शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

नव्या डावात मोदी सवंगडी बदलणार? नेत्यांची पुढची पिढी लोकसभेत जाणार, मोदी धक्कातंत्र अवलंबणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 08:59 IST

आपल्या तिसऱ्या कार्यकाळात मोदी मोठ्या प्रमाणावर फेरबदल करतील, वेगवेगळ्या क्षेत्रात नवे चेहरे आणतील, असे सत्तावर्तुळात बोलले जाते आहे.

-हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सभांतून ‘घराणेशाहीचे राजकारण ही सर्व अनिष्ट गोष्टींचे मूळ असल्याचे’ सांगत असतानाच त्यांच्या मनात नेमके काय शिजते आहे, हे मात्र कुणीच खात्रीने सांगू शकत नाही. सतराव्या लोकसभेत त्यांनी केलेल्या अखेरच्या भाषणातल्या घराणेशाहीच्या संदर्भाचा नेमका अर्थ काय घ्यायचा, यावर भाजपचे अनेक नेते डोकेफोड करत आहेत. अशा प्रकारची ‘घराणेशाहीची संस्कृती’ भाजपतही आहे, अशी शेरेबाजी काही विरोधी नेत्यांनी केली होती. घराणेशाहीबद्दल बोलताना मोदी अचानक तिकडे वळले. उत्तर प्रदेश विधानसभेत राजनाथ सिंह यांचा मुलगा आमदार आहे किंवा अमित शाह यांचा मुलगा क्रिकेट नियामक मंडळावर आहे, असे विरोधी नेत्यांनी म्हटले होते. ही तुलना चुकीची ठरेल असे सांगून मोदी यांनी त्यांचे म्हणणे उडवून लावले. ‘तुमच्याकडची घराणेशाही सत्तेची चक्रे फिरवत असते; जे भाजपमध्ये होत नाही’, असे मोदी म्हणाले. 

राजनाथ सिंह यांचे पुत्र अजयसिंह उत्तर प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आणि आमदार आहेत. त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाईल आणि संरक्षणमंत्र्यांना निवडणुकीनंतर काही तरी घटनात्मक जबाबदारी दिली जाईल, अशा बातम्या दिल्लीत चर्चेत होत्या. ‘आपले सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येत असून कुंपणावरची बहुसंख्य मतेही खिशात टाकली जातील’, असा समज निर्माण करण्यात मोदी यशस्वी झाले आहेत. या तिसऱ्या कार्यकाळात मोदी मोठ्या प्रमाणावर फेरबदल करतील आणि वेगवेगळ्या क्षेत्रात नवे चेहरे आणतील, असे सत्तावर्तुळात बोलले जाते. दक्षिणेत भाजपला पाय रोवायचे असल्याने त्या प्रांतातून माणसे उचलली जातील. 

भाजपने २०१९ साली सुमारे चार टक्के मते मिळवली होती; यावेळी म्हणजे २०२४ साली १० टक्के लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मोदी यांनी एस मुरुगन यांचा अपवाद करून त्यांना राज्यसभेचे तिकीट दिले. ओडिशातूनही अश्विनी वैष्णव यांना उमेदवारी मिळाली; मात्र इतर सहा जणांना ती नाकारण्यात आली. नवे मंत्रिमंडळ नवे युग पाहील, असे संकेत यातून मिळत आहेत. अनेक जागा खाली असूनही २०२१ च्या जुलैनंतर मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार सहेतुकपणे केला नाही. अनेक मंत्री ७५ या वयोमर्यादेपेक्षा कितीतरी लहान आहेत. याचा अर्थ वय हा निकष यानंतर असणार नाही.

सत्यपाल मलिक यांचे पुस्तक?जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल असताना सत्यपाल मलिक यानी मंजूर केलेल्या काही प्रकल्पांच्या संबंधात सीबीआयकडून दिल्लीत मलिक आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांच्या घरी छापे टाकून चौकशी होत आहे. या छाप्यात काय हाती लागले याचा तपशील सीबीआयने अद्याप उघड केलेला नाही. मलिक यांनाही तो देण्यात आलेला नाही. भाजप नेतृत्वही याबाबतीत मौन राखून आहे; कारण अचानक सत्यपाल मलिक कोठून उगवले आणि २०१७ साली बिहारचे राज्यपाल म्हणून नेमले गेले हे त्यांनाही कळलेले नाही. मलिक यांना नंतर जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल म्हणून पाठवण्यात आले. 

आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात ते चार राज्यात  राज्यपाल होते; या काळाविषयी ते पुस्तक लिहिण्याचा विचार करत आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजते. केंद्र राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर पुलवामामध्ये हल्ला झाला त्यावेळी मलिक यांनी केलेल्या विधानामुळे सत्तारूढ पक्षात त्यांच्याविषयी संताप व्यक्त झाला होता. विद्यमान राज्यपाल अशा प्रकारची विधाने कशी काय करू शकतात? लक्ष्मणरेषा कशी ओलांडतात, असा प्रश्न त्यावेळी केला गेला. त्यांना तत्काळ काढून टाकण्यात यायला हवे होते. परंतु तसे काहीही घडले नाही.

जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून काम करत असताना दिलेल्या दोन कंत्राटाविषयी सीबीआय आता चौकशी करत आहे. मलिक खरोखरच पुस्तक लिहीत आहे की, तसा विचार करत आहेत याबद्दल कोणालाच खात्रीलायकरीत्या सांगता येत नाही. मलिक यांच्या कहाणीतला शेवटचा शब्द लिहिला जाणे अजून बाकी आहे.

बासुरी स्वराज यांचा उदयबासुरी स्वराज कोण? २०२३ च्या मार्च महिन्यापर्यंत ही व्यक्ती कोणालाही ठाऊक नव्हती. दिल्ली भाजपच्या सहनिमंत्रक म्हणून नेमले जाईपर्यंत हे नाव फार परिचित नव्हते. सुषमा स्वराज आणि स्वराज कौशल यांच्या त्या कन्या! बासुरी यांनी वार्विकशायर विद्यापीठातून पदवीपूर्व शिक्षण घेऊन इंग्रजी वाङ्‌मयात बी. ए. ऑनर्स ही पदवी मिळवली. नंतर त्या लंडनमधील बीपीपी लॉ स्कूलमध्ये दाखल झाल्या. पुढे २००७ साली बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये त्यांनी नाव नोंदवले. त्यांच्याकडे १७ वर्षांचा अनुभव असून, त्यांनी बरेच नाव कमावले आहे. आता चर्चा अशी आहे, की बासुरी यांना दिल्लीतून लोकसभेची उमेदवारी दिली जाईल. वृत्तवाहिन्यांवरही भाजपच्या प्रवक्त्या म्हणून त्यांना मोठी मागणी असते. भाजपच्या विरोधकांवरही त्यांनी प्रभाव टाकलेला दिसतो.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाlok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदी