शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
4
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
5
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
6
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
7
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
8
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
9
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
10
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
11
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
12
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
13
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
14
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
15
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
16
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
17
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
18
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
19
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
20
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...

आयआयटी प्रवेशासाठी १२ वीमध्ये ७५ टक्के मार्क्सची आवश्यकता नाही; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 09:06 IST

१२ वी कक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांनाही आयआयटीत प्रवेश घेता येईल, त्यासाठी त्यांना टक्केवारीची कोणतीही अट घालण्यात आली नाही.

मुंबई – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलोजीने प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. सरकारने २०२०-२१ मध्ये आयआयटीच्या नियमांमधील या बदलांना मान्यता दिली आहे. त्यामुळे आता आयआयटी प्रवेशासाठी १२ वीमध्ये ७५ टक्के गुण असावेत ही अट काढून टाकण्यात आली आहे. फक्त उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनाही आयआयटीमध्ये प्रवेश घेता येणार आहे.

आआयटी प्रवेशातील नियमात बदल करण्याचा निर्णय संयुक्त प्रवेश बोर्ड, आयआयटीने घेतल्याची माहिती मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटरद्वारे दिली. कोरोनामुळे अनेक बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षा काही अंशी रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आयआयटीमध्ये जेईई अँडवान्स परीक्षा पास होण्याव्यतिरिक्त १२ वीत कमीत कमी ७५ टक्के गुण मिळणे गरजेचे होते किंवा पात्रता परीक्षेत २० टक्के निकष लावले जात होते. मात्र आता जेईई अँडवान्स २०२० परीक्षा पास झालेल्यांना प्रवेशासाठी सूट देण्यात आली आहे.

त्याचसोबत १२ वी कक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांनाही आयआयटीत प्रवेश घेता येईल, त्यासाठी त्यांना टक्केवारीची कोणतीही अट घालण्यात आली नाही. यापूर्वीच्या माहितीनुसार जेईई अँडवान्स परीक्षेतील अभ्यासक्रम कमी करणे आणि प्रवेश परीक्षा नियम बदलण्यावर चर्चा सुरु आहे. यावर्षी आयआयटी दिल्लीने जेईई अँडवान्स परीक्षेचे आयोजन केले होते.

सरकारच्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बोर्डाच्या परीक्षा रद्द झाल्याने अनेक हुशाक विद्यार्थी नाराज झाले होते. बोर्डाच्या परीक्षेत चांगली कामगिरी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली असते. कोरोनामुळे जेईई परीक्षा अद्याप घेतल्या नाहीत पण १ ते ६ सप्टेंबर दरम्यान या परीक्षा प्रस्तावित आहेत.

टॅग्स :IIT Mumbaiआयआयटी मुंबईEducationशिक्षणexamपरीक्षा