शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

विदेशी वैद्यकीय पदवी घेणाऱ्यांपैकी १५% विद्यार्थीच पास होतात ‘टेस्ट’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 2:30 AM

एफएमजीई टेस्ट पास झाल्याशिवाय या डॉक्टरांना भारतात वैद्यकीय व्यवसाय करता येत नाही

नवी दिल्ली : देशात प्रचंड स्पर्धा वाढल्यामुळे भारतीय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात विदेशात जाऊन एमबीबीएस करीत असले, तरी भारतात परत आल्यानंतर बंधनकारक असलेली फॉरेने मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन (एफएमजीई) नावाची टेस्ट त्यातील केवळ १५ टक्के विद्यार्थीच उत्तीर्ण होतात, अशी माहिती समोर आली आहे.

एफएमजीई टेस्ट पास झाल्याशिवाय या डॉक्टरांना भारतात वैद्यकीय व्यवसाय करता येत नाही. ही टेस्ट उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांत बांगलादेश, नेपाळ आणि मॉरिशसमधून एमबीबीएस झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. गंमत म्हणजे या तिन्ही देशांना विद्यार्थ्यांत फार कमी पसंती आहे.

एफएमजीई टेस्ट घेणाºया ‘नॅशनल बोर्ड आॅफ एक्झामिनेशन’ने केलेल्या विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे. २०१५ आणि २०१८ यादरम्यान विदेशात वैद्यकीय पदवी घेणाºया ६१,७०८ विद्यार्थ्यांचा अभ्यास बोर्डाने केला आहे. चीन, रशिया आणि युक्रेन येथून पदवी घेणारे सर्वांत कमी सरासरी १४.२ टक्के (८,७६४) विद्यार्थी एफएमजीई उत्तीर्ण होऊ शकले. विदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांपैकी ८७.६ टक्के (५४,०५५) विद्यार्थी चीन, रशिया, बांगलादेश, युक्रेन, नेपाळ, किर्गिस्तान आणि कझाकिस्तान या सात देशांतील महाविद्यालयांत प्रवेश घेतात. चीनमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ११.६७ टक्के (२०,३१४ पैकी २,३७०), रशियाचे १२.८९ टक्के आणि युक्रेनचे १५ टक्के आहे. प्राप्त माहितीनुसार, भारतीय विद्यार्थी सौदी अरेबिया, गयाना, केमन आयलँड्स, लिबिया आणि पाकिस्तान या देशांतही वैद्यकीय शिक्षणासाठी जातात.

टॅग्स :Medicalवैद्यकीय