शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

दहावीची परीक्षा कायमचीच का रद्द करू नये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 05:30 IST

दोन वर्षांपूर्वी असा प्रश्न कोणी विचारला असता तर त्याची वेड्यात गणना झाली असती. परंतु आज ही एक नवी दिशा असू शकते!

सुरेंद्र दिघे, मॅनेजिंग ट्रस्टी, जिज्ञासा ट्रस्ट, ठाणेदेशातील शालेय शिक्षणाची शिखर संस्था असलेल्या सीबीएसईने १० वीची परीक्षा न घेण्याचा  अचानकपणे घेतलेला निर्णय बहुतेकांना अनपेक्षित  होता. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय तर्कशुद्ध आणि व्यवहार्यच होता. सीबीएसईच्या ९० टक्के शाळा  १२ वीपर्यंत असतात. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापन करून आपल्याच शाळेत विद्यार्थी ११ वीला सहजतेने प्रवेश घेऊ शकतात.  आपल्या राज्य सरकारनेसुद्धा  शालान्त परीक्षा रद्द करण्याचा अतिशय सुयोग्य निर्णय घेतला. या निर्णयाला शैक्षणिक जगताकडून  विरोध होत आहे, कारण दहावीची परीक्षा  हा विद्यार्थी, शिक्षक, पालक या सगळ्यांसाठीच अतिशय नाजूक आणि जिव्हाळ्याचा विषय!  दुसरे कारण अधिक गंभीर आहे.  सीबीएसई मंडळाच्या अगदी विरुद्ध परिस्थिती आपल्याकडे आहे. आपल्याकडील जास्त शाळा या १० वीपर्यंत आहेत. महाविद्यालयाशी संलग्न  कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या लक्षणीय आहे.  नामांकित महाविद्यालयातील ११ वी १२ वीचे वर्ग असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी स्पर्धा  तीव्र असते. त्यामुळे ११ वीचा प्रवेश हा जीवघेणा संघर्षमय होईल याची भीती वाटते.  ११ वीच्या प्रवेशाचे हे कठीण गणित चर्चा, राजकीय इच्छाशक्ती आणि वेळ आली तर न्यायालय या पातळीवरून यथावकाश नक्की सुटेल. ११ वीसाठी प्रवेश परीक्षा हा सध्या तरी व्यवहारी  मार्ग दिसतो. या वर्षीचा प्रश्न सुटेल; पण दरवर्षीचा हा गुंता कायमचा सोडवायचा असेल तर  कठीण निर्णय घेण्याची वेळ आली आहे. ही शालान्त परीक्षा कायमची रद्द केली तर? दोन वर्षांपूर्वी असा  प्रश्न कोणी विचारला असता तर त्याची वेड्यात गणना झाली असती. परंतु आज नवीन शैक्षणिक कायद्यात त्याचे सूतोवाच केले आहे. शालेय शिक्षणात ९ वी ते १२ वी असा नवा गट करून,  शालान्त परीक्षेचे मानसिक दडपण आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या ताणतणावातून   विद्यार्थ्यांना मुक्त करण्याची ही संधी आहे.   १० - २ ही पद्धत आपल्याकडे १९७५  पासून कार्यन्वित आहे. जगभर मान्य पावलेली पद्धत म्हणून ही २ वर्षे शाळेच्या माध्यमिक विभागाला जोडण्यात आली होती. देशातील केंद्र शिक्षण मंडळाबरोबर इतर राज्यातपण हीच पद्धत अवलंबली गेली. महाराष्ट्रात मात्र गोची झाली होती. तत्कालीन शैक्षणिक परिस्थितीमुळे आणि मुख्यत्वे संस्था चालक आणि शिक्षक संघटना यांच्या दबावाखाली एक सुटकेचा मार्ग म्हणून ११ वी - १२ वीचे दोन्ही वर्ग शाळा आणि महाविद्यालये यांच्यात सामावून दिले गेले. ४५ वर्षांनी हा प्रयोग मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आहे, असे आपण म्हणू शकतो.  - परंतु यातूनच एक भस्मासुर जन्म पावला : ११ वी प्रवेशाची जटिल समस्या! प्रतिष्ठित महाविद्यालयाशी जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्याची इच्छा सर्वच विद्यार्थी आणि पालकांना असते. नवीन शैक्षणिक धोरणात कनिष्ठ महाविद्यालय ही संकल्पनाच मोडीत काढण्याची सूचक तरतूद आहे.  ९ वी ते १२ वी हे सर्व वर्ग उच्च माध्यमिक म्हणून शालेय शिक्षणाचा भाग असतील. म्हणजेच त्यांच्या शेवटच्या दोन वर्षांवर कला, वाणिज्य अथवा विज्ञान असा शिक्का नसेल. अभ्यासक्रमात लवचीकपणा असेल. महाविद्यालयीन प्रवेश परीक्षेसाठी राष्ट्रीय पातळीवरील संस्था प्रवेश परीक्षा घेईल व त्यातील गुणानुक्रमे देशातील कुठल्याही महाविद्यालयात प्रवेश दिला जाईल. हे सर्व बदल लगेच होतील असे नाही. त्याला वेळ लागणारच आहे. परंतु सर्वप्रथम  हे  बदल स्वीकारण्यासाठी आपल्याला आपली मानसिकता बदलावी लागणार आहे. अडचणी अनेक आहेत. प्रामुख्याने माध्यमिक वर्ग असलेल्या शाळांना उच्च माध्यमिक विभाग सुरू करावे लागतील. यासाठी शासनाने त्यांना नवीन वर्ग सुरू करण्याची परवानगी विनाअडथळा दिली पाहिजे, त्याबरोबरच साधन, सुविधा आणि मुख्य म्हणजे निधी लागेल.  ज्या संस्था आपल्यात योग्य ते बदल करून सर्व अर्थाने सक्षम होतील त्याच पुढील काळात टिकून राहतील ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे. कोरोना महामारीने शिक्षण क्षेत्राला हा मोठा धडा शिकवला आहे.sure-dradighe@gmail.com 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीTeacherशिक्षक