शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

भरोणीया बार, हाती भरमार ।  नेम तो चुकार, कैसा होई उद्धार ।।

By सुधीर महाजन | Updated: August 17, 2019 10:56 IST

घोडेबाजार बंदची घोषणा खुद्द उमेदवारांनीच करणे म्हणजे दानशूर कर्णाने ऐनवेळी कवच-कुंडले नाकारण्यासारखेच.

- सुधीर महाजन

अंबादास दानवे आणि बाबूराव कुलकर्णी या दोन उमेदवारांनी विधान परिषद निवडणुकीत ‘घोडे बाजार बंद’ची घोषणा केल्याने अनेकांची पंचाईत झाल्याचे दिसले. ‘हेचि फळ काय मम् तपाला,’ असा करुणार्त गलका उच्चरवात कानावर आला. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांसाठी हाच तर कपिलाषष्ठीचा योग असतो. कार्यकाळात घाऊक बाजार एवढाच भरतो. एरवी चिल्लर खुळखुळत फिरावे लागते; पण घोडेबाजार बंदची घोषणा खुद्द उमेदवारांनीच करणे म्हणजे दानशूर कर्णाने ऐनवेळी कवच-कुंडले नाकारण्यासारखेच. त्यामुळे पोटात गोळा येणे, जिवाची घबराट होणे, रक्तचाप वाढणे नैसर्गिकच समजले पाहिजे, अशा मानसिक अस्वस्थतेच्या वातावरणात शिवसेनेचे रांगडे उमेदवार अंबादासरावांनी थेट नाशिक मोहीम हाती घेऊन आपल्या नेक-नामदार ७१ मावळ्यांना तेथे हॉटेलात कुलूपबंद केल्याची माहिती हाती आली आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. हॉटेलच्या दारावरच ‘हाऊस फुल्ल’ची पाटीही लटकवली.

शिवसेनेच्या तंबूत एवढी घबराट का उडाली? खरेतर शिवसेना आणि भाजप यांचे संख्याबळ पाहता दानवेंना निवडून येण्यासाठी कोणाच्याही मदतीची गरज नाही; पण युतीधर्माचे पालन झाले तरच. परिस्थिती तशी नाही. मावळेसुद्धा अखेरपर्यंत साथ देतील का, अशी शंकेची फट असल्याने अंबादास दानवेंनी दोर कापून टाकले आणि मावळ्यांना नाशिक प्रांती पाठविले. कारण भवानी तलवारीसारखे मजबूत, कणखर असणारे इमान आता पाण्यासारखे प्रवाही झाले आहे. सत्ता-संपत्तीच्या घसरगुंडीवर ते सहज घसरताना पावलोपावली दिसते, म्हणूनच ही शिबंदी नाशिकात बंदोबस्तात ठेवली अन् शिवबंधनाचा तोडगा बांधला. या गोंधळात भाजपचे मतदार आपल्याला कोणी सहल घडवते का, याचा अंदाज घेत आहेत.

भाजपने काँग्रेसच्या तंबूचे कळस कापल्यापासून तिकडे सामसूम आहे. अब्दुल सत्तार नावाचे सरदार आपल्या साथीदारांसह बाहेर पडले. आता त्यांची चाकरी कोणाच्या दरबारी रुजू होणार याची उत्सुकताही संपली. मनोमनी त्यांनी भाजपचे मंगळसूत्र बांधण्याचा निर्णय घेतला; पण तिकडून होकारही नाही अन् नकारही नाही, अशी स्थिती असल्याने त्यांची अवस्था अवघडल्यासारखी आहे. ‘महाजनादेश यात्रेत’ ते भाजपवासी होऊन श्रीरामाचा जयघोष करतील, असे वातावरण होते; पण प. महाराष्ट्रात आलेल्या महापुरात हे वातावरण वाहून गेले; पण आता ही यात्रा पुन्हा निघणार असल्याने त्यांना यात्रेत सामील करून घेतले जाईल का, यावर तर्कवितर्क चालू आहेत. घोडेबाजार बंदच्या परस्पर तहानंतर बाबूराव कुठे दिसले नाहीत आणि सत्तार आपल्या सैन्यासह दानवेंच्या मागे उभे राहिल्याचे चित्र उभे करण्यात आले. खरे-खोटे आई भवानीलाच माहीत.

( भवानीदास आणि अंबादास दंग; ऐनवेळी रंगाचा केला भंग )

एका चर्चेने मात्र जोर धरला. अंबादास दानवे निवडून आले, तर औरंगाबाद शिवसेनेत मराठ्यांचे वर्चस्व वाढणार. पराभवामुळे चंद्रकांत खैरे अगोदरच बॅकफूटवर गेले आहेत. दानवे हे भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षातील मराठा नेत्यांना अडचणीचे ठरू शकतात आणि औरंगाबाद व जालना या दोन्ही जिल्ह्यातील त्याचा मराठा राजकारणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या दोन्ही पक्षातील मराठा नेते सावध पावले उचलताना दिसतात. त्यांच्यादृष्टीने आजवर वळचणीला पडलेले कुलकर्णी हे निरुपद्रवी आहेत आणि निवडून आले तरीही निरुपयोगी आहेत. आपल्या जहागिरी शाबूत ठेवण्यासाठी कुळकर्ण्यांवर उपकार करणे हितकारी ठरू शकते. राजकारणाचे असे वेगवेगळे प्रवाह व समीकरणे सध्या मांडली जात आहेत. प्रत्येक जण आपल्या आकलनशक्तीद्वारे अर्थ लावण्यात मश्गूल असताना उरलेल्या नगरसेवकांना वेगवेगळे डोहाळे लागले आहेत.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदElectionनिवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसAurangabadऔरंगाबाद