शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

दहावी-बारावीची ३०० कॉपी प्रकरणे, कोकण विभागात नाही एकही गैरप्रकार

By सीमा महांगडे | Updated: April 13, 2022 08:19 IST

राज्य शिक्षण मंडळाच्या यंदाच्या दहावी-बारावीच्या परीक्षेत एकूण ३३४ गैरमार्ग प्रकरणे सापडली आहेत

सीमा महांगडे मुंबई :

राज्य शिक्षण मंडळाच्या यंदाच्या दहावी-बारावीच्या परीक्षेत एकूण ३३४ गैरमार्ग प्रकरणे सापडली आहेत. यामध्ये दहावीच्या ९९ तर बारावीच्या २३५ गैरमार्ग प्रकरणांचा समावेश असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. यात अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक १२० तर कोकण विभागात शून्य कॉपीची प्रकरणे आढळली.

राज्यात दहावीची परीक्षा ५,०५० मुख्य परीक्षा केंद्रांवर, तसेच १६,३३५ उपकेंद्रांवर घेण्यात आली. यंदा पहिल्यांदाच राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून होम सेंटरची सुविधा परीक्षेसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, बऱ्याच कालावधीनंतर प्रत्यक्ष परीक्षा देणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी सुविधेचा गैरफायदा घेतल्याने, गैरमार्ग प्रकरणांची संख्या वाढली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी संस्थेची मान्यता रद्द करण्याच्या इशाऱ्यानंतर कॉपी प्रकरणात थेट घसरणही दिसून आली. बारावीची सर्वाधिक कॉपी प्रकरणे ही अमरावती जिल्ह्यात सापडली असून, त्यांची संख्या १२० आहे. कोकण विभागात बारावीच्या परीक्षेदरम्यान एकही कॉपी प्रकरण आढळले नाही.  

दहावीच्या परीक्षेत एकूण ९९ गैरमार्ग प्रकरणे पकडली असून, सर्वाधिक गैरमार्ग प्रकरणे नागपूर (३१) व अमरावती (२५) विभागात आढळली, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. 

टॅग्स :ssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षा