शहरं
Join us  
Trending Stories
1
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
2
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
4
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
5
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
6
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
7
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
8
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
9
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
10
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
11
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
12
Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या
13
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
14
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
15
Stock Markets News: फार्मावर १००% टॅरिफ, सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार घसरला; निफ्टी २४,८०० च्या खाली, फार्मा शेअर्स आपटले
16
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
18
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...
19
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
20
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव

आपत्तीतून आलेले आपलेपण!

By किरण अग्रवाल | Updated: June 4, 2020 11:46 IST

संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला असतानाच आता ‘निसर्ग’नामक चक्रीवादळाचे संकट राज्याच्या किनारपट्टीवर येऊन आदळले आहे.

- किरण अग्रवालआपत्ती ही केवळ नुकसानदायीच असते असे नाही, तर ती बरेच काही शिकवून जाणारीही असते. कोणताही मनुष्य त्याच्या धाडस व बेडरपणाच्या कितीही गप्पा मारीत असला तरी आपत्ती काळातच त्यातील या गुणवैशिष्ट्यांची परीक्षा होते, कारण एरव्ही इतरांना हितोपदेश करणे वेगळे आणि स्वत:ला बिकट प्रसंगातून जावे लागते तेव्हा त्यातून येणारा अनुभव अगर जागणारे आत्मभान वेगळे असते. हे भान बऱ्याचदा तात्कालिकतेच्या सीमेवरच अडखळते. आपत्तीचे स्वरूप कसे व किती आहे, यावर ते अवलंबून असते. परंतु छोट्याशा प्रसंगातूनही मोठा धडा घेण्याचा सुज्ञपणा ज्यांच्या ठायी असतो, ते आपत्तीतून लवकर सावरतात, शिवाय अशांना आलेले भान प्रासंगिक न राहाता सर्वकालीन जाणिवेची प्रगल्भता गाठते तेव्हा अंतरीचे झरे आपसूकच झरझर प्रवाहीत होतात. स्नेहाचे, प्रेमाचे, आपलेपणाचे पदर त्यातूनच ओलावतात. माणुसकी धर्म वेगळा काय असतो? कोरोनाच्या संकटकाळात व त्यानंतरच्या निसर्ग चक्रीवादळामुळे हा धर्म जागवणारे भान प्रत्ययास येत आहे हेच समाधानाचे म्हणता यावे.संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला असतानाच आता ‘निसर्ग’नामक चक्रीवादळाचे संकट राज्याच्या किनारपट्टीवर येऊन आदळले आहे. सुमारे दोन-अडीच महिन्यांपासून कोरोनाशी लढाई सुरू आहे. थेट जिवाशी गाठ घालणारा हा विषाणू असल्याने शासन-प्रशासन तर काळजी घेत आहेच; परंतु व्यक्तिगत पातळीवरही सुज्ञ असलेले सारेच जण स्वत:सह कुटुंबीयांची काळजी घेताना दिसत आहेत. सध्या कोरोनामुळे बहुतेकांना सक्तीचे रिकामपण लाभले आहे. रिकामपणात माणूस अधिक सोशल किंवा सामाजिक व सार्वजनिकही होतो असे म्हटले जाते. त्यानुसार हाती असलेल्या मोबाइलच्या माध्यमातून सारेच जण एकमेकांच्या ख्याली-खुशालीची विचारपूस करीत खबरदारी घेण्याचे सल्ले देत आहेत. भलेही रिकामपणातला उद्योग याला म्हणता यावे; पण यानिमित्ताने का होईना इतरांबद्दलची आपुलकी जागल्याचा प्रत्यय येतो आहे, ते का कमी आहे? अगदी दिवाळी-दसºयाला शुभेच्छांची देवाण-घेवाण होत नाही त्यापेक्षा अधिक प्रमाणात ‘कोरोना’पासून बचावण्यासाठी संदेशाचे आदान-प्रदान होत आहे. दुस-याचे सुख हे द्वेषाचे-ईर्षेचे कारण भलेही ठरू शकते; परंतु दु:ख, संकटकालीन वेदना मात्र मनुष्याला जवळ आणतात, पाझर फोडतात; हेच खरे असल्याचे या निमित्ताने दृग्गोचर व्हावे.कोरोनाच्या सोबत आलेल्या चक्रीवादळाच्या भीतीनेही अनेकांच्या संवेदना जागविल्या. कोकणच्या किनारपट्टीवर हे वादळ धडकणार व तेथे नुकसान घडून येणार म्हटल्यावर त्या परिसरातील आप्तेष्ट, इष्ट-मित्रांचे मोबाइल नंबर्स शोधून शोधून व संपर्क करून त्यांना धीर दिला गेला. विस्मृतीत गेलेले अनेकांचे स्नेह-संबंध या आपत्तीच्या निमित्ताने पुन्हा नियमित व्हायला जणू संधी मिळून गेली. तेव्हा आपत्तीने घडून गेलेल्या किंवा येत असलेल्या नुकसानीचीच चर्चा करण्याऐवजी, हे जे काही परस्परांबद्दलचे ममत्त्व जागताना दिसत आहे; त्यातून नाते वा मित्रत्वाच्या संबंधाची वीण घट्ट होताना दिसत आहे ते अधिक महत्त्वाचे ठरावे. यानिमित्ताने या हृदयीचा त्या हृदयाशी होणारा संपर्क-सत्संग हा केवळ आपत्तीशी लढण्याचे बळ देणाराच नव्हे तर माणुसकी धर्माची पताका उंचावणाराही आहे. याच माणुसकी धर्माच्या जागरणासाठी आपले आयुष्य वेचून गेलेल्या सर्वच संत-महात्म्यांनी अश्रूंचेच मोल समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपत्तीमुळे धीर खचत असला तरी, सहवेदना व सहयोगाच्या बळावर कोणतीही लढाई सहज जिंकता येते असे साधे सूत्र यामागे आहे. आज कोरोना असो की चक्रीवादळ, या आपत्तीच्या निमित्तानेही हेच सूत्र प्रत्येकाला उभारी देणारे व यशस्वीतेचा आशावाद जागवणारे ठरले आहे.महत्त्वाचे म्हणजे, ही संकटे मनुष्याला आत्मवलोकनाची संधी देऊन जात आहेत. जात, धर्म, गरीब-श्रीमंत असा कुठलाही भेदाभेद न ठेवता संकटांनी सर्वांनाच ग्रासले आहे. सामान्य नागरिकांपासून बलाढ्य देशांच्या वरिष्ठाधिकाऱ्यांपर्यंत सा-यांना भीतीच्या छायेत आणून ठेवले आहे. जिवाची भीती ही केवळ स्वत:च्याच काळजीला नव्हे तर इतरांबद्दलच्या आपुलकीलाही प्रवृत्त करीत असते. शेवटी जाताना काय सोबत येणार, असाच विचार या भीतीतून डोकावल्याखेरीज राहात नाही. असे जेव्हा होते तेव्हा रागा-लोभाच्या भिंती ढासळून पडतात. शिक्षणातही न आलेले शहाणपण अशावेळी अध्यात्माच्या मार्गाने येते. दगडात देव दिसू लागतातच, परक्यातही आपलेपणा दिसू लागतो. निर्वैरत्व व निर्माेहीत्व जे काही असते, ते या स्थितीत प्रसवते. काम, क्रोध, मद, मोह-मत्सर या षड्रिपूंपासून सुटकेचीच ही अवस्था असते. एरव्हीच्या सामान्यपणे जगण्यात हे टाळता येणारे नसते. मात्र संकट जेव्हा घोंगावते तेव्हा सारे गळून पडते. प्रश्न इतकाच की, संकटात वा दु:खातच हे शहाणपण का सुचते? अर्थात संत कबिरांनीही तेच तर म्हटलेय, ‘दु:ख में सुमरिन सब करे, सुख में करे न कोय। जो सुख में सुमरिन करे, दु:ख काहे को होय!!  

टॅग्स :NashikनाशिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस