शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय - धान्य नव्हे, पैसे खाणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 05:58 IST

महाराष्ट्र विधानसभेचे पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ सदस्य केशवराव धोंडगे सभागृहात म्हणाले होते, “लाेकांना धान्य मिळत नाही, मिळाले तर ते शिजत नाही आणि शिजले तरी पचत नाही; अशी आपल्या वितरण व्यवस्थेची अवस्था आहे!’

माणसाची भूक भागविण्याचे आव्हान एकविसाव्या शतकातदेखील कायम आहे. मानवी कल्याणाच्या प्रयत्नांचा साखळीतील हे सर्वांत ठळक अपयश. धान्याचे उत्पादन पुरेसे वाढले असले तरी ते खरेदी करून खाण्याएवढी आर्थिक परिस्थिती लाखो, करोडो लोकांची नाही. संपत्तीची निर्मिती आणि  सर्वांना मिळणाऱ्या वाट्यातील हा असमतोल! कोणी उपाशी राहू नये, असे म्हणतात, तसे होताना मात्र दिसत नाही. भारत हा त्यापैकी एक देश! सर्वाधिक लोकसंख्या ही  मोठी समस्या असली तरी भारताने अन्नधान्य उत्पादनात मोठी मजल मारली. तरीही उपलब्ध धान्य खरेदी करण्याची क्रयशक्ती मात्र सर्वांच्याकडे नाही. परिणाम?- सुमारे पन्नास टक्क्यांहून अधिक लोकांना अर्धपोटी राहावे लागते. यावर उपाय म्हणून केंद्र आणि विविध राज्य सरकारे स्वस्त धान्य वितरणाच्या योजना अनेक वर्षे राबवित आहेत. वितरणातील गलनाथपणा, गैरव्यवहार आणि गैरव्यवस्थानपामुळे गरजू लोकांपर्यंत धान्य पोहोचत नाही.

महाराष्ट्र विधानसभेचे पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ सदस्य केशवराव धोंडगे सभागृहात म्हणाले होते, “लाेकांना धान्य मिळत नाही, मिळाले तर ते शिजत नाही आणि शिजले तरी पचत नाही; अशी आपल्या वितरण व्यवस्थेची अवस्था आहे!’ आपल्या देशात सुमारे ५ लाख ३३ हजार रेशन  दुकाने आहेत. केंद्र सरकार आपल्या अनुदानातून धान्य खरेदी करून स्वस्तात राज्य सरकारला देते. राज्य सरकार ते स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत गावोगावी गरजूंना वाटते. कोरोनाचा संसर्ग सुरू झाला तेव्हा देशभरातील सुमारे ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य देण्यात येत होते. यावर्षी देखील (२०२३ मध्ये) ८१ कोटी ३५ लाख लोकांना मोफत धान्य देण्याची योजना केंद्र सरकारने जाहीर केली आहे. लोकांना मोफत धान्य देण्याविषयी दोन मतप्रवाह आहेत. लोकांना मोफत धान्य दिल्याने त्यांची उत्पन्न कमविण्याची उमेद मारली जाते.  कमविलेल्या उत्पन्नातून धान्य खरेदी करावे आणि आपली भूक भागवावी, असे मानणारा वर्गही तयार झाला आहे. मात्र, सर्वांना पुरेसे उत्पन्न मिळेल, असा रोजगार मिळत नाही.  गरिबी आणि अशिक्षितपणामुळे पुरेशी कौशल्ये नसतात, त्यांना काम  असूनही मिळत नाही. शारीरिक कष्टाचे काम करणाऱ्यांना पुरेसे वेतन देण्याची मानसिकता नसल्याने या गटाचे उत्पन्न वाढत नाही. विविध कारणांनी अन्नधान्याच्या किमती मात्र वाढत राहतात.  वितरण व्यवस्थेत गैरव्यवहारदेखील मोठ्या प्रमाणात आहेत. यावर उपाय म्हणून प्रतिमहिना एका कुटुंबाला पस्तीस किलो मोफत धान्य देण्याऐवजी थेट त्यांच्या खात्यावर पैसेच जमा करण्याची योजना केंद्र सरकार तसेच अनेक राज्य सरकारांकडून मांडली जाते. महाराष्ट्रातही संपूर्ण मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील चौदा जिल्ह्यांत अशी योजना राबविण्याचा विचार सरकार करीत आहे. तसा प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळासमोर मांडला जाणार आहे. वास्तविक मोफत धान्याला पर्याय म्हणून थेट पैसे देणे आणि गरजू लोकांनी बाजारातून धान्य खरेदी करावे, अशी अपेक्षा करणे निरर्थक ठरणार आहे. पैसा मिळालाच तर कुटुंबात निर्णय घेणारा पुरुष तो पैसा धान्य खरेदीवरच खर्च करेल, याची खात्री देता येत नाही. असा अनुभव जगभर आलेला आहे.

दारिद्र्य रेषेखालच्या गरीब कुटुंबांच्या प्राथमिकता विचारवंत, अभ्यासक आणि धोरणकर्ते मानतात / गृहित  धरतात, त्यापेक्षा अनेकदा भिन्न असतात असा निष्कर्ष नोबेल  विजेते अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांनीही मांडला आहे. हा अनुभव आपल्या समाजात तर सर्रास येतो.  वितरण व्यवस्थेत  गैरव्यवहाराचे प्रकार घडतात हे मान्य, पण म्हणून ती व्यवस्थाच बरखास्त करून धान्याऐवजी पैसे देण्याने माणसाची भूक शमविण्याचा मूळ हेतू तडीस जाणार नाही. तामिळनाडूसारख्या राज्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून धान्यपुरवठा व्यवस्थित होईल आणि ते गरजू माणसालाच मिळेल, याचा यशस्वी प्रयोग केला आहे, तसा प्रयत्न महाराष्ट्रानेही केला पाहिजे. मोफत किंवा सवलतीच्या दरातील धान्य ही चैन नाही. गरिबाला जगण्याचा आधार देण्याचा तो प्रयत्न आहे. मध्यंतरी देशात रेशन दुकानदारांनी संप केला होता. मोफत धान्य वाटपाचे कमिशन त्यांना अनेक वर्षे नियमित मिळत नाही. शिवाय त्यात वाढ करावी अशी मागणी होती. अशा योजनांच्या मूळ उद्देशाकडे जाण्यासाठी जाणीव जागृती करावी लागेल. आपल्या प्रत्येक देश बंधू-भगिनींचे पालन-पोषण चांगल्या प्रकारे होण्यासाठी दोन लाख कोटी रुपये सरकार खर्च करीत असेल तर त्याचा दुरुपयोग होता कामा नये. धान्याला पैसा वाटणे हा पर्याय होऊ शकत नाही, तो करू देखील नये !

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारMONEYपैसा