विकासाचे तरुण आश्वासन
By Admin | Updated: October 29, 2014 01:25 IST2014-10-29T01:25:05+5:302014-10-29T01:25:05+5:30
देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर भाजपाने केलेली निवड हे देशात पहिल्या क्रमांकावर असलेल्या या राज्याला मिळालेले विकासाचे तरुण आश्वासन आहे.
विकासाचे तरुण आश्वासन
देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर भाजपाने केलेली निवड हे देशात पहिल्या क्रमांकावर असलेल्या या राज्याला मिळालेले विकासाचे तरुण आश्वासन आहे. अतिशय स्वच्छ चारित्र्याचा, उमद्या मनाचा व निर्वैर वृत्तीचा हा नेता वयाच्या 44व्या वर्षी राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान होत असेल तर ते राज्याच्या गतिशील वाटचालीचे व त्यांच्या स्वत:च्या उज्जवल भवितव्याचे सुचिन्ह ठरणार आहे. नागपूर या राज्याच्या उपराजधानीचे महापौरपद ओळीने दोन वेळा भूषवून फडणवीसांनी राज्याच्या विधिमंडळात प्रवेश केला. महापौरपदाची त्यांची कारकीर्द जेवढी आश्वासक व यशस्वी झाली तेवढेच त्यांचे आमदारपदही आरंभापासून गाजत व गजर्त राहिले. एक अतिशय अभ्यासू व लोकांच्या प्रश्नांविषयीची तळमळ असणारा पारदर्शक लोकप्रतिनिधी अशी ख्याती त्यांनी अल्पावधीतच संपादित केली. विरोधी बाकावर बसून सरकारच्या कारभारावर दक्ष नजर ठेवणा:या या तरुणाच्या तोंडून त्याच्या सत्तारूढ विरोधकांविषयी कधी अपशब्द निघाला नाही, की त्याने उच्चरलेला शब्द त्याला कधी मागे घ्यावा लागला नाही. विधायक टीका कशी करावी, सरकारला धारेवर कसे धरावे आणि आपला दर्जा कायम राखून सरकारची लक्तरे वेशीवर कशी टांगावी याचा आदर्शच त्या काळात त्यांनी घडविला. फडणवीसांना वक्तृत्वाची देण आहे. आपले म्हणणो मोजक्या पण परिणामकारक शब्दांत मांडून सभागृहाएवढेच सा:या राज्याचे लक्ष आपल्याकडे व आपण मांडत असलेल्या प्रश्नांकडे वेधून घेण्याची हातोटी त्यांना साधली आहे. असे वक्तृत्व आत्मविश्वासातून येते व तो आत्मविश्वास अध्ययनातून येतो. देवेंद्र फडणवीसांनी राज्याच्या अंदाजपत्रकांवर केलेली भाषणो याचसाठी सगळ्या होतकरू लोकसेवकांनी अभ्यासावी अशी आहेत. लक्ष्यावर नजर ठेवून व तपशीलावर पकड राखून सरकारच्या आर्थिक धोरणातील त्रुटी व कार्यक्रमातील उणिवा सभागृहाच्या व्यासपीठावर उघड करता येणो ही लोकप्रतिनिधीची कसोटी पाहणारी बाब आहे. देवेंद्र फडणवीस या कसोटीला पूर्णपणो यशस्वी होऊन उतरले आहेत. त्यांची अंदाजपत्रकावरची दरवर्षीची भाषणो एकाहून एक सरस होत गेली. नंतरच्या काळात त्यांनी केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकावर जनतेसमोर अभ्यासपूर्ण भाषणो करण्याचा उपक्रम हाती घेतला. अंदाजपत्रक ही सामान्य माणसांच्या समजापलीकडची बाब फडणवीसांनी त्यांना विद्याथ्र्याना सांगावी तशी समजावून दिली. आपल्या अध्ययनाकडे एवढय़ा काळजीने पाहणा:या या जागरूक लोकप्रतिनिधीने आपल्या मतदारसंघाकडे कधी दुर्लक्ष केले नाही, आपल्या मतदारांना आपली वाट पाहायला लावली नाही, की घरी भेटीला येणा:या तक्रारकत्र्याना समाधानावाचून परतू दिले नाही. देवेंद्र फडणवीस हा लोकसंग्रहातून पुढे आलेला अभ्यासू नेता आहे. राजकारणात सा:याच गोष्टी कोणाच्या मनासारख्या होत नाहीत. हर्ष व विषादाचे क्षण त्यात फार येतात. मात्र या सा:या काळात या तरुणाच्या चेह:यावरचे प्रसन्नपण कधी मावळलेले वा म्लान झालेले दिसले नाही. फडणवीसांच्या काही भूमिका ठाम आहेत. रा.स्व.संघ हा त्यांच्या निष्ठेचा विषय आहे. त्यांचे वडील व राज्य विधान परिषदेचे माजी सदस्य कै. गंगाधरराव फडणवीस हा त्यांच्या श्रद्धेचा व आदर्शाचा भाग आहे. पक्षनिष्ठा, नेतृत्वाविषयीची श्रद्धा आणि लोककार्याविषयीची तळमळ हा त्यांच्या स्वभावाचा विशेष आहे. भारतीय जनता पक्षाने छोटय़ा राज्यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय फार पूर्वी घेतला. देवेंद्र फडणवीस तेव्हापासूनच लहान राज्यांचे व त्यातही विदर्भ राज्याचे पुरस्कर्ते बनले. ऐन निवडणुकीच्या काळातही ते त्या मागणीशी जुळून राहिले. या हिशेबाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर येणारे दादासाहेब कन्नमवारांच्या नंतरचे ते दुसरे विदर्भवादी मुख्यमंत्री ठरतील. अर्थातच आपली व्यापक जबाबदारी ते त्यांच्यातील सर्वसमावेशक वृत्तीच्या व माणसे जोडण्याच्या स्वभावाच्या बळावर नीट पार पाडतील. आपल्या आमदारकीच्या काळात फडणवीसांनी सा:या महाराष्ट्रात आपल्या मित्रंचे व चाहत्यांचे एक मोठे जाळे निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांची दृष्टी सा:या प्रदेशांना न्याय देणारी व समतोल राहील याविषयी कोणी शंका बाळगण्याचे कारण नाही. काही काळापासून राज्याचे सरकार दुभंगल्यागत व थांबल्यागत झाले होते. नव्या नेतृत्वात त्याची चाके पुन्हा पूर्ववत चालू लागतील व हे राज्य अतिशय वेगाने पुढे जाईल अशी उमेद आपण बाळगूया. देवेंद्र फडणवीसांचे नव्या जबाबदारीसाठी मन:पूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या कामातील यशासाठी त्यांना अंत:करणपूर्वक शुभेच्छा !