शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

भूकंप झालाच तर आपले घर वाचेल का?

By विजय दर्डा | Updated: February 13, 2023 06:04 IST

तुर्कस्तानातील अनेक बहुमजली इमारती भूकंपरोधक नव्हत्या, होत्याचे नव्हते झाले. आपल्या देशात असे काही घडलेच, तर किती हाहाकार माजेल?

विजय दर्डा

तुर्कस्तानमध्ये ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे विनाशकारी रूप समोर आले. या संकटाने भूकंपाचा सामना करण्याची कोणाची किती तयारी आहे याचा विचार करणे सगळ्या जगाला भाग पाडले आहे. भारताचा जवळपास ५९ टक्के प्रदेश भूकंपप्रवण मानला जातो; म्हणून भारतासाठी तर हा आणखीनच गंभीर प्रश्न ठरतो. तुर्कस्तानच्या लोकसंख्येची घनता प्रतिचौरस किलोमीटरमागे केवळ ११० लोक इतकी आहे.  भारतामध्ये हीच घनता प्रतिचौरस किलोमीटरमागे ४३० लोक इतकी आहे, आता करा गणित! जिथे  प्रति चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात २५ हजारापेक्षा जास्त लोक राहतात, त्या मुंबईची तर गोष्ट सोडूनच द्या. या शहरात जर आठ रिश्टर किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप झाला तर काय होईल?

महाराष्ट्रातीललातूर, गुजरातमधील भूज आणि जबलपूरच्या भूकंपाची भयानकता मी पाहिली आहे. मी, माझे बंधू राजेंद्र आणि ‘लोकमत’च्या संपूर्ण टीमने तिथे शक्य ती सर्व मदतही केली होती. भूकंपाच्या दृष्टीने जो भाग संवेदनशील मानला जातो तेथेच भूकंप होईल, यावर विश्वास ठेवता येत नाही. गेल्या १५ वर्षांत देशाने किमान १० मोठे भूकंप अंगावर घेतले. त्यात हजारो लोकांचा बळी गेला. हिमालयाच्या संपूर्ण प्रदेशात आठ रिश्टर किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप होऊ शकतो, असे वैज्ञानिक मानतात. त्याची झलक दिसलीही आहे. १८९७ मध्ये शिलाँगमध्ये ८.७ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. १९०५ साली कांगडात ८ रिश्टर, १९३४ साली बिहारमध्ये ८.३ तर १९५० मध्ये आसामात ८.६ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झालेला आहे. देशाच्या दुसऱ्या भागातही भूकंपाने घडवलेला विध्वंस आपण पाहिलेला आहे. १९९३ मध्ये लातूरमध्ये झालेला भूकंप वैज्ञानिकांसाठीही अनपेक्षित होता. २० हजारपेक्षा जास्त लोक या भूकंपात बळी पडले. २००१ मध्ये गुजरातच्या भूज प्रदेशात ७.७ रिश्टर तीव्रतेचा, तर २००५ साली काश्मीरमध्ये ७.६ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. त्यानंतरही गुजरात, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये सातत्याने भूकंपाचे झटके बसत आले.

दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता किंवा दुसऱ्या एखाद्या मोठ्या शहरात भूकंप झाला तर काय परिस्थिती निर्माण होईल?  या शहरांमधील लोकसंख्येची घनता धोकादायक मानावी इतकी जास्त आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार बहुमजली इमारतींना पर्याय नाही हेही खरे; परंतु, त्यातल्या किती भूकंपरोधक आहेत? जपानसारख्या देशाने प्रत्येक घर भूकंपरोधक असणे सक्तीचे केले आहे. त्याचा फायदाही मिळतो. २०११ साली ९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आल्याने त्सुनामी निर्माण झाली; ती वगळता सामान्यत: जपानमध्ये कमीतकमी मनुष्यहानी होते.  युरोप, अमेरिका आणि दुबईमधील गगनचुंबी इमारतींमध्येही या तंत्रज्ञानाचा उपयोग केला गेला आहे. भीषण स्वरूपाचा भूकंप झाला तरी इमारत हलेल; पण पडणार नाही. आपल्या देशातल्या इमारती  सातपेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप झाला तर अत्यंत धोकादायक ठरू शकतात, असे इशारे नॅशनल सेंटर फॉर सेस्मॉलॉजीच्या अधिकाऱ्यांनी वारंवार दिले आहेत. भूकंपरोधक घरांच्या निर्मितीसाठी कोणताही कडक नियम आपल्याकडे अस्तित्वात नाही. उलट  घरबांधणी चालू असताना छत कोसळते, तर कुठे पूल कोसळतो; पण ठेकेदाराच्या केसालाही धक्का लागत नाही. ज्या देशात अवैधरित्या बहुमजली इमारती उभ्या राहतात तेथे भूकंपरोधक घरांची कल्पना तरी करता येऊ शकेल का? भूकंपरोधक घर बांधण्यासाठी १० ते १५ टक्के जास्त खर्च येतो.  घर स्वस्तात बांधायचे आणि जास्तीचा नफा कमवायचा, या धांदलीत हा जास्तीचा खर्च कोण करील?

भूकंपाचे झटके अडवणे  माणसाच्या हाती नाही; परंतु, त्याच्या गंभीर परिणामांचा सामना करण्याची व्यवस्था करता येऊ शकते. संपूर्ण देशात इमारत बांधणी संहितेचे पालन काटेकोरपणे केले गेले पाहिजे. किमान शहरात तरी भूकंपरोधक घरे उभी राहतील, हे पाहिले पाहिजे. भूकंपापासून बचावासाठी लोकांना प्रशिक्षित करणे हीसुद्धा एक मोठी गरज आहे. सुदैवाने आपल्याकडे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल आहे.  तरुण स्वयंसेवक  या दलाशी जोडले जातील, शालेय शिक्षणक्रमात भूकंप आणि अन्य नैसर्गिक आपत्तींशी सामना करण्याचे धडे दिले जातील, अशी व्यवस्था करता येऊ शकते. संकटकाळात त्याचा उपयोग होऊ शकेल, शिवाय आपली वैद्यकीय व्यवस्था सुसज्ज ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आपण ठरवले तर काहीही अशक्य  नाही. 

समुद्री वादळांच्या भयावहतेला सामोरे जाण्यासाठी ओडिशाने जी तयारी केली, त्याबद्दल मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा उल्लेख मी जरूर करीन. नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशाने अशी तयारी ठेवणे गरजेचे आहे. निसर्गाशी खेळ करूनही चालणार नाही. आपण काळजी घेतली नाही तर हडप्पा आणि मोहेंजोदारोप्रमाणे इतिहासात गाडले जाऊ. उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे हाहा:कार माजला तेव्हा संसदीय समितीने आपत्ती व्यवस्थापनाच्या शास्त्रज्ञांना बोलावले होते. त्या संसदीय समितीत मी होतो. आम्ही दिलेले  इशारे सरकारने मानले नाहीत, असे वैज्ञानिकांचे म्हणणे होते. असे होता कामा नये. प्रत्येक इशाऱ्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.आणि शेवटी...  

तुर्कस्तानमध्ये भूकंप झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सूचनांनुसार भारताने तत्काळ मदतीचा हात पुढे केला ही गोष्ट स्पृहणीय आहे. नेपाळमध्येही भारताने अशीच मदत केली होती. ही भारताची संस्कृती आहे... आणि मानवतेचीही तीच हाक आहे.

(लेखक लोकमत समूह आणि एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आहेत) 

टॅग्स :EarthquakeभूकंपlaturलातूरMaharashtraमहाराष्ट्र