शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

तरुणाईला सावरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 1:42 PM

तरुणाईला सांभाळण्याचे, सावरण्याचे आणि दिशा देण्याचे काम प्राधान्याने करावे लागणार आहे

मिलिंद कुलकर्णीभारत हा सर्वाधिक तरुण देश आहे, असे आपण अभिमानाने म्हणतो. ते खरे आणि वास्तव आहे. परंतु, या तरुणाईला सांभाळण्याचे, सावरण्याचे आणि दिशा देण्याचे काम प्राधान्याने करावे लागणार आहे. अन्यथा ही तरुणाई वाहवत गेली तर मोठा अनर्थ ओढवेल. याची भयघंटा वाजू लागली आहे. पूर्वी महानगरांपुरती सीमित असलेली ही चिंता आता जळगावसारख्या छोट्या शहरांना भेडसावू लागली आहे, हे मू.जे.महाविद्यालयात तरुणांच्या क्षुल्लक वादात मुकेश सपकाळे या तरुणाच्या झालेल्या खुनावरुन स्पष्ट झाले आहे.एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या या तरुणाईला दिशा देण्याचे काम करणार कोण हाच मोठा प्रश्न आहे. एकमेकांवर दोषारोप करण्यापेक्षा सगळ्या घटकांनी समन्वयाने व पुढाकाराने मार्ग काढायला हवा. या घटनेनंतर ज्या दोन-तीन प्रमुख बाबी समोर आल्या त्याचा विचार सुरुवातीला करुया. महाविद्यालयाच्या परिसरातील ही गुंडगिरी आहे. गुंडांच्या टोळ्यांमधील वर्चस्ववादाची किनार त्याला दिसत आहे. पीडित आणि आरोपी हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. शिक्षण जेमतेम बारावी, आयटीआय पर्यंत झालेले आहे. छोट्या स्वरुपातील नोकऱ्या काही जण करतात. हे चित्र पाहता सामान्य स्थितीतील हे तरुण गुन्हेगारी मार्गाकडे भरकटलेले दिसतात. एकावर केवळ पूर्वी गुन्हे दाखल आहेत. इतरांची तशी पार्श्वभूमी नाही. चित्रपटातील गुन्हेगारी विश्वाच्या प्रभावामुळे आकर्षित होऊन काही या मार्गाकडे वळले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थिक स्थिती जेमतेम असल्याने आणि रोजगार नसल्याने तरुण मुले या मार्गाकडे सहजतेने आकर्षित होतात. जिद्दी, धाडसी, जीवावर उदार होणाºया तरुणांना हेरण्याचे काम काही टोळ्या करीत असतात, त्यांच्या हाती असे तरुण हमखास सापडतात. शिक्षण जेमतेम असल्याने नोकऱ्यांची संधी कमी आहे. गुन्हेगारी विश्वातून विनासायास भरपूर पैसा मिळत असताना कष्टाची चाकरी करायला अपरिपक्व विचाराची ही तरुण मुले तयार होत नाही.आहे रे आणि नाही रे या घटकांमधील अंतर्विरोध हादेखील एक मुद्दा आहे. तुलना करताना आपल्याला या गोष्टी का मिळत नाही, समोरच्याला का मिळाल्या हा प्रश्न तरुणाईला पडतो. सारासार विचार करण्याची शक्ती आणि बुध्दी नसल्याने मग टोळीत सामील होऊन हिसकावण्याची प्रवृत्ती बळावते. याचे परिणाम आणि पडसाद काय उमटतील, याचा विचार देखील ही मुले करीत नाही. आपल्या कुटुंबाचे काय होईल, ही काळजी त्यांना शिवत नाही. कुटुंबांवर निस्सीम प्रेम करणारी ही तरुणाई कुटुंबाला सगळे सुख देण्यासाठी अशा मार्गाकडे वळल्याचे समर्थन करीत असतात. ‘वाल्या ते वाल्मिकी’ असा प्रवास करण्यासाठी कुणी मार्गदर्शक भेटला तर शक्य आहे, अन्यथा घसरण अटळ आहे.राजकीय मंडळी या तरुणाईचा करुन घेत असलेला वापर हा अधिक घातक आहे. आपल्या पदाचा, सत्तेचा वापर करुन किरकोळ स्वरुपाचे गुन्हे केलेल्या या तरुणांना वाचविण्याचे, सोडविण्याचे कार्य लोकप्रतिनिधी करीत असतात. पण अशा कृत्यांमधून आपण गुन्हेगारीला प्रोत्साहन, बळ देत आहोत, याकडे ते कानाडोळा करतात. त्यांचे इप्सित वेगळे असते. राजकारण, निवडणुका यासाठी या तरुणाईचा वापर करुन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अशा राजकीय पाठिंब्याच्या बळावर ही तरुणाई बेदरकार व बेधडकपणे गुन्हे करायला मोकळी होते. प्रशासनाचे हात बांधले जातात. भस्मासूर तयार झाल्यावर मग राजकीय मंडळींसह समाजाचे डोळे उघडतात. एकमेकांकडे बोटे दाखवून जबाबदारी ढकलली जाते. पण खरेच अशी जबाबदारी ढकलणे योग्य आहे काय? तरुणाईला वेळीच योग्य मार्गावर आणणे समाजातील सर्वच जबाबदार घटकांची सामूहिक जबाबदारी आहे. निव्वळ प्रशासन किंवा समाजावर ढकलून काही साध्य होणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे.

टॅग्स :Jalgaonजळगाव