शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

नव्या कृषी विधेयकाचा फायदा मुख्यत: शेतकऱ्यांना होणार की कॉर्पोरेट कंपन्यांना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 02:12 IST

शेतकरी का संतापले आहेत?

प्रा. श्रीनिवास खांदेवाले

शेतकरी का संतापले आहेत?१. भारताच्या संसदेने शेतीशी संबंधित तीन नवे कायदे केले आहेत. त्यापैकी एका कायद्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल बाजार समितीव्यतिरिक्त कोठेही विकण्याचे आणि खरेदीदारांना कोठूनही तो विकत घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले. दुसºया कायद्यामुळे शेतकºयांना मोठ्या देशी-विदेशी कंपन्यांशी माल विकण्याचा करार करून शेती करण्याचे स्वातंत्र्य मिळाले. तिसºया कायद्याने व्यापाºयांना शेतमालाचा कितीही साठा करण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे.

२. या तिन्ही कायद्यांमध्ये एकच अर्थशास्त्रीय सिद्धांत आहे, तो म्हणजे बाजारात स्पर्धा वाढेल आणि त्यामुळे शेतकºयांना चांगली किंमत मिळेल. बाजार समित्यांचा एकाधिकार संपेल, संपूर्ण देश एक बाजार बनेल.

३. सध्याच्या कायद्यामध्ये उत्पादन खर्चावर आधारित किमान आधारभूत किमतीचा उल्लेख नाही. तो मुद्दा आम्ही सोडलेला नाही असे केंद्र सरकार म्हणते. प्रस्तुत लेखकाचे राजकीय अर्थशास्त्रावर आधारित मत असेच आहे की, या कायदेबदलाचा फायदा शेतकºयांपेक्षा कृषी व्यापार करणाºया कॉर्पोरेट कंपन्यांनाच अधिक होईल. याचा अर्थ असा नाही की, आपण प्रचलित व्यवस्थेत अडते दलाल, मापाडी, व्यापारी यांच्याकडून होणाºया शोषणाचे समर्थन करतो. पण ते शोषण संपविण्याचा हा मार्ग नव्हे.४. भारत सरकारच्या २०१५-१६च्या कृषी गणनेनुसार भारतातील ९९.४३ टक्के शेतकरी अल्पउत्पन्न किंवा अल्पसंसाधन गटातील आहेत. त्यामुळे त्यांना विक्रेय माल दूरदूरच्या परदेशात विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले म्हणणे अतिशयोक्तीचे ठरेल.५. फळे व भाजीपाला आताही (केळी, आंबे, द्राक्षे, डाळिंब, सफरचंद आदी) देशभरात विकले जात होते. भारतात आता मिळालेले शेतकरी-स्वातंत्र्य अमेरिका वा युरोपीय संघात पूर्वीपासूनच आहे. तरीही स्पर्धेच्या आधारावर तेथील शेतकºयांना सधनतेकरिता शासकीय अनुदानाची गरज पडू नये. पण त्या देशात शेतकºयांना सतत वाढती अनुदाने द्यावी लागली आहेत..६. अमेरिकेत २०१९मध्ये विशेष सहाय्य म्हणून २२ बिलियन डॉलर्सचे पॅकेज शेतकºयांना दिले. गेल्या १४ वर्षांतील हे सर्वांत मोठे साहाय्य होते. युरोपीय संघाचा (२८ देश) दरवर्षीचा ६५ बिलियन डॉलर्सचा जगातील सर्वांत मोठा अनुदान कार्यक्रम आहे. त्यावरून हे स्पष्ट होते की, बाजार स्वातंत्र्य व कॉर्पोरेट कंपन्या युरोपातील शेतकºयांनाही कृषिमालाचे उचितमूल्य मिळू देत नाहीत.७. जगातील अनुभव पहा : व्हेन कॉर्पोरेशन्स रुल्ड वर्ल्ड : डेव्हिड कॉर्टेन, आॅदर इंडिया प्रेस, गोवा, २००० सांगतो की, मोठ्या कंपन्या स्पर्धा करीत नाहीत, तर आपला जागतिक एकाधिकार प्रस्थापित करू पाहतात. चिकन, गहू, तांदूळ, मका, सोयाबीन, खाद्यतेले, आदींचा तसेच शेतीला लागणारे साहित्य (बियाणे, खते, यंत्रे कीटकनाशके) यांचा जागतिक व्यापार चार ते सहा अमेरिकन कंपन्याच नियंत्रित करतात.८. शेतकºयांनी सगळ्या सेवा त्यांच्याकडूनच घेतल्या पाहिजेत असा करार त्या करतात. त्या सेवांच्या किमती इतक्या वाढवितात की शेतकºयांना गरीब राहणे किंवा कंपनीला शेती देऊन टाकणे भाग पडते. युरोपीय देशातील शेतकºयांची क्रयशक्ती आणि आर्थिक ताकद जास्त असतानाही तिथे असा अनुभव येत असेल तर त्या तुलनेत भारतातील शेतकरी गरीब आहे. असंघटित आहे त्यांच्याकडील सरासरी जमीनधारणा कमी आहे. त्यामुळे त्यांच्यापुढील धोका जास्त वाढतो.९. जगातील अभ्यासकांच्या मते जागतिकीकरणाने स्पर्धा वाढते असे मानणे एकदम खोटे आहे. उलट त्यातून जागतिक पातळीवरच्या एकाधिकारशाही संस्था निर्माण होतात. या परिप्रेक्षात नव्या कायद्यांकडे पाहिल्यास धोके जास्त जाणवतात.

(शब्दांकन : विश्वास पाटील)कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या