शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

धर्माच्या नावावर देशाचे विभाजन करू पाहणाऱ्यांना 'भारताची गोष्ट' का समजू नये? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 10:57 IST

धर्मनिरपेक्ष देशासाठी ही वेळ अत्यंत धक्कादायक असल्याचेही न्यायालयाने म्हटले होते.

नोटेवर कोणाचे चित्र असावे, अशी चर्चा सुरू होणे आश्चर्यकारक नाही. जिये नको ते मुद्दे प्राधान्याचे होतात आणि महत्त्वाचे विषय मागच्या बाकांवर जाऊन बसतात, अशा वातावरणात हे अपेक्षित आहेच; पण ज्या राष्ट्रपिता महात्मा गांधींचे छायाचित्र नोटेवर आहे, ते गांधी आपल्याला नीट समजले आहेत का? 'ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सन्मति दे भगवान' ही गांधींची प्रार्थना आपल्यापर्यंत पोहोचली आहे का? अमेरिकेचे अध्यक्ष असताना बराक ओबामा म्हणतात, 'तुमच्याकडे मिल्खासिंग असतो, शाहरूख खान असतो आणि, मेरी कोमही असते! ही भारताची सुंदर गोष्ट आहे. पण, आपल्यालाच ही गोष्ट समजली आहे का?

समजली असती, तर एका धर्माच्या मेळाव्यात दुसऱ्या धर्मावर बंदी घालण्याची हिंसक भाषा झाली नसती. राजकीय पक्षांनाच काय, केंद्र आणि राज्य सरकारांनाही संविधानाचा विसर पडला नसता, तर सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची वेळ आली नसती. विखारी भाषण हा आपल्या राजकारणाचा स्वभाव झाला नसता. विखारी भाषण केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार आझम खान यांना तीन वर्षे तुरुंगवास ठोठावला जाणे, हा या पार्श्वभूमीवर फारच महत्त्वाचा निकाल. आझम खान हे उत्तर प्रदेशातील महत्त्वाचे नेते. समाजवादी पक्षात त्यांचा मोठा दबदबा. अर्थात, जमीन बळकावणे, भ्रष्टाचार अशा अनेक आरोपांमुळे त्यांनी वेळोवेळी तुरुंगाची हवा खाल्ली आहे; पण आझम खान यांना झालेली ही ताजी शिक्षा वेगळ्या संदर्भातील आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत २०१९ मध्ये द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याच्या गुन्ह्यात त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. द्वेष आणि विखार पसरवणारी अशी भाषणे असह्य आहेत, असंवैधानिक आहेत, त्यावर तातडीने कारवाई करायला हवी, असे साक्षात सर्वोच्च न्यायलयाने नुकतेच सुनावले होते. केंद्र सरकारसह काही राज्य सरकारांना सर्वोच्च न्यायालयाने एका अर्थाने खडसावले होते. राजकारणाची परिभाषाच हल्ली बदलली आहे. विखार ही मातृभाषा वाटावी, एवढा स्तर घसरला आहे. ज्या महाराष्ट्राला सुसंस्कृत राज्य असे म्हटले जात असे, तिथेही ज्या भाषेत नेते परस्परांविषयी बोलतात ते धक्कादायक आहे. राजकीय विरोध असतानाही मैत्री जपणे हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्वभाव होता. 

यशवंतराव चव्हाण आणि रामभाऊ म्हाळगी या नेत्यांचे पक्ष वेगळे होते. मात्र, दोघांनीही एकमेकांचा सदैव सन्मान राखल्याची अनेक उदाहरणे सांगता येतील. शरद पवार आणि एन. डी. पाटील हे जवळचे नातेवाईक; पण परस्परांच्या विरोधात भूमिका मांडताना त्यांच्यातील नाते आडवे आले नाही. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांचे पक्ष वेगळे असूनही त्यांचे मैत्र अवघ्या महाराष्ट्राने अनुभवले. त्याच महाराष्ट्रात आज नेते ज्या भाषेत एकमेकांवर घसरतात, ते क्लेषकारक आहे. महाराष्ट्राची ही स्थिती, तर अन्यत्र काय असेला असहिष्णुता आणि अनुदारता याच पायावर राजकारण उभे राहिल्यावर आणखी वेगळे काय होणार? कधी एखाद्या धर्माच्या विरोधात, तर कधी जातीच्या वा भाषेच्या संदर्भात, कधी महिलांच्या अनुषंगाने, तर कधी व्यक्तीबद्दल केली जाणारी विखारी विधाने हे आपल्या समकालीन राजकारणाचे व्यक्तिमत्त्व आहे. 

आझम खान यांना झालेली शिक्षा म्हणून महत्त्वाची आहे. वैविध्यातील एकात्मता हे ज्या देशाचे अधिष्ठान आहे, धर्मनिरपेक्षता आणि समता बंधुता हाच ज्या संविधानाचा पाया आहे, तिथे या प्रकारचा द्वेष दिसणे काळजीचे आहे. देशातील अल्पसंख्याकांच्या विरोधातील द्वेषयुक्त भाषणांमुळे वातावरण खराब होत आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच म्हटले आहे. भाजपचा कोणी नेता एखाद्या समुदायाबद्दल विखारी भाष्य करतो. कधी धर्मसंसदेमध्ये आक्षेपार्ह शब्द वापरले जातात. एकविसाव्या शतकात काय चालले आहे? धर्माच्या नावाखाली आपण कुठे पोहोचलो आहोत?' असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला होता. 

धर्मनिरपेक्ष देशासाठी ही वेळ अत्यंत धक्कादायक असल्याचेही न्यायालयाने म्हटले होते. मुस्लिमांसंदर्भात द्वेषपूर्ण भाषण देणाऱ्या राजकीय नेत्यांविरोधात कारवाईसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली, तेव्हा न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले होते. मुद्दा एका पक्षाचा नाही. कधी समाजवादी पक्षाचे कोणी आझम खान असतात, कधी भाजपचे कोणी प्रवेश वर्मा असतात; पण मूळ मुद्दा असतो द्वेषाचा आणि विखाराचा, धर्माच्या नावावर देशाचे विभाजन करू पाहणाऱ्यांना अद्यापही भारताची गोष्ट' का समजू नये? 

टॅग्स :Indiaभारत