक्षणexamपरीक्षा