शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नव्या डावात मोदी सवंगडी बदलणार? नेत्यांची पुढची पिढी लोकसभेत जाणार, मोदी धक्कातंत्र अवलंबणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 08:59 IST

आपल्या तिसऱ्या कार्यकाळात मोदी मोठ्या प्रमाणावर फेरबदल करतील, वेगवेगळ्या क्षेत्रात नवे चेहरे आणतील, असे सत्तावर्तुळात बोलले जाते आहे.

-हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सभांतून ‘घराणेशाहीचे राजकारण ही सर्व अनिष्ट गोष्टींचे मूळ असल्याचे’ सांगत असतानाच त्यांच्या मनात नेमके काय शिजते आहे, हे मात्र कुणीच खात्रीने सांगू शकत नाही. सतराव्या लोकसभेत त्यांनी केलेल्या अखेरच्या भाषणातल्या घराणेशाहीच्या संदर्भाचा नेमका अर्थ काय घ्यायचा, यावर भाजपचे अनेक नेते डोकेफोड करत आहेत. अशा प्रकारची ‘घराणेशाहीची संस्कृती’ भाजपतही आहे, अशी शेरेबाजी काही विरोधी नेत्यांनी केली होती. घराणेशाहीबद्दल बोलताना मोदी अचानक तिकडे वळले. उत्तर प्रदेश विधानसभेत राजनाथ सिंह यांचा मुलगा आमदार आहे किंवा अमित शाह यांचा मुलगा क्रिकेट नियामक मंडळावर आहे, असे विरोधी नेत्यांनी म्हटले होते. ही तुलना चुकीची ठरेल असे सांगून मोदी यांनी त्यांचे म्हणणे उडवून लावले. ‘तुमच्याकडची घराणेशाही सत्तेची चक्रे फिरवत असते; जे भाजपमध्ये होत नाही’, असे मोदी म्हणाले. 

राजनाथ सिंह यांचे पुत्र अजयसिंह उत्तर प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आणि आमदार आहेत. त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाईल आणि संरक्षणमंत्र्यांना निवडणुकीनंतर काही तरी घटनात्मक जबाबदारी दिली जाईल, अशा बातम्या दिल्लीत चर्चेत होत्या. ‘आपले सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येत असून कुंपणावरची बहुसंख्य मतेही खिशात टाकली जातील’, असा समज निर्माण करण्यात मोदी यशस्वी झाले आहेत. या तिसऱ्या कार्यकाळात मोदी मोठ्या प्रमाणावर फेरबदल करतील आणि वेगवेगळ्या क्षेत्रात नवे चेहरे आणतील, असे सत्तावर्तुळात बोलले जाते. दक्षिणेत भाजपला पाय रोवायचे असल्याने त्या प्रांतातून माणसे उचलली जातील. 

भाजपने २०१९ साली सुमारे चार टक्के मते मिळवली होती; यावेळी म्हणजे २०२४ साली १० टक्के लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मोदी यांनी एस मुरुगन यांचा अपवाद करून त्यांना राज्यसभेचे तिकीट दिले. ओडिशातूनही अश्विनी वैष्णव यांना उमेदवारी मिळाली; मात्र इतर सहा जणांना ती नाकारण्यात आली. नवे मंत्रिमंडळ नवे युग पाहील, असे संकेत यातून मिळत आहेत. अनेक जागा खाली असूनही २०२१ च्या जुलैनंतर मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार सहेतुकपणे केला नाही. अनेक मंत्री ७५ या वयोमर्यादेपेक्षा कितीतरी लहान आहेत. याचा अर्थ वय हा निकष यानंतर असणार नाही.

सत्यपाल मलिक यांचे पुस्तक?जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल असताना सत्यपाल मलिक यानी मंजूर केलेल्या काही प्रकल्पांच्या संबंधात सीबीआयकडून दिल्लीत मलिक आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांच्या घरी छापे टाकून चौकशी होत आहे. या छाप्यात काय हाती लागले याचा तपशील सीबीआयने अद्याप उघड केलेला नाही. मलिक यांनाही तो देण्यात आलेला नाही. भाजप नेतृत्वही याबाबतीत मौन राखून आहे; कारण अचानक सत्यपाल मलिक कोठून उगवले आणि २०१७ साली बिहारचे राज्यपाल म्हणून नेमले गेले हे त्यांनाही कळलेले नाही. मलिक यांना नंतर जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल म्हणून पाठवण्यात आले. 

आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात ते चार राज्यात  राज्यपाल होते; या काळाविषयी ते पुस्तक लिहिण्याचा विचार करत आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजते. केंद्र राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर पुलवामामध्ये हल्ला झाला त्यावेळी मलिक यांनी केलेल्या विधानामुळे सत्तारूढ पक्षात त्यांच्याविषयी संताप व्यक्त झाला होता. विद्यमान राज्यपाल अशा प्रकारची विधाने कशी काय करू शकतात? लक्ष्मणरेषा कशी ओलांडतात, असा प्रश्न त्यावेळी केला गेला. त्यांना तत्काळ काढून टाकण्यात यायला हवे होते. परंतु तसे काहीही घडले नाही.

जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून काम करत असताना दिलेल्या दोन कंत्राटाविषयी सीबीआय आता चौकशी करत आहे. मलिक खरोखरच पुस्तक लिहीत आहे की, तसा विचार करत आहेत याबद्दल कोणालाच खात्रीलायकरीत्या सांगता येत नाही. मलिक यांच्या कहाणीतला शेवटचा शब्द लिहिला जाणे अजून बाकी आहे.

बासुरी स्वराज यांचा उदयबासुरी स्वराज कोण? २०२३ च्या मार्च महिन्यापर्यंत ही व्यक्ती कोणालाही ठाऊक नव्हती. दिल्ली भाजपच्या सहनिमंत्रक म्हणून नेमले जाईपर्यंत हे नाव फार परिचित नव्हते. सुषमा स्वराज आणि स्वराज कौशल यांच्या त्या कन्या! बासुरी यांनी वार्विकशायर विद्यापीठातून पदवीपूर्व शिक्षण घेऊन इंग्रजी वाङ्‌मयात बी. ए. ऑनर्स ही पदवी मिळवली. नंतर त्या लंडनमधील बीपीपी लॉ स्कूलमध्ये दाखल झाल्या. पुढे २००७ साली बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये त्यांनी नाव नोंदवले. त्यांच्याकडे १७ वर्षांचा अनुभव असून, त्यांनी बरेच नाव कमावले आहे. आता चर्चा अशी आहे, की बासुरी यांना दिल्लीतून लोकसभेची उमेदवारी दिली जाईल. वृत्तवाहिन्यांवरही भाजपच्या प्रवक्त्या म्हणून त्यांना मोठी मागणी असते. भाजपच्या विरोधकांवरही त्यांनी प्रभाव टाकलेला दिसतो.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाlok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदी