शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

नव्या डावात मोदी सवंगडी बदलणार? नेत्यांची पुढची पिढी लोकसभेत जाणार, मोदी धक्कातंत्र अवलंबणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 08:59 IST

आपल्या तिसऱ्या कार्यकाळात मोदी मोठ्या प्रमाणावर फेरबदल करतील, वेगवेगळ्या क्षेत्रात नवे चेहरे आणतील, असे सत्तावर्तुळात बोलले जाते आहे.

-हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सभांतून ‘घराणेशाहीचे राजकारण ही सर्व अनिष्ट गोष्टींचे मूळ असल्याचे’ सांगत असतानाच त्यांच्या मनात नेमके काय शिजते आहे, हे मात्र कुणीच खात्रीने सांगू शकत नाही. सतराव्या लोकसभेत त्यांनी केलेल्या अखेरच्या भाषणातल्या घराणेशाहीच्या संदर्भाचा नेमका अर्थ काय घ्यायचा, यावर भाजपचे अनेक नेते डोकेफोड करत आहेत. अशा प्रकारची ‘घराणेशाहीची संस्कृती’ भाजपतही आहे, अशी शेरेबाजी काही विरोधी नेत्यांनी केली होती. घराणेशाहीबद्दल बोलताना मोदी अचानक तिकडे वळले. उत्तर प्रदेश विधानसभेत राजनाथ सिंह यांचा मुलगा आमदार आहे किंवा अमित शाह यांचा मुलगा क्रिकेट नियामक मंडळावर आहे, असे विरोधी नेत्यांनी म्हटले होते. ही तुलना चुकीची ठरेल असे सांगून मोदी यांनी त्यांचे म्हणणे उडवून लावले. ‘तुमच्याकडची घराणेशाही सत्तेची चक्रे फिरवत असते; जे भाजपमध्ये होत नाही’, असे मोदी म्हणाले. 

राजनाथ सिंह यांचे पुत्र अजयसिंह उत्तर प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आणि आमदार आहेत. त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाईल आणि संरक्षणमंत्र्यांना निवडणुकीनंतर काही तरी घटनात्मक जबाबदारी दिली जाईल, अशा बातम्या दिल्लीत चर्चेत होत्या. ‘आपले सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येत असून कुंपणावरची बहुसंख्य मतेही खिशात टाकली जातील’, असा समज निर्माण करण्यात मोदी यशस्वी झाले आहेत. या तिसऱ्या कार्यकाळात मोदी मोठ्या प्रमाणावर फेरबदल करतील आणि वेगवेगळ्या क्षेत्रात नवे चेहरे आणतील, असे सत्तावर्तुळात बोलले जाते. दक्षिणेत भाजपला पाय रोवायचे असल्याने त्या प्रांतातून माणसे उचलली जातील. 

भाजपने २०१९ साली सुमारे चार टक्के मते मिळवली होती; यावेळी म्हणजे २०२४ साली १० टक्के लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मोदी यांनी एस मुरुगन यांचा अपवाद करून त्यांना राज्यसभेचे तिकीट दिले. ओडिशातूनही अश्विनी वैष्णव यांना उमेदवारी मिळाली; मात्र इतर सहा जणांना ती नाकारण्यात आली. नवे मंत्रिमंडळ नवे युग पाहील, असे संकेत यातून मिळत आहेत. अनेक जागा खाली असूनही २०२१ च्या जुलैनंतर मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार सहेतुकपणे केला नाही. अनेक मंत्री ७५ या वयोमर्यादेपेक्षा कितीतरी लहान आहेत. याचा अर्थ वय हा निकष यानंतर असणार नाही.

सत्यपाल मलिक यांचे पुस्तक?जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल असताना सत्यपाल मलिक यानी मंजूर केलेल्या काही प्रकल्पांच्या संबंधात सीबीआयकडून दिल्लीत मलिक आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांच्या घरी छापे टाकून चौकशी होत आहे. या छाप्यात काय हाती लागले याचा तपशील सीबीआयने अद्याप उघड केलेला नाही. मलिक यांनाही तो देण्यात आलेला नाही. भाजप नेतृत्वही याबाबतीत मौन राखून आहे; कारण अचानक सत्यपाल मलिक कोठून उगवले आणि २०१७ साली बिहारचे राज्यपाल म्हणून नेमले गेले हे त्यांनाही कळलेले नाही. मलिक यांना नंतर जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल म्हणून पाठवण्यात आले. 

आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात ते चार राज्यात  राज्यपाल होते; या काळाविषयी ते पुस्तक लिहिण्याचा विचार करत आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजते. केंद्र राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर पुलवामामध्ये हल्ला झाला त्यावेळी मलिक यांनी केलेल्या विधानामुळे सत्तारूढ पक्षात त्यांच्याविषयी संताप व्यक्त झाला होता. विद्यमान राज्यपाल अशा प्रकारची विधाने कशी काय करू शकतात? लक्ष्मणरेषा कशी ओलांडतात, असा प्रश्न त्यावेळी केला गेला. त्यांना तत्काळ काढून टाकण्यात यायला हवे होते. परंतु तसे काहीही घडले नाही.

जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून काम करत असताना दिलेल्या दोन कंत्राटाविषयी सीबीआय आता चौकशी करत आहे. मलिक खरोखरच पुस्तक लिहीत आहे की, तसा विचार करत आहेत याबद्दल कोणालाच खात्रीलायकरीत्या सांगता येत नाही. मलिक यांच्या कहाणीतला शेवटचा शब्द लिहिला जाणे अजून बाकी आहे.

बासुरी स्वराज यांचा उदयबासुरी स्वराज कोण? २०२३ च्या मार्च महिन्यापर्यंत ही व्यक्ती कोणालाही ठाऊक नव्हती. दिल्ली भाजपच्या सहनिमंत्रक म्हणून नेमले जाईपर्यंत हे नाव फार परिचित नव्हते. सुषमा स्वराज आणि स्वराज कौशल यांच्या त्या कन्या! बासुरी यांनी वार्विकशायर विद्यापीठातून पदवीपूर्व शिक्षण घेऊन इंग्रजी वाङ्‌मयात बी. ए. ऑनर्स ही पदवी मिळवली. नंतर त्या लंडनमधील बीपीपी लॉ स्कूलमध्ये दाखल झाल्या. पुढे २००७ साली बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये त्यांनी नाव नोंदवले. त्यांच्याकडे १७ वर्षांचा अनुभव असून, त्यांनी बरेच नाव कमावले आहे. आता चर्चा अशी आहे, की बासुरी यांना दिल्लीतून लोकसभेची उमेदवारी दिली जाईल. वृत्तवाहिन्यांवरही भाजपच्या प्रवक्त्या म्हणून त्यांना मोठी मागणी असते. भाजपच्या विरोधकांवरही त्यांनी प्रभाव टाकलेला दिसतो.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाlok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदी