शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादांचा सल्ला पोलीस मनावर घेतील का?; नेमका निशाणा कुणावर याचीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 10:31 IST

पोलीस आयुक्तांची जबाबदारी वाढली, पोलिसांचा वचक सामान्यांवर नव्हे, तर गुन्हेगारांवर असावा, असे सांगून खरचं दादांनी पोलिसांना योग्य सल्ला दिला आहे. सर्वसामान्यांच्या दृष्टीने ही बाब दिलासादायक आहे.

ठळक मुद्देपोलिसांचा वचक सामान्यांवर नव्हे, तर गुन्हेगारांवर असावा, असे सांगून खरचं दादांनी पोलिसांना योग्य सल्ला दिलानवनव्या योजना राबवून नवे आयुक्त पोलीस दलाबरोबर शहरालाही सुदृढ करण्याच्या कामात व्यस्त आहेत.दादांनी शुक्रवारी पोलिसांच्याच कार्यक्रमात राजकीय हस्तक्षेप करणाऱ्यांना सज्जड दम भरला आहे

योगेश्वर माडगूळकर

पिंपरी : पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी एका कार्यक्रमात पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाई करावी, त्याबाबत राजकीय हस्तक्षेप होणार नाही. कोणीही तुम्हाला फोन करणार नाही, कोणाचा फोन आला तर सांगा, मी बघतो त्या फोनवाल्याला, अशा सूचना दिल्या. खरचं दादांचे बोल म्हणजे शहरवासीयांसाठी ‘खास’ बात आहे. पण त्यातून त्यांनी नेमका कुणावर निशाणा साधला, याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा झडू लागली आहे. दादांनी पोलिसांमधील राजकीय हस्तक्षेप थांबविला तर शहरवासीय ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले...’ असेच म्हणतील. मात्र, प्रत्यक्षात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जातील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपला २०१४ मध्ये एकहाती सत्ता मिळाली. राज्यातही युतीचे सरकार सत्तेवर आले. पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू करण्यात आले. आयुक्तालयात आर. के. पद्मनाभन यांची नियुक्ती झाली. पण आयुक्तालयाचा गाढा हाकताना ते वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी यापलीकडे गेले नाहीत. गुन्हेगार माेकाट आणि पोलीस सुसाट अशी अवस्था होती. त्यानंतर संदीप बिष्णोई पोलीस आयुक्त म्हणून आले. त्यांनाही गुन्हेगारांवर वचक ठेवता आला नाही. शहरात सुरू असलेल्या मटक्यामुळे अनेकांचे संसार धुळीला मिळाले आहेत. तर गावठी दारूमुळे अनेकांच्या घरातील कर्ता पुरुष देवाघरी गेला. मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय वाढले. आर. के. पद्मनाभन यांच्या काळातील ऐशोआराम आणि हप्तेवसुलीबाबत एका पोलीस कर्मचाऱ्यानेच पत्र लिहून बोभाटा केला आहे. त्याचा तपास सुरू आहे. पण या पत्रामुळे अनेकांची मोक्याची ठिकाणे बदलून नवे आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी खांदेपालट केली आहे.

विशेषत: भाजपची सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने राज्यभर केलेल्या अदल्या-बदल्यांमध्ये धडाकेबाज पोलीस अधिकारी कृष्ण प्रकाश यांच्याकडे पिंपरी-चिंचवड शहराची जबाबदारी सोपवली आहे. यात आयुक्तांप्रमाणेच धडाकेबाज असलेले उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांचीच मोठी भूमिका असल्याची चर्चा आहे. कृष्ण प्रकाश यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, नवनव्या योजना राबवून नवे आयुक्त पोलीस दलाबरोबर शहरालाही सुदृढ करण्याच्या कामात व्यस्त आहेत. मात्र, अजूनही पोलिसांच्या डोळ्यावर हात ठेवून पडद्याआडून अवैध धंदे सुरू आहेत. संघटित गुन्हेगारी थांबलेली नाही. त्याउलट नवे गुन्हेगार तयार होत आहेत. रात्री अकराला हाॅटेल बंद करा, असे आदेश आहेत. पण हॉटेल उशिरापर्यंत सुरू असतात. तिथेच भांडणे होतात. पोलीस स्टेशन डायरीची पाने भरतात. पण छोट्या-मोठ्या गुन्ह्यात राजकारणीच हस्तक्षेप करत असल्याने पोलिसांचाही नाइलाज होताना दिसतो. दादांनी शुक्रवारी पोलिसांच्याच कार्यक्रमात राजकीय हस्तक्षेप करणाऱ्यांना सज्जड दम भरला आहे. आधीच कृष्ण प्रकाश यांच्या नियुक्तीने हवालदिल झालेले अवैध धंदेवाले दादांच्या वक्तव्याने पुरते हादरले आहेत. पोलिसांनी त्याला साजेशी कामगिरी करावी.

पोलिसांचा वचक सामान्यांवर नव्हे, तर गुन्हेगारांवर असावा, असे सांगून खरचं दादांनी पोलिसांना योग्य सल्ला दिला आहे. सर्वसामान्यांच्या दृष्टीने ही बाब दिलासादायक आहे. कृष्ण प्रकाश यांच्या मदतीने शहरातील व्हाइट काॅलर गुन्हेगारी संपविली, तर पिंपरी-चिंचवड शहर दादांना धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाही. तसेच आगामी काळात पिंपरी-चिंचवड महापालिका राजकारणातही भाकरी फिरल्यास आश्चर्य वाटायला नको.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPoliceपोलिस