शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नितीन आगेचे काय झाले, याचेही उत्तर महाराष्ट्राला सापडेल की नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:33 IST

मारुती कांबळेचं काय झालं ? या विजय तेंडुलकरांनी ‘सामना’ चित्रपटातून ऐंशीच्या दशकात केलेल्या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्र अद्याप देऊ शकलेला नाही.

मारुती कांबळेचं काय झालं? या विजय तेंडुलकरांनी ‘सामना’ चित्रपटातून ऐंशीच्या दशकात केलेल्या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्र अद्याप देऊ शकलेला नाही. नितीन आगेचे काय झाले? याचेही उत्तर महाराष्ट्राला सापडेल की नाही शंकाच आहे. नगर जिल्ह्यातील खर्डा गावातील शाळकरी वयाच्या नितीनला भर वर्गातून गावातील टोळी घेऊन जाते, सर्वांसमक्ष त्याला मारझोड होते, पण सगळेच बेखबर. पुढे जंगलात फाशी दिलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेहच सापडतो. त्याचा गुन्हा काय, तर दलित असून सवर्ण समाजातील मुलीशी कथित प्रेमसंबंध! परजातीय प्रेमाच्या या ‘सैराट’ कृत्याने राज्य हादरले. तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील खर्ड्यात आले. फास्ट ट्रॅक कोर्ट, विशेष वकील अशा घोषणांचा पाऊस पडला. आठवले, आंबेडकर वगळता इतर समाजातील शहाणी माणसं तिकडे फिरकली सुद्धा नाहीत. मोर्चे निघाले, निषेध झाला. पण, हा सगळा निषेधाचा सोहळा साजरा करुन पुढे महाराष्टÑ ढाराढूर झोपला. हा खटला न्यायालयात कधी उभा राहिला, सुनावणी कधी झाली? याकडे कोणाचेच लक्ष नसावे? आपल्या मुलाला मरणोपरांत तरी न्याय मिळावा म्हणून एकटे नितीनचे वडील तेवढे कोर्टाची वारी करत होते. कोर्टात खटला उभा राहिला, पण एकाहून एक सगळे साक्षीदार फुटत गेले आणि शेवटी झाले काय तर, सर्व आरोपी निर्दोष असल्याचे निकालपत्र हाती आले! नितीनच्या वडिलांना सरकारी यंत्रणेने साधी निकालाची तारीख कळविण्याची तसदीदेखील घेतली नाही. ज्यांनी नितीनला मारहाण होताना पाहिले ते शिक्षकही फितूर व्हावेत? पोलिसांनी आमचे खोटे जबाब घेतल्याची धांदात साक्ष त्यांनी न्यायालयात दिली. या आधुनिक द्रोणाचार्यांच्या मौनाने एका निष्पाप ‘एकलव्या’चा न्याय नाकारला गेला. आता कदाचित पुन्हा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतील, न्याय-निवाड्यावर चर्चा केली जाईल, पण त्यातून हाती काहीच लागणार नाही. पुरोगामी म्हणवून घेणाºया महाराष्टÑातील समाजधुरिणांनी यातून वेळीच बोध घेतला नाही, तर असे आणखी नितीन मारले जाणार नाहीत ना, याची खात्री देता येणार नाही. गुन्हेगारांची जातपात व मोर्चांची वाट न पाहता या अपराधांना कठोर शासनच हवे. पण, खैरलांजी, खर्डा आणि सोनईतील घटना पाहिल्यानंतर जातीय अत्याचाराच्या घटनांबाबत आपण किती गंभीर आहोत, असा प्रश्न पडतो. कोपर्डी येथील घटनेत सरकारने विशेष वकील नियुक्त केला. यातील आरोपींवरील दोष सिद्ध करण्यात सरकारी पक्ष यशस्वी झाला. पण, खर्ड्याच्या खटल्यात ही तत्परता दिसून आली नाही. ‘पब्लिक डिमांड’ नावाची संकल्पना न्यायालयीन प्रक्रियेलाही प्रभावित करु पाहत आहे, असा आक्षेप कोपर्डी खटल्यात आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात नोंदविला. न्यायालयाने हा आक्षेप फेटाळला. पण, सामाजिक दबावाशिवाय यंत्रणा कामच करणार नाही का? असा प्रश्न खर्ड्याचा निकाल पाहून निर्माण होतो.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर