शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

खोतकर खरेच लढणार का? दानवेंचा घाम काढणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 08:00 IST

अजूनही खोतकर लोकसभा लढवण्याची भाषा बदलत नाहीत. म्हणजे त्यांना नेमके काय हवे आहे?

- सुधीर महाजन

निवडणुका जाहीर झाल्या, त्यापूर्वी भाजप आणि शिवसेनेची गाठ पुन्हा बांधली गेली तरी राज्यमंत्री अर्जुन खोतकर हट्ट का सोडत नाहीत? खा. रावसाहेब दानवेंशी दिलजमाई करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन गेले आणि झाले गेले गंगेला मिळाले, अशा शब्दांत दोघांचे मनोमिलन घडवून आणले तरी अजूनही खोतकर लोकसभा लढवण्याची भाषा बदलत नाहीत. म्हणजे त्यांना नेमके काय हवे आहे? एक तर निवडणूक लढवायची असेल तर सेना त्यांना उमेदवारी देणार नाही आणि काँग्रेस त्यांना तिकीट देणार असे गृहीत धरले तरी खोतकर काँग्रेसला कितपत पचनी पडतील, हाही एक मुद्दा आहेच. कारण कैलाश गोरंट्याल यांना ते कितपत मान्य होईल.

खोतकर कोणाच्या बळावर लोकसभा लढवू पाहतात याचा आढावा घेतला, तर सिल्लोडमधून आ. अब्दुल सत्तारांचा त्यांना उघड पाठिंबा दिसतो. गेल्या दीड-दोन वर्षांपासून सत्तार आणि खोतकर यांची जवळीक वाढली आहे. इकडे दानवेंना पराभूत करण्याचा तिढा सत्तार यांनी उचलला आणि त्यासाठी खोतकर उपयुक्त प्यादे ठरू शकतात, असे वरकरणी दिसते आणि त्याच धोरणात गेल्या दीड-दोन वर्षांपासून हे निवडणूक लढण्याचे दबावतंत्र चालू आहे. सत्तार यांचा संपूर्ण पाठिंबा, जालना विधानसभेतील त्यांची स्वत:ची ‘मतपेढी’ आणि अंबडमधून राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांच्याकडून मिळणारी रसद एवढ्या शिदोरीवर खोतकर रावसाहेबांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार ठरू शकतात.

२0१४ च्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे हे २ लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून आले असले तरी ती काही त्यांची मते नव्हती. देशभरात निर्माण झालेल्या ‘मोदी लाटे’चा तो परिणाम होता. रावसाहेबांची खरी परिस्थिती तपासायची असेल तर २00९ च्या निवडणुकीचा आधार घ्यायला पाहिजे. त्यावेळी ते अवघ्या साडेआठ हजार मतांनी विजयी झाले होते. लोकसभेसाठी हा विजय निसटता समजला जातो. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांचा मुलगा संतोष हे भोकरदनचे आमदार आहेत. मुलगी जि.प. सदस्या आहे. खोतकरांमुळेच ती अध्यक्ष होऊ शकली नाही. सर्व सत्ताकेंद्र दानवेंकडे असली तरी तीच त्यांच्याविषयीच्या नाराजीची कारणे ठरू शकतात. हे सर्व त्रैराशिक मोडूनच खोतकर लढण्याची भाषा करतात; पण आता मध्येच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून घूमजाव केले होते. ‘मातोश्री’वरही त्यांच्या कानावर समजुतीच्या चार गोष्टी घातल्या गेल्या. सारी निरवानिरव झाली असताना पुन्हा त्यांनी लढण्याची भाषा सुरू केली.

याचवेळी परवा सत्तार-दानवेंचे दिलखुलास गप्पा करतानाचे छायाचित्र सोशल मीडियावरून सगळीकडे परसले. त्यामुळे पुन्हा एकदा खोतकरांच्या हट्टाकडे वेगळ्या नजरेने पाहण्यास सुरुवात झाली. त्यांना नेमके काय हवे आहे, याची लोक चर्चा करायला लागले. जालना कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या ताब्यात आहे. या समितीत झालेल्या गैरव्यवहाराचा तपास चालू आहे. याशिवाय जो जालना सहकारी साखर कारखाना त्यांच्याकडे आहे, तेथेही गैरव्यवहार झाल्याचे आरोप आहेत. त्याचीही चौकशी चालू आहे. चौकशीची ही भुतावळ गाडून टाकण्यासाठी तर ही लढण्याची भाषा नाही ना? अशी जोरदार चर्चा आहे. याशिवाय आणखी काही छोटी-मोठी प्रकरणे आहेतच. यातून त्यांना सहीसलामत सुटका हवी आहे म्हणूनच ते दानवेंना आव्हान देतात आणि दबाव वाढवतात. चर्चाच त्या, लोकांच्या तोंडाला कोण हात लावणार? प्रश्न मात्र अजून कायम आहे. खोतकर खरोखरच लढणार का?

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरraosaheb danveरावसाहेब दानवेlok sabhaलोकसभाJalanaजालना