शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
3
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
4
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
5
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
6
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
7
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
8
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
9
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
10
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
11
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
12
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
13
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
14
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
15
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
16
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
17
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
18
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
19
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
20
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम

Atal Bihari Vajpayee : कार्यकर्ता खाली पेट नही सोया...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 08:36 IST

अटलबिहारी वाजपेयी हे या काळाचे अखेरचे शिलेदार. त्यांच्या निधनानंतर जळगावशी आलेला त्यांच्या आलेल्या संबंधांना उजाळा मिळाला.

मिलिंद कुलकर्णीराजकारणात सर्वमान्य नेता असण्याचा काळ कधीच संपला आहे. अटलबिहारी वाजपेयी हे या काळाचे अखेरचे शिलेदार होते.

त्यांच्या निधनानंतर जळगावशी आलेला त्यांच्या आलेल्या संबंधांना उजाळा मिळाला. आणीबाणीनंतर जनसंघ हा जनता पक्षात विलीन झाला. मोरारजी देसाई यांचे सरकार कोसळल्यानंतर जनसंघाचा भारतीय जनता पार्टी हा नवीन अवतार उदयाला आला. त्याच्या प्रचारार्थ १९८२-८३ मध्ये अटलजी जळगावला आले होते. सकाळी ८ वाजता जी.एस.ग्राऊंड या मध्यवर्ती मैदानावर सभा ठेवली होती. एवढ्या सकाळी सभेला लोक येतील काय? भाजपा नवखा पक्ष, कार्यकर्ते मोजके, कशी होणार सभा या चिंतेत पदाधिकारी असताना केवळ अटलजींच्या नावाने सभेला संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक आले होते. अटलजींच्या वक्तृत्वाची आणि सर्वमान्य नेतृत्वाची पावती जळगावकरांनी सकाळच्या सभेला गर्दी करुन दिली होती.

या सभेतील अटलजींनी सांगितलेला किस्सा पुन्हा एकदा आठवला गेला. गजानन जोशी या पदाधिकाऱ्याकडे अटलजी आदल्या रात्री जेवायला होते. अटलजी आणि पाच-दहा कार्यकर्त्यांच्या भोजनाची व्यवस्था जोशी यांच्याकडे केली होती. पण अटलजींचे वलय असे की, त्यांना भेटायला रात्रीही कार्यकर्त्यांची रिघ लागली. स्वाभाविकपणे जेवायचा आग्रह त्यांनाही झाला. अटलजींच्या तीक्ष्ण नजरेतून हा प्रसंग सुटला नाही. दुसºया दिवशी सभेत हा किस्सा ऐकवताना ते म्हणाले, गजाननजी के घर कार्यकर्ताओ की संख्या बढती गयी, उधर रसोई घरमे दाल मे पानी बढता गया. आखरी मे दाल मे दाल ढुंढनी पड रही थी...लेकीन हर एक कार्यकर्ताने पेटभर खाना खाया..खाली पेट कोईभी नही सोया...हे सांगायला ते विसरले नाही.

नव्याने स्थापन झालेला पक्ष, कार्यकर्त्यांची मोठी फळी नाही, तरीही जाहीर सभेला झालेली गर्दी हा अटलजींच्या प्रतिमेचा चमत्कार होता, यावर राजकीय तज्ज्ञांचे एकमत होते.

अटलजींशी जळगावचे ऋणानुबंध वेगवेगळ्या प्रसंगांमधून दृढ होत गेले. केशवस्मृती प्रतिष्ठानने अटलजींचे गीत ‘उनकी याद करे’ यावर एक सुंदर व्हीडिओ बनविला. २००२ मध्ये बनविलेल्या या व्हीडिओचे दिग्दर्शन प्रियदर्शन, गायक हरिहरन आणि संगीत दिग्दर्शन नौशाद यांचे होते. दिल्लीत अटलजींच्या उपस्थितीत त्याचे विमोचन करण्यात आले आणि विशेष म्हणजे ही कविता त्यांनी स्वहस्ताक्षरात लिहून दिली. १६ वर्षांपूर्वी जळगावातील सामाजिक कार्य करणाºया संस्थेला स्वत:ची कविता देणे आणि त्यावर व्हीडिओ बनविण्याची परवानगी देणाºया अटलजींचे मोठेपण आणि गुणी माणसांची असलेली पारख हे गुण अधोरेखित होतात.

असेच ऋणानुबंध जुळले ते भारतीय जैन संघटना, खान्देश भूकंप सहाय्यता निधी ट्रस्ट, शांतीलाल मुथा आणि सुरेशदादा जैन या संस्था आणि व्यक्तींनी गुजराथमधील भूज येथे भूकंपग्रस्त भागात शाळांचे पुनर्निमाण कार्य केले. २४ जून २००१ रोजी अटलजी त्या शाळांच्या लोकार्पणासाठी भूज येथे आले होते. या कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले. जळगावातील पत्रकारांचा चमू हे काम पाहायला गेला होता. अटलजी हे पंतप्रधान होते, कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत हा कार्यक्रम झाला. केशूभाई पटेल हे मुख्यमंत्री होते. त्यांचा मतदारसंघ याच भागात होता. पण भूकंपग्रस्त भागात राज्य सरकारने चार महिन्यात फारशी कामे केली नसल्याने नागरिकांमध्ये केशूभाई आणि सरकारविषयी तीव्र नाराजी होती. चार महिन्यात केशूभाई फिरकलेदेखील नव्हते. अटलजींसोबत ते प्रथमच आले. लोकांनी अटलजी आल्याने राग विसरुन कार्यक्रमात सहभाग घेतला. अटलजींनी शाळांचे लोकार्पण करताना ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले, त्यांचा सत्कार केला. सत्कार करताना त्यांचा परिचय करुन घेतला, संवाद साधला. परदु:ख आपले मानण्याचा स्वभाव आणि मदतकार्य करणाºयांविषयी असलेली कृतज्ञ भावना या प्रसंगातून प्रतीत होते.

अटलजींच्यासारख्या कर्तृत्ववान, प्रतिभावान नेत्याला संघर्ष अटळ ठरला. लोकसभा निवडणुकीतला पराभव असो की, संसदेत त्यांचे सरकार बहुमताअभावी कोसळणे असो, हा संघर्ष अटलजींनी अनुभवला. परंतु या नितळ मनाच्या नेत्याचा पराभव साºया देशवासीयांचे डोळे भिजवून गेला. वनवासातला राम, कंसमामाच्या जाच सहन करणारा कृष्ण आम्हाला अटलजींमध्ये दिसला. जनसामान्यांच्या भावनांशी तादात्म्य पावणारा असा नेता पुन्हा होणे नाही.

 

 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBJPभाजपाIndiaभारतprime ministerपंतप्रधान