शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

भरोणीया बार, हाती भरमार ।  नेम तो चुकार, कैसा होई उद्धार ।।

By सुधीर महाजन | Updated: August 17, 2019 10:56 IST

घोडेबाजार बंदची घोषणा खुद्द उमेदवारांनीच करणे म्हणजे दानशूर कर्णाने ऐनवेळी कवच-कुंडले नाकारण्यासारखेच.

- सुधीर महाजन

अंबादास दानवे आणि बाबूराव कुलकर्णी या दोन उमेदवारांनी विधान परिषद निवडणुकीत ‘घोडे बाजार बंद’ची घोषणा केल्याने अनेकांची पंचाईत झाल्याचे दिसले. ‘हेचि फळ काय मम् तपाला,’ असा करुणार्त गलका उच्चरवात कानावर आला. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांसाठी हाच तर कपिलाषष्ठीचा योग असतो. कार्यकाळात घाऊक बाजार एवढाच भरतो. एरवी चिल्लर खुळखुळत फिरावे लागते; पण घोडेबाजार बंदची घोषणा खुद्द उमेदवारांनीच करणे म्हणजे दानशूर कर्णाने ऐनवेळी कवच-कुंडले नाकारण्यासारखेच. त्यामुळे पोटात गोळा येणे, जिवाची घबराट होणे, रक्तचाप वाढणे नैसर्गिकच समजले पाहिजे, अशा मानसिक अस्वस्थतेच्या वातावरणात शिवसेनेचे रांगडे उमेदवार अंबादासरावांनी थेट नाशिक मोहीम हाती घेऊन आपल्या नेक-नामदार ७१ मावळ्यांना तेथे हॉटेलात कुलूपबंद केल्याची माहिती हाती आली आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. हॉटेलच्या दारावरच ‘हाऊस फुल्ल’ची पाटीही लटकवली.

शिवसेनेच्या तंबूत एवढी घबराट का उडाली? खरेतर शिवसेना आणि भाजप यांचे संख्याबळ पाहता दानवेंना निवडून येण्यासाठी कोणाच्याही मदतीची गरज नाही; पण युतीधर्माचे पालन झाले तरच. परिस्थिती तशी नाही. मावळेसुद्धा अखेरपर्यंत साथ देतील का, अशी शंकेची फट असल्याने अंबादास दानवेंनी दोर कापून टाकले आणि मावळ्यांना नाशिक प्रांती पाठविले. कारण भवानी तलवारीसारखे मजबूत, कणखर असणारे इमान आता पाण्यासारखे प्रवाही झाले आहे. सत्ता-संपत्तीच्या घसरगुंडीवर ते सहज घसरताना पावलोपावली दिसते, म्हणूनच ही शिबंदी नाशिकात बंदोबस्तात ठेवली अन् शिवबंधनाचा तोडगा बांधला. या गोंधळात भाजपचे मतदार आपल्याला कोणी सहल घडवते का, याचा अंदाज घेत आहेत.

भाजपने काँग्रेसच्या तंबूचे कळस कापल्यापासून तिकडे सामसूम आहे. अब्दुल सत्तार नावाचे सरदार आपल्या साथीदारांसह बाहेर पडले. आता त्यांची चाकरी कोणाच्या दरबारी रुजू होणार याची उत्सुकताही संपली. मनोमनी त्यांनी भाजपचे मंगळसूत्र बांधण्याचा निर्णय घेतला; पण तिकडून होकारही नाही अन् नकारही नाही, अशी स्थिती असल्याने त्यांची अवस्था अवघडल्यासारखी आहे. ‘महाजनादेश यात्रेत’ ते भाजपवासी होऊन श्रीरामाचा जयघोष करतील, असे वातावरण होते; पण प. महाराष्ट्रात आलेल्या महापुरात हे वातावरण वाहून गेले; पण आता ही यात्रा पुन्हा निघणार असल्याने त्यांना यात्रेत सामील करून घेतले जाईल का, यावर तर्कवितर्क चालू आहेत. घोडेबाजार बंदच्या परस्पर तहानंतर बाबूराव कुठे दिसले नाहीत आणि सत्तार आपल्या सैन्यासह दानवेंच्या मागे उभे राहिल्याचे चित्र उभे करण्यात आले. खरे-खोटे आई भवानीलाच माहीत.

( भवानीदास आणि अंबादास दंग; ऐनवेळी रंगाचा केला भंग )

एका चर्चेने मात्र जोर धरला. अंबादास दानवे निवडून आले, तर औरंगाबाद शिवसेनेत मराठ्यांचे वर्चस्व वाढणार. पराभवामुळे चंद्रकांत खैरे अगोदरच बॅकफूटवर गेले आहेत. दानवे हे भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षातील मराठा नेत्यांना अडचणीचे ठरू शकतात आणि औरंगाबाद व जालना या दोन्ही जिल्ह्यातील त्याचा मराठा राजकारणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या दोन्ही पक्षातील मराठा नेते सावध पावले उचलताना दिसतात. त्यांच्यादृष्टीने आजवर वळचणीला पडलेले कुलकर्णी हे निरुपद्रवी आहेत आणि निवडून आले तरीही निरुपयोगी आहेत. आपल्या जहागिरी शाबूत ठेवण्यासाठी कुळकर्ण्यांवर उपकार करणे हितकारी ठरू शकते. राजकारणाचे असे वेगवेगळे प्रवाह व समीकरणे सध्या मांडली जात आहेत. प्रत्येक जण आपल्या आकलनशक्तीद्वारे अर्थ लावण्यात मश्गूल असताना उरलेल्या नगरसेवकांना वेगवेगळे डोहाळे लागले आहेत.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदElectionनिवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसAurangabadऔरंगाबाद