शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

खोतकर खरेच लढणार का? दानवेंचा घाम काढणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 08:00 IST

अजूनही खोतकर लोकसभा लढवण्याची भाषा बदलत नाहीत. म्हणजे त्यांना नेमके काय हवे आहे?

- सुधीर महाजन

निवडणुका जाहीर झाल्या, त्यापूर्वी भाजप आणि शिवसेनेची गाठ पुन्हा बांधली गेली तरी राज्यमंत्री अर्जुन खोतकर हट्ट का सोडत नाहीत? खा. रावसाहेब दानवेंशी दिलजमाई करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन गेले आणि झाले गेले गंगेला मिळाले, अशा शब्दांत दोघांचे मनोमिलन घडवून आणले तरी अजूनही खोतकर लोकसभा लढवण्याची भाषा बदलत नाहीत. म्हणजे त्यांना नेमके काय हवे आहे? एक तर निवडणूक लढवायची असेल तर सेना त्यांना उमेदवारी देणार नाही आणि काँग्रेस त्यांना तिकीट देणार असे गृहीत धरले तरी खोतकर काँग्रेसला कितपत पचनी पडतील, हाही एक मुद्दा आहेच. कारण कैलाश गोरंट्याल यांना ते कितपत मान्य होईल.

खोतकर कोणाच्या बळावर लोकसभा लढवू पाहतात याचा आढावा घेतला, तर सिल्लोडमधून आ. अब्दुल सत्तारांचा त्यांना उघड पाठिंबा दिसतो. गेल्या दीड-दोन वर्षांपासून सत्तार आणि खोतकर यांची जवळीक वाढली आहे. इकडे दानवेंना पराभूत करण्याचा तिढा सत्तार यांनी उचलला आणि त्यासाठी खोतकर उपयुक्त प्यादे ठरू शकतात, असे वरकरणी दिसते आणि त्याच धोरणात गेल्या दीड-दोन वर्षांपासून हे निवडणूक लढण्याचे दबावतंत्र चालू आहे. सत्तार यांचा संपूर्ण पाठिंबा, जालना विधानसभेतील त्यांची स्वत:ची ‘मतपेढी’ आणि अंबडमधून राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांच्याकडून मिळणारी रसद एवढ्या शिदोरीवर खोतकर रावसाहेबांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार ठरू शकतात.

२0१४ च्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे हे २ लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून आले असले तरी ती काही त्यांची मते नव्हती. देशभरात निर्माण झालेल्या ‘मोदी लाटे’चा तो परिणाम होता. रावसाहेबांची खरी परिस्थिती तपासायची असेल तर २00९ च्या निवडणुकीचा आधार घ्यायला पाहिजे. त्यावेळी ते अवघ्या साडेआठ हजार मतांनी विजयी झाले होते. लोकसभेसाठी हा विजय निसटता समजला जातो. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांचा मुलगा संतोष हे भोकरदनचे आमदार आहेत. मुलगी जि.प. सदस्या आहे. खोतकरांमुळेच ती अध्यक्ष होऊ शकली नाही. सर्व सत्ताकेंद्र दानवेंकडे असली तरी तीच त्यांच्याविषयीच्या नाराजीची कारणे ठरू शकतात. हे सर्व त्रैराशिक मोडूनच खोतकर लढण्याची भाषा करतात; पण आता मध्येच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून घूमजाव केले होते. ‘मातोश्री’वरही त्यांच्या कानावर समजुतीच्या चार गोष्टी घातल्या गेल्या. सारी निरवानिरव झाली असताना पुन्हा त्यांनी लढण्याची भाषा सुरू केली.

याचवेळी परवा सत्तार-दानवेंचे दिलखुलास गप्पा करतानाचे छायाचित्र सोशल मीडियावरून सगळीकडे परसले. त्यामुळे पुन्हा एकदा खोतकरांच्या हट्टाकडे वेगळ्या नजरेने पाहण्यास सुरुवात झाली. त्यांना नेमके काय हवे आहे, याची लोक चर्चा करायला लागले. जालना कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या ताब्यात आहे. या समितीत झालेल्या गैरव्यवहाराचा तपास चालू आहे. याशिवाय जो जालना सहकारी साखर कारखाना त्यांच्याकडे आहे, तेथेही गैरव्यवहार झाल्याचे आरोप आहेत. त्याचीही चौकशी चालू आहे. चौकशीची ही भुतावळ गाडून टाकण्यासाठी तर ही लढण्याची भाषा नाही ना? अशी जोरदार चर्चा आहे. याशिवाय आणखी काही छोटी-मोठी प्रकरणे आहेतच. यातून त्यांना सहीसलामत सुटका हवी आहे म्हणूनच ते दानवेंना आव्हान देतात आणि दबाव वाढवतात. चर्चाच त्या, लोकांच्या तोंडाला कोण हात लावणार? प्रश्न मात्र अजून कायम आहे. खोतकर खरोखरच लढणार का?

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरraosaheb danveरावसाहेब दानवेlok sabhaलोकसभाJalanaजालना