शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
2
भाजपाने केली मोठी खेळी, ठाकरेंचे बहुसंख्य उमेदवार ठरले असते बाद; पण ऐनवेळी डाव उलटला अन्...
3
गोव्याला विसरून जाल! भारतातील पाच जबरदस्त बीच, एक आहे कोकणातील, तुमची सुट्टी दुप्पट आनंददायी होईल
4
ना निष्ठा, ना विचारधारा ८ दिवसांत ३ पक्ष बदलले; कुख्यात गुंडाला ठाण्यात कुणी दिली उमेदवारी?
5
ठाण्यात शिंदेसेनेने जागा वाटपामध्ये भाजपचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’; 'त्या' नऊ जागा बांधल्या भाजपच्या गळ्यात 
6
पदाचा गैरवापर केल्याचा ठाकरे गटाचा आरोप; राहुल नार्वेकर उत्तर देत म्हणाले, “संजय राऊत...”
7
किडनी रॅकेटचे केंद्र तामिळनाडूत; ८० लाखांपर्यंत सौदा, शेकडो लोकांच्या किडनी काढून करोडो जमवले; दोन नामांकित डॉक्टरांची नावे पुढे
8
"तर आम्ही कुठल्याही थराला जाऊ"; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या असीम मुनीरचा इशारा
9
मनसेच्या मुंबईतील उमेदवारांना राज ठाकरेंचा मोलाचा सल्ला, म्हणाले, ‘तुम्हाला ऑफर येतील, पण…’
10
'ऑपरेशन सिंदूर सुरूच...' लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानला करून दिली आठवण
11
"जितकी मिरची ठाकरे गटाला...", नितेश राणेंचा उद्धवसेनेवर हल्ला, 'उत्तर भारतीय महौपार' मुद्द्यावर काय बोलले?
12
Gold Silver Price Today: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चेक करा १८ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
13
टॅरिफमुळे US ची किती कमाई? "टीका करणारे मुर्ख" असं म्हणणारे ट्रम्प प्रत्येकाला $२००० देण्याचं वचन पूर्ण करणार का?
14
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
15
बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले...
16
२०२६ मध्ये या ५ राज्यात रंगणार सत्तेचा सारीपाट, बाजी कोण मारणार, NDA की ‘INDIA’?
17
ट्रम्प यांच्या निर्णयाचे पडसाद! 'या' दोन देशांनी अमेरिकन नागरिकांच्या प्रवेशावर घातली बंदी
18
जळगावात भाजपाला धक्का, माजी महापौरांचा अर्ज बाद; AB फॉर्ममधील त्रुटीचा उद्धवसेनेलाही फटका
19
Healthy Diet: अन्न तेच पण पद्धत वेगळी! जपानी लोक लठ्ठ का होत नाहीत? त्यामागे आहेत ५ सिक्रेट 
20
कोकण गाजवल्यावर शिंदेचा फायर ब्रँड नेता मुंबईत; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दिली मोठी जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

यशवंत सिन्हा भाजपाबाहेर पडण्याच्या मानसिकतेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:39 IST

नेतृत्वाविरोधात भाजपा खासदारांनी बंड पुकारावे असे आवाहन सिन्हा यांनी केले आहे.

-हरीश गुप्ता(लोकमत समूहाचे नॅशनल एडिटर)वरिष्ठ भाजपा नेते यशवंत सिन्हा हे भाजपा बाहेर पडण्याच्या मानसिकतेत आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. भाजपाच्या नेतृत्वाने जनतेला दिलेल्या अभिवचनांचे पालन केले नाही म्हणून नेतृत्वाविरोधात भाजपा खासदारांनी बंड पुकारावे असे आवाहन सिन्हा यांनी केले आहे. त्यावरून ते पक्ष सोडण्याच्या मन:स्थितीत आहेत असे वाटू लागले आहे. येत्या शनिवारी यशवंत सिन्हा पाटण्यात जाणार असून तेथेच ते काही महत्त्वाची घोषणा करून आपल्या भविष्याची दिशादेखील स्पष्ट करतील असा अंदाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काम करण्याच्या पद्धतीविषयी यशवंत सिन्हा नाराज आहेत आणि त्यांनी सरकारच्या अनेक मुद्यांच्या विरोधात आवाजही उठविला आहे. पण अडवाणी युगातील या नेत्याकडे मोदींनी तसेच पक्षनेतृत्वाने आजवर दुर्लक्षच केले आहे. यशवंत सिन्हा यांच्या जम्मू-काश्मीर प्रश्नावरील पुढाकारासह त्यांनी उपस्थित केलेल्या काही प्रश्नांविषयी पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. पण पक्षाने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे टाळले. कारण यशवंत सिन्हा यांचा मुलगा जयंत सिन्हा हा केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह एका व्यासपीठावर उपस्थित राहून यशवंत सिन्हा यांनी पक्षनेतृत्वाला डिवचले आहे. अलीकडच्या काळात त्यांच्या संयमाचा बांध तुटल्याने ते पक्षत्याग करण्याच्या मन:स्थितीत आले आहेत. त्यामुळे त्यांच्या पाटणाभेटीकडे पक्ष नेतृत्वाचे लक्ष लागले आहे. कारण तेथेच ते आपल्या भविष्यातील वाटचालीसंबंधी घोषणा करण्याची शक्यता आहे. उपोषण करणाऱ्या आप पक्षाच्या नेत्या स्वाती मालीवाल यांच्या भेटीस भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा गेल्यामुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या या हालचालींची गंभीर दखल घेतली आहे. पण शत्रुघ्न सिन्हा हे यशवंत सिन्हा यांच्या मोर्चात सामील होतील का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.भाजपाच्या दलित नेत्यात असंतोषभाजपाच्या बहरीच येथील खासदार सावित्रीबाई फुले यांनी जदयूचे नेते शरद यादव यांची भेट घेतल्याने भाजपा नेतृत्वाने आकांडतांडव केले आहे. आपलेच सरकार आरक्षण संपविण्याच्या मानसिकतेत असल्याच्या संशयावरून श्रीमती फुले यांनी निषेध मोर्चा आयोजित केला होता. त्यानंतर त्यांनी शरद यादव यांची भेट घेतली. २ एप्रिल रोजी दलितांनी भारत बंदचे आयोजन केले होते. त्याचा परिणाम भाजपामधील दलित नेत्यांवर झालेला पहावयास मिळाला. दलितांचे विषय भाजपा ज्या पद्धतीने हाताळीत आहे, त्याविषयी पक्षातील दलितात नाराजी आहे. त्यामुळे भाजपाचे चार खासदार शरद यादव यांच्या संपर्कात असल्याचे कळते. भाजपाचे एक दलित खासदार उदित राज यांनी याबाबतीत आवाज उठविला असून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न खुद्द पंतप्रधानांनी केला. इतकेच नव्हे तर दिल्लीतील आंबेडकर स्मारकाच्या उद्घाटनासाठी मेट्रो रेलने जाताना त्यांनी उदित राज यांनाही सोबत घेतले. केद्रीय मंत्री आणि लोजपचे नेते रामविलास पासवान यांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने रिव्ह्यू पिटीशन दाखल करण्यास दिरंगाई केल्याचा आरोप केल्यामुळे केंद्र सरकारची कुचंबणा झाली आहे. आता सरकारने रिव्ह्यूसाठी अर्ज केला असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला शह देण्यासाठी वटहुकूम काढण्याचे केंद्राने मान्य केले असले तरी सरकारविषयी अविश्वास बळावल्याचे दिसून येत आहे.सपा-बसपाचा काँग्रेसला ‘दे धक्का!’नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीतील यशाने विरोधकात तसेच काँग्रेस पक्षातही उत्साहाचे वातावरण आहे. पण उत्तर प्रदेशात तरी काँग्रेससाठी स्थिती चांगली नाही. उत्तर प्रदेशात निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने स.पा., ब.स.पा. यांच्यात समझोता झाला आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांची मैत्री सर्वश्रुत आहे. पण काँग्रेसने फुलपूर आणि गोरखपूर मतदारसंघात आपले हात भाजून घेतले आहेत अशी टीका अखिलेश यादव यांनी अनेक मुलाखतीतून केली आहे. अखिलेश यांना वरिष्ठ काँग्रेस नेते भेटले तेव्हा काँग्रेसची मते सपा-बसपा नेत्यांकडे वळत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते आणि काँग्रेसने लोकसभेच्या निवडणुका स्वबळावर लढाव्यात असेही सुचविले होते. काँग्रेसविषयी सद्भावना व्यक्त करण्यासाठी अमेठी आणि रायबरेली येथे सपा-बसपा यांचे उमेदवार देणार नाही हे त्यांनी मान्य केले. काँग्रेसला खूष करण्यासाठी मायावतींना दुखवणे आम्हाला जमणार नाही हेही अखिलेश यादवनी स्पष्ट केले. मायावती काँग्रेसवर नाराज असल्याने कर्नाटकात त्यांनी देवेगौडा यांच्या पक्षाशी हातमिळवणी केली आहे, असेही अखिलेश यांनी स्पष्ट केले. सपा-बसपा युती ही काँग्रेससाठी ४ ते ५ लोकसभा जागा सोडण्यास तयार आहे असे सूत्रांकडून समजते. अजितसिंग यांच्या आर.एल.डी.साठी दोन जागा सोडण्याची त्यांची तयारी आहे.मिस्त्रींनी टाटा ग्रुप सोडण्यासाठी सौदेबाजीमिस्त्री यांच्या मालकीच्या शापुरजी पॅलनजी ग्रुपने टाटा ग्रुप आॅफ कंपनीतील स्वत:ची १८ टक्के भागीदारी सोडून ग्रुपमधून बाहेर पडण्यासाठी टाटांनी मिस्त्रींना एक लाख कोटी रुपये देऊ केले आहेत. मिस्त्रीच्या समभागांचे बाजारमूल्य एक लाख कोटी रुपयापेक्षा कमी आहे. सायरस मिस्त्रींना टाटा ग्रुप आॅफ कंपनीजच्या चेअरमन पदावरून हटविल्यापासून दोन्ही गट एन.सी.एल.टी. मध्ये लढाई लढत आहेत. टाटा ग्रुप आॅफ कंपनीजमधून मिस्त्री यांनी बाहेर पडावे यासाठी कोर्टाबाहेर तडजोड करण्याचा टाटांचा असा प्रयत्न आहे.मध्य प्रदेशात काँग्रेस नेत्यात सुंदोपसुंदीमध्य प्रदेशातील काँग्रेसची अवस्था चांगली नाही. काँग्रेस पक्षाच्या मध्य प्रदेशातील १५ वर्षाच्या वनवासानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना खाली खेचण्याची आशा काँग्रेस पक्ष बाळगीत आहे. त्यादृष्टीने काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशचे दिग्विजयसिंग, कमलनाथ, ज्योतिरादित्य शिंदे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राहुल सिंग यांची बैठक आयोजित केली होती. मध्य प्रदेश काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा असे राहुल गांधींना वाटत होते. पण ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावाला दिग्विजयसिंग यांनी विरोध केला. कमलनाथ यांनी मात्र शिंदे यांचे समर्थन केले. राहुल सिंग यांनीही त्यांच्या नावास विरोध केला आहे. सर्व राज्यात तरुणांना स्थान देण्याची राहुल गांधींची इच्छा असून त्यांनी राजस्थानमध्ये सचिन पायलट यांची निवड केली आहे.

 

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाBJPभाजपा