शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

लेख: श्रीमंतांना 'खाऊ', की भुकेल्यांना घास? काही ताळमेळ असायला नको का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 10:20 IST

8th pay commission in marathi: आठव्या वेतन आयोगाचा फायदा ४ लाखांहून अधिक पगार असलेल्यांना मिळावा; की दरमहा १०,००० पेक्षा कमी पगार मिळवणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना?

-योगेंद्र यादव (राष्ट्रीय संयोजक, भारत जोड़ो अभियान सदस्य, स्वराज इंडिया)नुकतीच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाची घोषणा झाली; पण सरकारचे सावत्र कर्मचारी, असंघटित क्षेत्रातील कर्मचारी आणि देशभरातील शेतकरी-कामकरी मात्र स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटली तरीही अजून आपल्या पहिल्याच वेतन आयोगाकडे डोळे लावून बसलेले आहेत. त्यांच्यासाठी 'किमान उत्पन्न आयोग' सुद्धा आजवर आलेला नाही.

भारताच्या १४२ कोटी लोकसंख्येपैकी ६० कोटी लोक कमावते आहेत. त्यातील ३० लाख म्हणजे जेमतेम अर्धा टक्का केंद्र सरकारचे नियमित नोकर आहेत. त्यामध्ये आपण या आयोगाचा लाभ मिळू शकेल अशा सेना, सरकारी उपक्रम आणि सर्व राज्य सरकारांच्या कर्मचाऱ्यांची संख्या मिळवली तरी ती सुमारे दीड कोटी भरेल. 

सरकारी कर्मचारी सोडून नियमित वेतन घेणारे सुमारे १२ कोटी कर्मचारी देशात आहेत. त्यांना या आयोगाचा काहीच लाभ मिळणार नाही. थोडक्यात काय, देशातील साठ कोटी कमावत्या लोकांपैकी ५८ कोटी लोकांचे या आयोगाशी काहीच देणे-घेणे नाही.

गतवर्षीच्या अंदाजपत्रकानुसार केंद्र सरकार प्रत्येक कर्मचाऱ्यावर वेतन व अन्य सुविधा मिळून, दरमहा सरासरी ७६ हजार रुपये खर्च करते. केंद्र सरकारच्या नियमित नोकरीत असणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याचे किमान वेतन दरमहा सुमारे ३२ हजार रुपये इतके आहे, तर सर्वात वरच्या अधिकाऱ्याला दरमहा सुमारे पावणेपाच लाख रुपये वेतन मिळते. 

आठवा आयोग लागू झाला तर किमान वेतन वाढून ते दरमहा ४५ हजार इतके होईल. तर सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याला दरमहा सव्वासहा लाख रुपये मिळतील असा अंदाज आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील सरकारचा वार्षिक खर्च सुमारे १ लाख कोटी रुपयांनी वाढेल. राज्य सरकारांनीही हा आयोग लागू केला तर तो हिशेब वेगळा.

तुलनेने देशातील अन्य कमावत्या लोकांची परिस्थिती काय आहे? सावत्र कर्मचारी म्हणजे सरकारसाठी नियमित काम करणारे; पण पगार मात्र वेतन आयोगानुसार न मिळणारे कर्मचारी. यात आशा आणि अंगणवाडी कर्मचारीही येतात. 

बाल-शिक्षण, आरोग्य यासह सर्व सरकारी कामे त्यांच्या जोरावरच पार पाडली जात असतात; पण सरकार त्यांना आपले नोकर न म्हणता स्वयंसेवक म्हणते. नियमित वेतनाऐवजी केवळ मानधन हातावर टेकवते. आजमितीस भारत सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्याला दरमहा केवळ ४५०० रुपये देते. तर त्याच्या किंवा तिच्या सहायकाला फक्त २२५० रुपये मिळतात. 

'आशा' कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार दरमहा केवळ २००० रुपये देते. त्यात प्रोत्साहनपर रक्कम आणि राज्य सरकारकडून मिळणारी रक्कम मिळवली तरी या सेविकांच्या पदरात दरमहा १० हजार रुपयेसुद्धा पडत नाहीत.

शाळेतील माध्यान्ह भोजन बनवणारे आचारी आठवड्यातील सहा दिवस चार ते सहा तास काम करतात; पण सरकार त्यांना दरमहा केवळ १००० रुपये देते. त्यात राज्य सरकारचे मानधन मिळवले तरी दरमहा सुमारे ३००० रुपयेच त्यांच्या हातात पडतात. नियमित कर्मचाऱ्यांना ज्या कामासाठी ६० हजार रुपये मिळतात त्याच कामासाठी कंत्राटी कर्मचाऱ्याच्या हातावर १० हजारच टेकवले जातात.

केंद्र आणि राज्य सरकारच्या या सावत्र कर्मचाऱ्यांची एकूण संख्या एक कोटीहून अधिक आहे. नव्या वेतन आयोगाचा फायदा देताना अग्रक्रम कुणाला द्यायला हवा? चार लाखांहून अधिक मासिक पगार असलेल्या अधिकाऱ्यांना की दरमहा १०००० पेक्षा कमी पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना? आपल्या नियमित कर्मचाऱ्याचे वेतन वाढवण्यासाठी सरकारला जेवढा खर्च येईल तेवढ्या रकमेत आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकार किमान १५००० रुपये मासिक वेतन देऊ शकेल.

आता दरमहा वेतन ज्यांना मिळतच नाही त्या बिगर कर्मचाऱ्यांची अवस्था काय आहे? अकुशल कामगाराला ५२६ रुपये, तर कुशल कामगाराला ९१२ रुपये इतके किमान दैनिक वेतन भारत सरकारने घोषित केलेले आहे; पण सरकार स्वतःच आपल्या आशा, अंगणवाडी आणि माध्यान्ह भोजन कर्मचाऱ्यांना इतके वेतन देत नाही. सरकार स्वतःच्या कर्मचाऱ्याला देत असलेले वेतन आणि तेच सरकार इतरांसाठी निश्चित करत असलेले किमान वेतन याचा आठव्या वेतन आयोगात काही ताळमेळ असायला नको का?

आता उरला शेतकरी. त्याचे मासिक उत्पन्न सरासरी ७ हजार इतके असते. १४ कोटी शेतकऱ्यांची किमान आधारभूत किमतीची मागणी मान्य करून आजच्या दराने त्याची अंमलबजावणी केली तर सरकारला त्यासाठी २६ हजार कोटी रुपये इतका खर्च येईल. 

याउलट केंद्र सरकारच्या ३० लाख कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्यासाठी सुमारे १ लाख कोटी रुपये अधिक खर्चावे लागतील. कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क मिळू नये असा याचा अर्थ मुळीच नाही; पण त्यांच्यापूर्वी किंवा त्यांच्याबरोबर इतर सगळ्या कष्टकऱ्यांनाही त्यांचा किमान हक्क मिळाला पाहिजे, एवढेच!yyopinion@gmail.com

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारEmployeeकर्मचारीYogendra Yadavयोगेंद्र यादवNarendra Modiनरेंद्र मोदी